शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

दोन भाकड गायींपासून ते २० दुभत्या गायींपर्यंतची झेप; नागपूरच्या तरुणाची यशोगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 10:48 IST

उद्योगांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या तरुणांसमोर नागपूर तालुक्यातील कोदामेंढीनजीकच्या राजोली येथील एका ३५ वर्षीय नीतेश फत्तूजी पुरी या तरुणाने प्रेरणादायी चित्र निर्माण केले आहे.

ठळक मुद्देशेती नसताना केला शेतीपूरक व्यवसाय

अशोक हटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गाई-म्हशी पाळणे, दुग्धव्यवसाय करणे म्हणजे मोठा यक्ष प्रश्नच उभा ठाकतो, त्यापेक्षा ५-१० हजारांची नोकरी बरी, असाच सूर आज तरुण बेरोजगारांमध्ये दिसून येतो. शेतकरी या धंद्याला जोडधंदा म्हणून करण्यास मागे-पुढेच पाहताना दिसतात. अशा उद्योगांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या तरुणांसमोर नागपूर तालुक्यातील कोदामेंढीनजीकच्या राजोली येथील एका ३५ वर्षीय नीतेश फत्तूजी पुरी या तरुणाने प्रेरणादायी चित्र निर्माण केले आहे. घरी शेती नसतानाही शेतीपूरक दुग्धव्यवसाय उभारून उद्योग क्षेत्रात त्याने भरारी घेतली आहे.जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर यश हमखास मिळेतच, या वाक्याला नीतेशने खरे ठरविले आहे. साडेचार हजार रुपयांप्रमाणे दोन भाकड गाई घेऊन १५ वर्षांपूर्वी या क्षेत्रात पाऊल टाकले. आज २० जर्सी गाईपर्यंत त्याने आपली वाटचाल नेली आहे. दररोज ४०० लिटर दुधापासून ३५ रुपये प्रति लिटर भावाने १४,००० रुपये मिळत आहे. दूध व दराबाबत हल्दीराम कंपनीशी करार केला आहे. विशेष म्हणजे नीतेशकडे शेती नाही. त्यामुळे जनावराच्या चाºयाचा प्रश्न निर्माण होत होता. हिरवा चारा निर्माण करण्यासाठी त्याने चार एकर शेती भाड्याने घेतली आहे. प्रति एकर १७ हजार रुपये वर्षाकाठी भाडे दिले जाते. गार्इंसाठी त्याने फोमच्या गाद्यांची व्यवस्था केली आहे. गाई अमेरिकन ब्रीडच्या होलीस्टेन जातीच्या असल्याने सरासरी प्रत्येक गाईचे दूध ४० लिटरच्या जवळपास काढले जाते, असेही नीतेशने सांगितले.कुटुंबातील सर्व सदस्य आळीपाळीने गार्इंच्या सेवेत असतात. घर व गोठा एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे २४ तास आमचा हा परिवार एक दुसºयासोबत असतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मिळकत एक हजारावर येत असल्याने सर्व सदस्य आपली जबाबदारी अत्यंत जिव्हाळ्याने पार पाडत असल्याचे तो म्हणाला.वीज बिलाची होणार बचतगोबर गॅस तयार करून वीज वापरण्याचा विचार त्याने व्यक्त केला. उन्हाळ्यात १० ते १२ हजार रुपये महिन्याकाठी वीज बिल येते. हिवाळा व पावसाळ्यात सात हजारांपर्यंत बिल येते. यावर पर्याय म्हणून गोबर गॅसचा वापर करून वर्षाकाठी एक लाख रुपयाची बचत करण्याचा मनोदय नीतेशने व्यक्त केला. तसेच आता ग्रामीण भागातही सेलिब्रेशन हॉल, हॉटेलिंगला मोठा वाव असल्याने दुधापासून खवा, पनीर व दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वाव आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ करता येऊ शकते, असे सांगत शेतकऱ्यांनी या जोडधंद्याकडे वळावे, असेही नीतेशने सांगितले.

टॅग्स :agricultureशेती