शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मनसर-तुमसर रस्त्याचे सौंदर्य हरविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:10 IST

रामटेक : रामटेक हे जागतिक कीर्तीचे ठिकाण आहे. हिरवीगार वनराई व उंचच उंच सातपुडा पर्वतरांगा. ठिकठिकाणी साैंदर्यात भर टाकणारे ...

रामटेक : रामटेक हे जागतिक कीर्तीचे ठिकाण आहे. हिरवीगार वनराई व उंचच उंच सातपुडा पर्वतरांगा. ठिकठिकाणी साैंदर्यात भर टाकणारे तलाव, कालिदासाचे वास्तव्य, प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श, नागार्जुन मुनीचे कर्मस्थान, जैन मंदिर अशा कितीतरी गोष्टींचा प्राचीन वारसा या तालुक्याला लाभला आहे. या ठिकाणचे साैंदर्य अधिक फुलावे म्हणून मनसर ते तुमसर हा रस्ता बनविण्यात येत आहे. मात्र हा मार्ग राजकीय हस्तक्षेपामुळे साैंदर्यात भर घालण्यापेक्षा अश्रू ढाळत आहे! या रस्त्याचे काम ९५ टक्के संपले आहे. काही काम शिल्लक आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण शक्य होते. रस्त्याच्या मधोमध फुलझाडे लावता आली असती. दाेन्ही बाजूने लाईटची व्यवस्था, एका बाजूने दाेन गाड्या एकाच वेळी जाऊ शकल्या असत्या. वळण सरळ करता आले असते. दाेन्ही बाजूने जाळ्या लावता आल्या असत्या. या सर्वामुळे रस्त्याचे सौंदर्य फुलले असते. पण सध्या यापैकी काहीही हाेणार नाही.

राजकीय पुढाऱ्यांनी कुणी बॅरिकेड्‌स लावू नका, कुणी मधात येणारे झाडे ताेडू नका, रस्ता उंच करू नका, दाेन्ही बाजूने सर्व्हिस राेड बनवा, असा दबाव आणला. त्यामुळे काम थांबले. सर्व्हिस राेड तयार झाल पण रस्त्याचे काम हाेण्याअगाेदरच येथे अतिक्रमण झाले. सर्व्हिस राेड दुकानदाराच्या ताब्यात गेला. त्यामुळे सर्व्हिस राेड कुणासाठी बनविला, हे कळायला मार्ग नाही.

या रस्त्यावर बॅरिकेड्‌स अर्धे लागले. अर्धे तसेच राहणार आहे. काही ठिकाणी पाेलवर लाईट लावले, पण कुठे सुटले आहेत. मनसरजवळही वळण सरळ हाेऊ दिले नाही. कंपनीला त्यांच्या प्लॅननुसार काम करता आले नाही. रामटेकच्या बसस्थानक चाैकात साैंदर्यीकरण करण्यात येणार आहे. तिथे फुलझाडे व हायमास्ट लावले जाणार आहे. पण यात बाजूच्या हाॅटेलची जागा जाणार आहे. तेथे अजून काय हाेईल, हे सांगता येत नाही.

या रस्त्याचे काम मनसर ते सालई ४२ कि.मी. बारब्रीक कंपनी करीत आहे. ४०० कोटींचा खर्च यासाठी अपेक्षित आहे. पण रामटेकजवळ अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. रस्त्याचे काम सुरू हाेण्याआधी जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले नाही. त्यामुळे काम थांबले आहे. खिंडसीजवळ व नगारा तलाव क्षेत्रात काम थांबले आहे. नगारा तलावाजवळ बारई समाजाची जागा आहे. त्यामुळे हे काम अपूर्ण आहे. तसेच खिंडसीजवळ वन विभागाची जागा पाहिजे आहे. पण जागा न मिळल्याने तेथेही काम थांबले आहे. ही समस्या कधी सुटेल, काही सांगता येत नाही.