शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Lok Sabha Election 2019; हजारो मतदार ओळखपत्रापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 13:47 IST

मतदार ओळखपत्र वाटपाबाबत कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे यंदाही हजारो नागरिक मतदार ओळखपत्रापासून वंचित राहिले आहेत.

ठळक मुद्देकार्ड वाटपाकडे दुर्लक्ष नव मतदार मतदानाला मुकण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १८ वर्षावरील एकही व्यक्ती मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोग विविध अभियान राबवित असते. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही लाभतो. नाव नोंदवले जाते. मतदार ओळखपत्र मतदाराच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. परंतु कित्येक मतदारांपर्यंत मतदार ओळखपत्र पोहचतच नाही. अनेक वर्षांपासूनचा हा अनुभव यंदाही मतदारांच्या वाट्यास आला आहे. नवीन मतदार कार्डबाबतही तोच अनुभव आला आहे. मतदार ओळखपत्र वाटपाबाबत कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे यंदाही हजारो नागरिक मतदार ओळखपत्रापासून वंचित राहिले आहेत.नागपूरसह देशात लोकसभेच्या १७ व्या सार्वत्रिक निवडणूकीला सुरुवात झाली आहे. एकीकडे इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे मतदार यादीत नाव आहे का? असल्यास त्यामध्ये त्रुटी आहेत का? याची खातरजमा सुरू आहे. यासह नवमतदार ओळखपत्र मिळविण्यासाठी चौकशी करीत आहेत. पण, नव्या मतदारांना गेल्या आठवड्यापासून ओळखपत्रे दिली जात आहेत.ही ओळखपत्रे पाहिल्यावर अनेकांना ही ओळखपत्रच आहे का याची आश्चर्याने खात्री केल्याचे दिसून आले. कारण नवी ओळखपत्रे रंगीत आहेत. तसेच त्याचा आकार लहान आहे. एखाद्या बँकेच्या डेबिट कार्डसारखी त्याची रचना करण्यात आली आहे.जिल्ह्यात ४ लाख ६६ हजारावर मतदारांना हे नवे मतदानकार्ड वाटप सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात मतदारांपर्यत ही ओळखपत्रे पोहोचवण्याची जबाबदारी ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर आहे, ते आपले काम व्यवस्थित करीत नसल्याचे दिसून आले आहे. अनेक नवमतदारांना त्यांचे मतदान ओळखपत्र आले. याची देखील माहिती नाही. मात्र, ते ओळखपत्र संबंधित मतदान केंद्रावरील शिक्षक अथवा संबंधित कर्मचाऱ्यांकडे असल्यानंतरही संबंधित मतदाराला कळविले जात नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.जिल्ह्यातील नुतन १ लाख ८३ हजार मतदारांना एटीएम कार्डसारखे स्मार्ट कलर ओळखपत्र वाटपाचे काम सुरू आहे. तर यापूर्वी २.८३ हजार मतदारांना हे स्मार्टकार्ड वाटप करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हे काम शिक्षकांच्या व निवडणूक कर्मचाºयांच्या माध्यमातून सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात अनेकांना हे कार्ड मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

यातील कुणाला तुम्ही ओळखता का?मतदाराला त्याचे मतदान कार्ड (ओळखपत्र) घरपोच किंवा मतदान केंद्रावर बोलावून त्याला सुपूर्द करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र, ज्यांच्याकडे याची जबाबदारी आहे ते मतदाराला ओळखपत्र आले याची तर कल्पना देतच नाही. उलट कुणी आपले मतदार कार्ड आले का, अशी विचारणा करण्यास गेले तर त्याला आपल्याकडील ४०-५० मतदार कार्ड देऊन यातील कुणाला तुम्ही ओळखता का? जर ओळखत असाल, तर त्यांचे मतदान कार्ड तुम्ही त्यांच्याकडे पोहचवून द्या, अशी अजब युक्ती लढविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

अनेकांना कित्येक वर्षांपासून मतदान ओळखपत्रच नाहीआजही शहरात व जिल्ह्यात असे अनेक मतदार आहेत, की ज्यांनी गेल्या चार-पाच वर्षापूवीपासूनच मतदार ओळखपत्रासाठी नाव दिले (फार्म भरला). मात्र, त्यानंतरही त्यांच्याकडे ते ओळखपत्र आजवर आले नाही. या लोकांचे नाव मतदार यादीत असून त्या यादीत त्यांचे छायाचित्रही आहेत. मात्र, मतदार ओळखपत्र मतदारापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी असलेले शिक्षक अथवा इतर शासकीय कर्मचाºयांकडून याचे वाटपच झाले नसल्याचेही तितकेच वास्तव आहे. तसेच छायाचित्र नाही, असे मतदारही मोठ्या प्रमाणावर आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक