शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

दोन भाकड गायींपासून ते २० दुभत्या गायींपर्यंतची झेप; नागपूरच्या तरुणाची यशोगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 10:48 IST

उद्योगांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या तरुणांसमोर नागपूर तालुक्यातील कोदामेंढीनजीकच्या राजोली येथील एका ३५ वर्षीय नीतेश फत्तूजी पुरी या तरुणाने प्रेरणादायी चित्र निर्माण केले आहे.

ठळक मुद्देशेती नसताना केला शेतीपूरक व्यवसाय

अशोक हटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गाई-म्हशी पाळणे, दुग्धव्यवसाय करणे म्हणजे मोठा यक्ष प्रश्नच उभा ठाकतो, त्यापेक्षा ५-१० हजारांची नोकरी बरी, असाच सूर आज तरुण बेरोजगारांमध्ये दिसून येतो. शेतकरी या धंद्याला जोडधंदा म्हणून करण्यास मागे-पुढेच पाहताना दिसतात. अशा उद्योगांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या तरुणांसमोर नागपूर तालुक्यातील कोदामेंढीनजीकच्या राजोली येथील एका ३५ वर्षीय नीतेश फत्तूजी पुरी या तरुणाने प्रेरणादायी चित्र निर्माण केले आहे. घरी शेती नसतानाही शेतीपूरक दुग्धव्यवसाय उभारून उद्योग क्षेत्रात त्याने भरारी घेतली आहे.जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर यश हमखास मिळेतच, या वाक्याला नीतेशने खरे ठरविले आहे. साडेचार हजार रुपयांप्रमाणे दोन भाकड गाई घेऊन १५ वर्षांपूर्वी या क्षेत्रात पाऊल टाकले. आज २० जर्सी गाईपर्यंत त्याने आपली वाटचाल नेली आहे. दररोज ४०० लिटर दुधापासून ३५ रुपये प्रति लिटर भावाने १४,००० रुपये मिळत आहे. दूध व दराबाबत हल्दीराम कंपनीशी करार केला आहे. विशेष म्हणजे नीतेशकडे शेती नाही. त्यामुळे जनावराच्या चाºयाचा प्रश्न निर्माण होत होता. हिरवा चारा निर्माण करण्यासाठी त्याने चार एकर शेती भाड्याने घेतली आहे. प्रति एकर १७ हजार रुपये वर्षाकाठी भाडे दिले जाते. गार्इंसाठी त्याने फोमच्या गाद्यांची व्यवस्था केली आहे. गाई अमेरिकन ब्रीडच्या होलीस्टेन जातीच्या असल्याने सरासरी प्रत्येक गाईचे दूध ४० लिटरच्या जवळपास काढले जाते, असेही नीतेशने सांगितले.कुटुंबातील सर्व सदस्य आळीपाळीने गार्इंच्या सेवेत असतात. घर व गोठा एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे २४ तास आमचा हा परिवार एक दुसºयासोबत असतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मिळकत एक हजारावर येत असल्याने सर्व सदस्य आपली जबाबदारी अत्यंत जिव्हाळ्याने पार पाडत असल्याचे तो म्हणाला.वीज बिलाची होणार बचतगोबर गॅस तयार करून वीज वापरण्याचा विचार त्याने व्यक्त केला. उन्हाळ्यात १० ते १२ हजार रुपये महिन्याकाठी वीज बिल येते. हिवाळा व पावसाळ्यात सात हजारांपर्यंत बिल येते. यावर पर्याय म्हणून गोबर गॅसचा वापर करून वर्षाकाठी एक लाख रुपयाची बचत करण्याचा मनोदय नीतेशने व्यक्त केला. तसेच आता ग्रामीण भागातही सेलिब्रेशन हॉल, हॉटेलिंगला मोठा वाव असल्याने दुधापासून खवा, पनीर व दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वाव आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ करता येऊ शकते, असे सांगत शेतकऱ्यांनी या जोडधंद्याकडे वळावे, असेही नीतेशने सांगितले.

टॅग्स :agricultureशेती