शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Women Summit 2022; ‘आज मैं ऊपर’च्या सत्रातील मान्यवरांच्या मते, 'लढा देणाऱ्यांच्या पायाशी लोक लोटांगण घालतात'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 20:13 IST

Nagpur News महिला स्वत:च्या हिमतीवर प्रगती करीत आहेत. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्यात हिंमत आली आहे. समाजात लढा देणाऱ्यांच्या पायाशी लोक लोटांगण घालतात, असे मत महिलांनी लोकमत वुमेन समिट २०२२ च्या व्यासपीठावर व्यक्त केले.

 

नागपूर : आता महिला प्रत्येक क्षेत्रात हिरीरीने काम करीत असून त्यांना पुरुषांकडून प्रोत्साहनही मिळते. त्यांना कायद्याची साथही मिळत आहे. महिला स्वत:च्या हिमतीवर प्रगती करीत आहेत. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्यात हिंमत आली आहे. समाजात लढा देणाऱ्यांच्या पायाशी लोक लोटांगण घालतात, असे मत महिलांनी येथे व्यक्त केले.

‘लोकमत वुमेन समिट’ च्या नवव्या पर्वात ’आज मैं ऊपर’ या पॅनल चर्चेत अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग, बाल तस्करीविरुद्ध देशात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या सुनिता कर आणि बॉलिवूड अभिनेत्री रसिका दुग्गल यांनी परखड मत मांडले.

रसिका दुग्गल म्हणाल्या, फिल्म इंडस्ट्री पुरुषप्रधान असून महिला कठोर परिश्रमाने काम करतात. पण, या इंडस्ट्रीत आपल्या टर्मवर काम करू शकत नाही. वेगवेगळ्या परिस्थितीत काम करताना अनेक काही शिकायला मिळते. करिअरमध्ये अनेक स्थितीचा सामना केला आहे. गेल्या काही वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुरुषांकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळते, ही चांगली गोष्ट आहे. अशा लोकांसोबत काम करण्याचा आनंद मिळतो. आता कथेत अभिनेत्रींना प्रथम स्थान असते तर काही कथेत महिला केंद्रस्थानी असतात. सर्वच क्षेत्रात काही वाईट तर काही चांगल्या गोष्टी असतातच. कामावर प्रेम असेल तरच फिल्म इंडस्ट्रीत यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सुनिता कर म्हणाल्या, जीवनात अनेक अडचणी आल्या. वयाच्या १६ व्या वर्षी बाल तस्करीत फसले. तीन वर्ष खोलीत बंद होते. घर, समाज, शिक्षण सोडावे लागले. हिमतीच्या बळावर देशात बाल तस्करी बंद करण्यासाठी लढा सुरू केला. यातून संपूर्ण तस्करी बंद करण्याची इच्छा आहे. मुलांना चांगले शिक्षण द्यावे, तस्करांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि चुप्पी साधू नये, असे आवाहन त्यांनी केले. बाल तस्करीविरुद्धच्या लढ्यात पोलीस, वकिल आणि कायद्याचे सहकार्य हवे तसे मिळत नाही. अनेकांशी लढावे लागते. या क्षेत्रात जनजागृतीची गरज आहे. संसदेत तस्करी बिल मंजूर होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. आरती सिंग म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व आहे. महिलांची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महिलेची प्रसूती झाल्यानंतर मुलगा झाला की मुलगी, हा आईचा पहिला प्रश्न असतो. मुलगा झाल्यानंतर आनंद आणि मुलगी झाल्यानंतर दुख: होते. मुलगी बोझ नसते. मुलगा सर्वांना हवा असतो, मुलगी का नाही, ही समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. मलाही दोन मुली आहेत. समाजात मुलीला निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. यशस्वी व्हा आणि पालकांना निर्णय घेण्यास बाध्य करा. चूल आणि मूल ही आताही महिलेची जबाबदारी आहे. भामरागड, मालेगाव येथे स्वनेतृत्त्वावर विश्वास ठेवून काम केले. याकरिता पत्रकारांकडून ‘कडक सॅल्यूट’ मिळाला. कधीही हार मानू नका, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

पॅनल चर्चेचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट