शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Lokmat Women Summit 2022; ‘आज मैं ऊपर’च्या सत्रातील मान्यवरांच्या मते, 'लढा देणाऱ्यांच्या पायाशी लोक लोटांगण घालतात'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 20:13 IST

Nagpur News महिला स्वत:च्या हिमतीवर प्रगती करीत आहेत. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्यात हिंमत आली आहे. समाजात लढा देणाऱ्यांच्या पायाशी लोक लोटांगण घालतात, असे मत महिलांनी लोकमत वुमेन समिट २०२२ च्या व्यासपीठावर व्यक्त केले.

 

नागपूर : आता महिला प्रत्येक क्षेत्रात हिरीरीने काम करीत असून त्यांना पुरुषांकडून प्रोत्साहनही मिळते. त्यांना कायद्याची साथही मिळत आहे. महिला स्वत:च्या हिमतीवर प्रगती करीत आहेत. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्यात हिंमत आली आहे. समाजात लढा देणाऱ्यांच्या पायाशी लोक लोटांगण घालतात, असे मत महिलांनी येथे व्यक्त केले.

‘लोकमत वुमेन समिट’ च्या नवव्या पर्वात ’आज मैं ऊपर’ या पॅनल चर्चेत अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग, बाल तस्करीविरुद्ध देशात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या सुनिता कर आणि बॉलिवूड अभिनेत्री रसिका दुग्गल यांनी परखड मत मांडले.

रसिका दुग्गल म्हणाल्या, फिल्म इंडस्ट्री पुरुषप्रधान असून महिला कठोर परिश्रमाने काम करतात. पण, या इंडस्ट्रीत आपल्या टर्मवर काम करू शकत नाही. वेगवेगळ्या परिस्थितीत काम करताना अनेक काही शिकायला मिळते. करिअरमध्ये अनेक स्थितीचा सामना केला आहे. गेल्या काही वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुरुषांकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळते, ही चांगली गोष्ट आहे. अशा लोकांसोबत काम करण्याचा आनंद मिळतो. आता कथेत अभिनेत्रींना प्रथम स्थान असते तर काही कथेत महिला केंद्रस्थानी असतात. सर्वच क्षेत्रात काही वाईट तर काही चांगल्या गोष्टी असतातच. कामावर प्रेम असेल तरच फिल्म इंडस्ट्रीत यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सुनिता कर म्हणाल्या, जीवनात अनेक अडचणी आल्या. वयाच्या १६ व्या वर्षी बाल तस्करीत फसले. तीन वर्ष खोलीत बंद होते. घर, समाज, शिक्षण सोडावे लागले. हिमतीच्या बळावर देशात बाल तस्करी बंद करण्यासाठी लढा सुरू केला. यातून संपूर्ण तस्करी बंद करण्याची इच्छा आहे. मुलांना चांगले शिक्षण द्यावे, तस्करांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि चुप्पी साधू नये, असे आवाहन त्यांनी केले. बाल तस्करीविरुद्धच्या लढ्यात पोलीस, वकिल आणि कायद्याचे सहकार्य हवे तसे मिळत नाही. अनेकांशी लढावे लागते. या क्षेत्रात जनजागृतीची गरज आहे. संसदेत तस्करी बिल मंजूर होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. आरती सिंग म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व आहे. महिलांची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महिलेची प्रसूती झाल्यानंतर मुलगा झाला की मुलगी, हा आईचा पहिला प्रश्न असतो. मुलगा झाल्यानंतर आनंद आणि मुलगी झाल्यानंतर दुख: होते. मुलगी बोझ नसते. मुलगा सर्वांना हवा असतो, मुलगी का नाही, ही समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. मलाही दोन मुली आहेत. समाजात मुलीला निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. यशस्वी व्हा आणि पालकांना निर्णय घेण्यास बाध्य करा. चूल आणि मूल ही आताही महिलेची जबाबदारी आहे. भामरागड, मालेगाव येथे स्वनेतृत्त्वावर विश्वास ठेवून काम केले. याकरिता पत्रकारांकडून ‘कडक सॅल्यूट’ मिळाला. कधीही हार मानू नका, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

पॅनल चर्चेचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट