शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ब्रॅण्डेड खाद्यतेल कंपन्यांची लूट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 20:51 IST

Looting of branded edible oil companies! ब्रॅण्डेड कंपन्या खाद्यतेलाचे दर वाढवून लूट करीत आहे. पॅकिंग खाद्यतेलासाठी १६ ते २५ रुपये जास्त मोजावे लागत आहे.

ठळक मुद्दे पॅकेटचे ९१० ग्रॅम वजन : ग्राहकांना द्यावे लागतात जास्त पैसे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महागाईच दुखणं आज प्रत्येक सर्वसामान्याला सतावत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेल असो की पेट्रोलचे दर, सगळ्याच गोष्टींचे दर महाग झाले आहेत. सर्वसामान्यांना आता दररोजचा खर्च करताना महिन्याचे नियोजन करणेही अवघड झाले आहे. त्यातच ब्रॅण्डेड कंपन्या खाद्यतेलाचे दर वाढवून लूट करीत आहे. पॅकिंग खाद्यतेलासाठी १६ ते २५ रुपये जास्त मोजावे लागत आहे.

महागाईमुळे गरीब व सामान्यांना खाद्यतेलाचे टीन (१५ किलो) घेणे शक्य नसल्याने बजेट पाहून लिटरचे पॅकेट घ्यावे लागते. सध्या किराणा दुकानांमध्ये खुले तेल मिळत नाही. त्यामुळे खुल्या तेलाच्या भावात ९१० ग्रॅमचे पॅकेज खरेदी करतात. एक किलो खुले आणि पॅकेजचे ९१० ग्रॅम तेलाचे दर समान आहेत. ब्रॅण्डेड तेल कंपन्या तेलाचे दर कमी करण्यास तयार नाही. कंपन्या भाववाढ करून सर्वसामान्यांची लूट करीत असल्याचे किराणा दुकानदारांनी सांगितले.

किलो व पॅकेटमध्ये ९० ग्रॅमचा फरक

सर्वाधिक विक्रीचे सोयाबीन तेलाचे दर १६२ ते १६५ रुपये किलो आहेत आणि ब्रॅण्डेड कंपन्यांच्या तेलाच्या पॅकेटचे दरही १६० ते १६५ रुपयांदरम्यान आहेत. ग्राहक विनायक कोल्हे म्हणाले, सध्या बाजारात खुले तेल मिळत नसल्याने दरवेळी सोयाबीनचे दोन पॅकेट विकत घेतो. किलो आणि पॅकेटच्या वजनात ९० ग्रॅमचा फरक आहे. त्याकरिता १६ ते २० रुपयापर्यंत जास्त पैसे मोजावे लागतात. हा भुर्दंड ग्राहकांवर बसू नये. कंपन्यांनाही किलोप्रमाणे पॅकबंद तेल विकण्याची सक्ती करावी. हीच बाब शेंगदाणा खाद्यतेलासाठी लागू असून, खुले आणि पॅकबंद तेलासाठी जवळपास २५ रुपयांपर्यंत जास्त पैसे द्यावे लागतात. सध्या बाजारात सोयाबीन तेल प्रति किलो १६२ ते १६५, शेंगदाणा १८० ते १८५, राईस ब्रान १८०, जवस १६५, सरसो १७० रुपये भाव आहेत.

पॅकेटवर वेगवेगळी एमआरपी

नागपूर चिल्लर किराणा संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, बाजारात स्थानिक आणि ब्रॅण्डेड कंपन्यांचे पॅकबंद खाद्यतेल उपलब्ध आहेत. सोयाबीन असो वा शेंगदाणा तेल, सर्व कंपन्यांची एमआरपी वेगवेगळी असते. अशावेळी नेहमीच्या ग्राहकांना पॅकेटचे दर कमी करून विक्री करावी लागते. पॅकेटचे दर जास्त असल्याने अनेकदा ग्राहक नाराज होतात. पण याकरिता आमचाही नाईलाज आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर