शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नवीन ई-कॉमर्स पॉलिसीमुळे रिटेल व्यवसायाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:13 IST

नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन ई-पॉलिसीमुळे देशातील रिटेल बाजाराचे नुकसान होत असून किरकोळ व्यावसायिक संकटात आले आहेत. या पॉलिसीच्या ...

नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन ई-पॉलिसीमुळे देशातील रिटेल बाजाराचे नुकसान होत असून किरकोळ व्यावसायिक संकटात आले आहेत. या पॉलिसीच्या विरोधात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) आवाहानार्थ नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्त्वात चेंबरच्या सिव्हील लाईन्स येथील प्रांगणात व्यापाऱ्यांनी धरणे आंदोलन केले आणि केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध घोषणा दिल्या.

चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, कायदे, नियम आणि एक मजबूत प्रशासकीय व्यवस्था असतानाही मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या कायद्याचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयासह विभिन्न न्यायालयाने मोठ्या कंपन्यांच्या व्यापार मॉड्युलवर ताशेरे ओढले आहेत. त्यानंतरही या कंपन्यांवर ठोस कारवाई झालेली नाही. याउलट सामान्य व्यापारी काही चूक करीत असेल तर प्रशासन त्यांच्याविरुद्ध कारवाई करते. मोठ्या कंपन्यांवर प्रशासन कारवाई का करीत नाही, हा गंभीर प्रश्न आहे.

चेंबरचे माजी अध्यक्ष व कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले, विदेशी कंपन्या देशातील ई-कॉमर्स नियम व कायद्याचे पालन करीत नाहीत. या कंपन्या भारतातील ई-कॉमर्स कंपन्यांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावर नियंत्रणासाठी सरकारने ग्राहक कायद्यांतर्गत प्रस्तावित नियमांना त्वरित लागू करावे. व्यापाऱ्यांनी १५ सप्टेंबरपासून महिनाभर ई-कॉमर्सवर ‘हल्ला बोल’ एक राष्ट्रीय अभियानाची सुरुवात केली आहे. या दरम्यान सर्व राजकीय पक्षांना चेंबरतर्फे पत्र पाठविण्यात येणार आहे.

याप्रसंगी अर्जुनदास आहुजा, स्वप्निल अहिरकर, हेमंत गांधी, फारूख अकबानी, संजय के. अग्रवाल, सचिन पुनियानी, शब्बार शाकीर, राजवंतपाल सिंग तुली, मोहन चोईथानी, मनोहरलाल आहुजा, रमन पैगवार, महेश कुकडेजा, ॲड. निखिल अग्रवाल, प्रभाकर देशमुख, सुनील जग्यासी, प्रकाश हेडा, मनोहरलाल आहुजा, किशोर धाराशिवकर, गोविंद पटेल, आनंद भुतडा, विक्रांत भालगोटे, अशोक बियानी, समित जैन, अजय कानतोडे, सुभाष जोबनपुत्रा, रवींद्र हर्दवानी, ज्योती अवस्थी, नितू नायक, पुरूषोत्तम जैन आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.