शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भगवान बुद्धाने जगाला परिवर्तनाची दिशा दिली :अशोक गोडघाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:46 IST

भगवान बुद्धाने बुद्ध धम्म देऊन जगाला परिवर्तनाची दिशा दिली, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे यांनी केले.

ठळक मुद्देआगलावेंच्या ‘धम्मचक्र प्रवर्तनानंतरचे परिवर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धर्माने स्वत:च्या गुणवत्तेवर जिवंत राहावे, असा भगवान बुद्धाचा विचार होता. त्यामुळे त्यांनी भीती दाखवून धम्माचा प्रचार-प्रसार केला नसून, आपला उत्तराधिकारीही नेमला नाही. भगवान बुद्धाने बुद्ध धम्म देऊन जगाला परिवर्तनाची दिशा दिली, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे यांनी केले.विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहात डॉ. प्रदीप आगलावे यांच्या ‘धम्मचक्र प्रवर्तनानंतरचे परिवर्तन’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक गायकवाड, आंबेडकरी साहित्यिक डॉ. प्रकाश खरात, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. सरोज आगलावे उपस्थित होते. प्रा. अशोक गोडघाटे म्हणाले, बाबासाहेबांनी जागतिक स्तरावरील मानवजातीसाठी कोणता धर्म चांगला आहे याचा विचार करून बुद्ध धम्म स्वीकारला. त्यामुळे लोक बाबासाहेबांची पूजा ही काही मागण्यांसाठी नाही तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतात. आज बुद्ध धर्म दिल्यामुळे गावकुसाबाहेर राहणाऱ्या माणसांची सुंदर घरे गावात पाहावयास मिळतात. सर्वांना समान संधी देण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. प्रकाश खरात म्हणाले, बाबासाहेबांच्या चळवळीचे प्रतिबिंब आगलावे यांच्या पुस्तकात आहे. बाबासाहेबांची चळवळ मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापणारी होती. त्यांनी दिलेल्या बुद्धिस्ट संकल्पनेवर सर्वांनी काम करण्याची गरज आहे. समाजातील श्रीमंत, सुशिक्षितांनी जे गरीब आणि अशिक्षित आहेत, त्यांच्याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या राजकीय पक्ष पुन्हा उभा करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. प्रदीप आगलावे यांनी वैचारिक परिवर्तन झाल्याशिवाय माणूस बदलत नसल्याचे सांगून, चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचे लेखन समाजासमोर येण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. अशोक गायकवाड यांनी बौद्ध धर्म कृतिशील असून बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविकातून डॉ. राहुल भगत यांनी १९५६ नंतरची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती आगलावे यांच्या पुस्तकात असल्याचे सांगितले. अहिल्या रंगारी यांनी कविता सादर करून प्रदीप आगलावे यांना मानचिन्ह प्रदान केले. आभार डॉ. सरोज आगलावे यांनी मानले.

 

टॅग्स :nagpurनागपूर