शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भगवान बुद्धाने जगाला परिवर्तनाची दिशा दिली :अशोक गोडघाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:46 IST

भगवान बुद्धाने बुद्ध धम्म देऊन जगाला परिवर्तनाची दिशा दिली, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे यांनी केले.

ठळक मुद्देआगलावेंच्या ‘धम्मचक्र प्रवर्तनानंतरचे परिवर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धर्माने स्वत:च्या गुणवत्तेवर जिवंत राहावे, असा भगवान बुद्धाचा विचार होता. त्यामुळे त्यांनी भीती दाखवून धम्माचा प्रचार-प्रसार केला नसून, आपला उत्तराधिकारीही नेमला नाही. भगवान बुद्धाने बुद्ध धम्म देऊन जगाला परिवर्तनाची दिशा दिली, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे यांनी केले.विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहात डॉ. प्रदीप आगलावे यांच्या ‘धम्मचक्र प्रवर्तनानंतरचे परिवर्तन’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक गायकवाड, आंबेडकरी साहित्यिक डॉ. प्रकाश खरात, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. सरोज आगलावे उपस्थित होते. प्रा. अशोक गोडघाटे म्हणाले, बाबासाहेबांनी जागतिक स्तरावरील मानवजातीसाठी कोणता धर्म चांगला आहे याचा विचार करून बुद्ध धम्म स्वीकारला. त्यामुळे लोक बाबासाहेबांची पूजा ही काही मागण्यांसाठी नाही तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतात. आज बुद्ध धर्म दिल्यामुळे गावकुसाबाहेर राहणाऱ्या माणसांची सुंदर घरे गावात पाहावयास मिळतात. सर्वांना समान संधी देण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. प्रकाश खरात म्हणाले, बाबासाहेबांच्या चळवळीचे प्रतिबिंब आगलावे यांच्या पुस्तकात आहे. बाबासाहेबांची चळवळ मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापणारी होती. त्यांनी दिलेल्या बुद्धिस्ट संकल्पनेवर सर्वांनी काम करण्याची गरज आहे. समाजातील श्रीमंत, सुशिक्षितांनी जे गरीब आणि अशिक्षित आहेत, त्यांच्याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या राजकीय पक्ष पुन्हा उभा करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. प्रदीप आगलावे यांनी वैचारिक परिवर्तन झाल्याशिवाय माणूस बदलत नसल्याचे सांगून, चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचे लेखन समाजासमोर येण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. अशोक गायकवाड यांनी बौद्ध धर्म कृतिशील असून बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविकातून डॉ. राहुल भगत यांनी १९५६ नंतरची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती आगलावे यांच्या पुस्तकात असल्याचे सांगितले. अहिल्या रंगारी यांनी कविता सादर करून प्रदीप आगलावे यांना मानचिन्ह प्रदान केले. आभार डॉ. सरोज आगलावे यांनी मानले.

 

टॅग्स :nagpurनागपूर