शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

ब्रॅण्डेड खाद्यतेल कंपन्यांची लूट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 20:51 IST

Looting of branded edible oil companies! ब्रॅण्डेड कंपन्या खाद्यतेलाचे दर वाढवून लूट करीत आहे. पॅकिंग खाद्यतेलासाठी १६ ते २५ रुपये जास्त मोजावे लागत आहे.

ठळक मुद्दे पॅकेटचे ९१० ग्रॅम वजन : ग्राहकांना द्यावे लागतात जास्त पैसे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महागाईच दुखणं आज प्रत्येक सर्वसामान्याला सतावत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेल असो की पेट्रोलचे दर, सगळ्याच गोष्टींचे दर महाग झाले आहेत. सर्वसामान्यांना आता दररोजचा खर्च करताना महिन्याचे नियोजन करणेही अवघड झाले आहे. त्यातच ब्रॅण्डेड कंपन्या खाद्यतेलाचे दर वाढवून लूट करीत आहे. पॅकिंग खाद्यतेलासाठी १६ ते २५ रुपये जास्त मोजावे लागत आहे.

महागाईमुळे गरीब व सामान्यांना खाद्यतेलाचे टीन (१५ किलो) घेणे शक्य नसल्याने बजेट पाहून लिटरचे पॅकेट घ्यावे लागते. सध्या किराणा दुकानांमध्ये खुले तेल मिळत नाही. त्यामुळे खुल्या तेलाच्या भावात ९१० ग्रॅमचे पॅकेज खरेदी करतात. एक किलो खुले आणि पॅकेजचे ९१० ग्रॅम तेलाचे दर समान आहेत. ब्रॅण्डेड तेल कंपन्या तेलाचे दर कमी करण्यास तयार नाही. कंपन्या भाववाढ करून सर्वसामान्यांची लूट करीत असल्याचे किराणा दुकानदारांनी सांगितले.

किलो व पॅकेटमध्ये ९० ग्रॅमचा फरक

सर्वाधिक विक्रीचे सोयाबीन तेलाचे दर १६२ ते १६५ रुपये किलो आहेत आणि ब्रॅण्डेड कंपन्यांच्या तेलाच्या पॅकेटचे दरही १६० ते १६५ रुपयांदरम्यान आहेत. ग्राहक विनायक कोल्हे म्हणाले, सध्या बाजारात खुले तेल मिळत नसल्याने दरवेळी सोयाबीनचे दोन पॅकेट विकत घेतो. किलो आणि पॅकेटच्या वजनात ९० ग्रॅमचा फरक आहे. त्याकरिता १६ ते २० रुपयापर्यंत जास्त पैसे मोजावे लागतात. हा भुर्दंड ग्राहकांवर बसू नये. कंपन्यांनाही किलोप्रमाणे पॅकबंद तेल विकण्याची सक्ती करावी. हीच बाब शेंगदाणा खाद्यतेलासाठी लागू असून, खुले आणि पॅकबंद तेलासाठी जवळपास २५ रुपयांपर्यंत जास्त पैसे द्यावे लागतात. सध्या बाजारात सोयाबीन तेल प्रति किलो १६२ ते १६५, शेंगदाणा १८० ते १८५, राईस ब्रान १८०, जवस १६५, सरसो १७० रुपये भाव आहेत.

पॅकेटवर वेगवेगळी एमआरपी

नागपूर चिल्लर किराणा संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, बाजारात स्थानिक आणि ब्रॅण्डेड कंपन्यांचे पॅकबंद खाद्यतेल उपलब्ध आहेत. सोयाबीन असो वा शेंगदाणा तेल, सर्व कंपन्यांची एमआरपी वेगवेगळी असते. अशावेळी नेहमीच्या ग्राहकांना पॅकेटचे दर कमी करून विक्री करावी लागते. पॅकेटचे दर जास्त असल्याने अनेकदा ग्राहक नाराज होतात. पण याकरिता आमचाही नाईलाज आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर