शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक काम निष्ठेने केल्यास यश

By admin | Updated: November 10, 2014 00:59 IST

ऊस तोडणी असो, पोल्ट्री फार्मचे काम असो, मोर्चा काढणे किंवा सिंचनाच्या क्षेत्रातील काम असो, ते काम निष्ठेने केले आणि यश मिळाले. त्यामुळे जीवनात यश मिळवायचे असेल तर निष्ठेने काम करण्याची गरज आहे,

मधुकर धस : प्रकट मुलाखतीतून उलगडला जीवनप्रवासनागपूर : ऊस तोडणी असो, पोल्ट्री फार्मचे काम असो, मोर्चा काढणे किंवा सिंचनाच्या क्षेत्रातील काम असो, ते काम निष्ठेने केले आणि यश मिळाले. त्यामुळे जीवनात यश मिळवायचे असेल तर निष्ठेने काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन यवतमाळ तालुक्यातील घाटंजी येथील दिलासा संस्थेचे मधुकर धस यांनी केले.प्रयास सेवांकुर, मुंडले एज्युकेशन ट्रस्ट आणि स्व. अच्युतराव महाजन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मुंडले सभागृहात रविवारी ‘आम्ही बिघडलो...तुम्ही बी घडाना’ या कार्यक्रमात मधुकर धस यांची मुलाखत अविनाश सावजी यांनी घेतली. मधुकर धस म्हणाले, वडिलांनी शेळ्यामेंढ्या पाळून ५ एकर जमीन घेतली. आई मोलमजुरी करायची. मी सुद्धा सुट्यात काम करायचो. चौथीपर्यंतचे शिक्षण मामाकडे घेतले. शेजारच्या जोशी सरांनी आग्रह केल्यामुळे मला शाळेत घातले. वर्गात ढ विद्यार्थी होतो. दहावीला कसाबसा ४२ टक्क्यांवर पास झालो. मित्राचा शर्ट घालून परीक्षेला जावे लागले. झाडाचा डिंक काढून विकायचो. कमी टक्क्यांमुळे पुण्यात आर्टला प्रवेश घेतला. आईसोबत कराडला ऊस तोडण्यासाठी गेलो. ऊस लावण्याचा माझा वेग पाहून मालक इतरांपेक्षा अधिक पैसे द्यायचा. त्यानंतर पोल्ट्री फार्मवर काम करून ९० टक्के अंडे असे प्रमाण वाढविल्याने मालकाने ४०० रुपये महिना दिला. गावातून एका समाजसेविकेने पत्र पाठवून गावात ३०० रुपये महिना कबूल केल्याने गावाकडे परतलो. अनेक मोर्चे काढले. वेश्या व्यवसाय करणाऱ्यांच्या मुलींसाठी काम केले. पोलीस केस लागल्या. धारणीत कुपोषणग्रस्तांसाठी मोर्चा काढला. त्यानंतर घाटंजीला परतलो. पैशांसाठी मेधाताई पाटकर यांना पत्र लिहले. त्यांनी १२०० रुपये मानधन सुरू केले. बचतगटाची कामे केली.नागपूरला ३ लाखाचा प्रकल्प मंजूर झाला. आयुष्यभर पाण्यासाठी काम करून २४० योजनांद्वारे ९ हजार एकर शेतीला आणि २६ हजार शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध केले. सिरपूर पॅटर्न, स्वत:चे डोह मॉडेल राबविल्याने नाबार्डने २०१२ चा नॅशनल अवॉर्ड दिला. सध्या आपल्या संस्थेत १५७ कर्मचारी असून १२ कोटींची उलाढाल होते. घाटंजीत गावाचे उत्पन्न ७ लाख प्रतिवर्षावरून १ कोटी १२ लाखावर गेल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. अविनाश सावजी यांनी हसतखेळत त्यांची मुलाखत घेतली. प्रकट मुलाखतीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)