शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 19:18 IST

"गांधींनी त्यांच्या मूळ देशात जाऊन निवडणूक लढायला हवी, ही अभिमानाची गोष्ट असेल. कदाचित राहुल गांधी पाकिस्तानातील राजकीय अस्थिरतेत मदत करू शकतील. ते एक मोठे राजकीय वैज्ञानिक आहेत आणि बुद्धीबळाचे खेळाडू आहेत."

लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदानाचा तिसरा टप्पा उद्या म्हणजेच मंगळवारी (07 मे) पार पडणार आहे. या टप्प्यात जेथे-जेथे मतदान होणार आहे, तेथील निवडणूक प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी थंडावल्या. मात्र इतर ठिकाणी राजकीय पक्षांच्या सभा आणि नेत्यांची भाषणे सुरूच आहेत. यातच आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला. राहुल गांधी राजकारणाचे महान शास्त्रज्ञ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गुवाहाटीमध्ये प्रसारमाध्यमांसोबत बोलताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "राहुल गांधी पुढची निवडणूक पाकिस्तानातून जिंकतील आणि चांगल्या फरकाने जिंकतील. गांधींनी त्यांच्या मूळ देशात जाऊन निवडणूक लढायला हवी, ही अभिमानाची गोष्ट असेल. कदाचित राहुल गांधी पाकिस्तानातील राजकीय अस्थिरतेत मदत करू शकतील. ते एक मोठे राजकीय वैज्ञानिक आहेत आणि बुद्धीबळाचे खेळाडू आहेत."

तत्पूर्वी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी वायनाडच्या जनतेला विचारले होते की, राहुल गांधींकडे तेथे (वायनाड) एखादे घर आहे? राहुल गांधी मोबाइल नंबर आहे? त्यांनी कधी वायनाडमधील लोकांसोबत बसून भोजन केले?

'राहुल गांधी एखाद्या टूरिस्ट प्रमाणे वायनाडला जातात' - हिमंता म्हणाले, “एका खासदाराने आपल्या मतदारसंघात किमान महिन्यातून दोन-तीन दिवसतरी जायला हवे. मात्र सभेचे नियम पाहता असे वाटते की, राहुल गांधी केवळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अथवा एखाद्या वार्षिक दौऱ्यावर जातात. जे एखाद्या टूरिस्टसारखे वाटते.”

सीएम सरमा म्हणाले, राहुल गांधींची क्रिया एखाद्या चांगल्या पर्यटकाप्रमाणे आहे. मात्र, चांगल्या खासदाराप्रमाणे नाही. ते जर वायनाडचे खासदार असते, तर किमान त्यांचा मोबाईल नंबर तरी काही लोकांना माहीत असला असता. त्यांचे त्यांचे घरही असले असते. मला जे जाणवले ते मी सांगितले."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक