शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

लोकमतचा प्रभाव : उद्योगांवर लादलेल्या अत्याधिक सेवा शुल्कावर स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 22:46 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांवर लादलेले दहापटापेक्षा जास्त सेवा शुल्क हटविण्याची घोषणा गुरुवारी राज्य शासनातर्फे विधान परिषदेत करण्यात आली. त्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्दे विधान परिषदेत उद्योगमंत्री देसाई यांची घोषणा : एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांना दिलासा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांवर लादलेले दहापटापेक्षा जास्त सेवा शुल्क हटविण्याची घोषणा गुरुवारी राज्य शासनातर्फे विधान परिषदेत करण्यात आली. त्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.यासंदर्भातील वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. यामध्ये दरवाढ आणि औद्योगिक क्षेत्रात समस्यांवर लक्ष वेधले होते. त्यानंतर राज्य शासनाने सेवा शुल्क वाढीवर स्थगिती केल्याची घोषणा केली.उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) संपूर्ण राज्यात विविध औद्योगिक क्षेत्राचा विकास केला आहे. येथे रस्ते, वीज, पाणी पुरवठा आणि अन्य संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाला खर्च करावा लागतो. त्याच्या भरपाईसाठी या सेवांच्या खर्चात १० वर्षांत झालेली वाढ ध्यानात ठेवून संशोधित सेवा शुल्क लागू करण्यात आले. त्यानंतरही खर्चाची पूर्तता होऊ शकत नाही.वाढविलेल्या सेवा शुल्काबाबत विविध औद्योगिक संघटनांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाच्या माध्यमातून सेवा शुल्क पूर्ववत करण्याची मागणी केली होती. आर्थिक आणि जागतिक मंदीच्या वातावरणात उद्योजकांना येणाऱ्या विविध समस्या ध्यानात ठेवून सेवा शुल्कात करण्यात आलेली वाढ अव्यावहारिक असून त्यावर स्थगिती देण्याची मागणी केली होती. ही मागणी आणि सध्याची आर्थिक व औद्योगिक स्थिती ध्यानात घेता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ११ नोव्हेंबर २०१९ च्या परिपत्रकानुसार वाढविण्यात आलेल्या सेवा शुल्काच्या आदेशावर स्थगिती देताना याबाबत सरकारीस्तरावर पुनर्विचार करण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत केली.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईVidhan Parishadविधान परिषद