शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Lok Sabha Election 2019; निवडणूक ‘प्लॅन’साठी पोलिसांची ‘फिल्डिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:11 IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत काही उपद्रवी तत्त्व आपत्तीजनक माहिती आणि अफवा पसरवून वाद उभा करण्याच्या कामात गुंतले आहे. पोलिसांनी याला पद्धतशीरपणे हाताळण्यासाठी ‘फुल प्रूफ फिल्डींग’ लावली आहे.

ठळक मुद्देवादग्रस्त नेत्यांवर राहणार कडक नजरविशेष टीम गठित

जगदीश जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या रणधुमाळीत काही उपद्रवी तत्त्व आपत्तीजनक माहिती आणि अफवा पसरवून वाद उभा करण्याच्या कामात गुंतले आहे. हा त्यांच्या निवडणुकीच्या ‘प्लॅन‘चा एक भाग असू शकतो असा पोलिसांना संशय आहे. या माध्यमातून शहरातील कायदा व सुव्यवस्थेत बाधा निर्माण केली जाऊ शकते. त्यामुळे शहर पोलिसातही खळबळ उडाली आहे. तेव्हा पोलिसांनी याला पद्धतशीरपणे हाताळण्यासाठी ‘फुल प्रूफ फिल्डींग’ लावली आहे.गेल्या आठवड्यात पोलिसांसमोर दोन वाद आलेत. पहिले प्रकरण धंतोली येथील बचत भवनातील स्ट्राँग रुमशी संबंधित होते. स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम मशीन ठेवताना सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे आणि अज्ञात व्यक्तीद्वारा मोबाईल क्लिपींग तयार करण्याचे प्रकरण होते. या प्रकरणात काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे तक्रार केली आहे. या आधारावर तहसीलदाराने तक्रार केली असून धंतोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासात खरा प्रकार उघडकीस आला आहे. उमेदवाराच्या जवळच्या व्यक्तीनेच ही क्लिपींग बनवल्याची बाब उघडकीस आली आहे. लोकमतने मंगळवारी हा प्रकार समोर आणताच शहर पोलीस आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.दुसरे प्रकरण पीरिपाचे नेते जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याचे होय. या प्रकरणामुळेही भाजपसह महिलांमध्ये तीव्र रोष आहे. दोन्ही प्रकरणाचे आकलन केल्यानंतर पोलीस ‘हाय अलर्ट’वर आहे. ११ एप्रिल रोजी शहरात मतदान आहे. ९ एप्रिल रोजी प्रचार तोफा थंडावणार आहेत. पोलिसांना असा संशय आहे की, मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने उपद्रवी तत्त्व शांतता भंग करण्याचे काम करीत आहेत. ते अफवांना अधिक पसरवित प्रशासन आणि निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि वाद निर्माण होऊ शकतात. कायदा -सुव्यवस्थेत बाधा निर्माण करण्यासाठीच दुष्प्रचाराचा आसरा घेतला जात आहे. याला रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी सायबर सेलसोबतच गुप्त नेटवर्कलाही अलर्ट केले आहे. यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम नेता आणि त्याच्याशी संबंधित लोकांवर नजर ठेवून आहे. पोलिसांनी वादग्रस्त नेत्यांची एक यादी तयार केली आहे. त्यांच्या पार्श्वभूमीच्या आधारावर आवश्यक पाऊल उचलले जात आहे.

अफवा पसरवणाऱ्यांना सोडणार नाहीसध्याच्या परिस्थितीशी पोलीस अवगत आहेत. पोलिसांनी प्रत्येक स्तरावर अशा लोकांशी निपटण्याची योजना तयार केली आहे. त्यांची ओळख करून योग्य बंदोबस्त केला जाईल. अफवा पसरवून निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणाऱ्या नेत्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. काही भागात विशेष दक्षता बाळगली जात आहे. सायबर सेललाही सक्रिय करण्यात आले आहे. ते सोशल मीडियासह इतर माध्यमांवर नजर ठेवत आहे.- डॉ. भूषणकुमार उपाध्यायपोलीस आयुक्त, नागपूर शहरभाषणांवरही लागले कानजयदीप कवाडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पोलीस नेत्यांची भाषणे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यावरही नजर ठेवून आहेत. नागरिकांमध्ये द्वेष आणि असंतोष निर्माण करणाºया नेत्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे पोलिसांनी ठरवले आहे. पोलिसांना असा संशय आहे की, येणाºया दिवसात हा प्रकार आणखी वाढू शकतो. काही नेते अशा भाषणातूनच परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करू इच्छितात, अशा नेत्यांवर पोलिसांची कडक नजर आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019