शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

दोन भाकड गायींपासून ते २० दुभत्या गायींपर्यंतची झेप; नागपूरच्या तरुणाची यशोगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 10:48 IST

उद्योगांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या तरुणांसमोर नागपूर तालुक्यातील कोदामेंढीनजीकच्या राजोली येथील एका ३५ वर्षीय नीतेश फत्तूजी पुरी या तरुणाने प्रेरणादायी चित्र निर्माण केले आहे.

ठळक मुद्देशेती नसताना केला शेतीपूरक व्यवसाय

अशोक हटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गाई-म्हशी पाळणे, दुग्धव्यवसाय करणे म्हणजे मोठा यक्ष प्रश्नच उभा ठाकतो, त्यापेक्षा ५-१० हजारांची नोकरी बरी, असाच सूर आज तरुण बेरोजगारांमध्ये दिसून येतो. शेतकरी या धंद्याला जोडधंदा म्हणून करण्यास मागे-पुढेच पाहताना दिसतात. अशा उद्योगांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या तरुणांसमोर नागपूर तालुक्यातील कोदामेंढीनजीकच्या राजोली येथील एका ३५ वर्षीय नीतेश फत्तूजी पुरी या तरुणाने प्रेरणादायी चित्र निर्माण केले आहे. घरी शेती नसतानाही शेतीपूरक दुग्धव्यवसाय उभारून उद्योग क्षेत्रात त्याने भरारी घेतली आहे.जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर यश हमखास मिळेतच, या वाक्याला नीतेशने खरे ठरविले आहे. साडेचार हजार रुपयांप्रमाणे दोन भाकड गाई घेऊन १५ वर्षांपूर्वी या क्षेत्रात पाऊल टाकले. आज २० जर्सी गाईपर्यंत त्याने आपली वाटचाल नेली आहे. दररोज ४०० लिटर दुधापासून ३५ रुपये प्रति लिटर भावाने १४,००० रुपये मिळत आहे. दूध व दराबाबत हल्दीराम कंपनीशी करार केला आहे. विशेष म्हणजे नीतेशकडे शेती नाही. त्यामुळे जनावराच्या चाºयाचा प्रश्न निर्माण होत होता. हिरवा चारा निर्माण करण्यासाठी त्याने चार एकर शेती भाड्याने घेतली आहे. प्रति एकर १७ हजार रुपये वर्षाकाठी भाडे दिले जाते. गार्इंसाठी त्याने फोमच्या गाद्यांची व्यवस्था केली आहे. गाई अमेरिकन ब्रीडच्या होलीस्टेन जातीच्या असल्याने सरासरी प्रत्येक गाईचे दूध ४० लिटरच्या जवळपास काढले जाते, असेही नीतेशने सांगितले.कुटुंबातील सर्व सदस्य आळीपाळीने गार्इंच्या सेवेत असतात. घर व गोठा एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे २४ तास आमचा हा परिवार एक दुसºयासोबत असतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मिळकत एक हजारावर येत असल्याने सर्व सदस्य आपली जबाबदारी अत्यंत जिव्हाळ्याने पार पाडत असल्याचे तो म्हणाला.वीज बिलाची होणार बचतगोबर गॅस तयार करून वीज वापरण्याचा विचार त्याने व्यक्त केला. उन्हाळ्यात १० ते १२ हजार रुपये महिन्याकाठी वीज बिल येते. हिवाळा व पावसाळ्यात सात हजारांपर्यंत बिल येते. यावर पर्याय म्हणून गोबर गॅसचा वापर करून वर्षाकाठी एक लाख रुपयाची बचत करण्याचा मनोदय नीतेशने व्यक्त केला. तसेच आता ग्रामीण भागातही सेलिब्रेशन हॉल, हॉटेलिंगला मोठा वाव असल्याने दुधापासून खवा, पनीर व दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वाव आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ करता येऊ शकते, असे सांगत शेतकऱ्यांनी या जोडधंद्याकडे वळावे, असेही नीतेशने सांगितले.

टॅग्स :agricultureशेती