शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

Lok Sabha Election 2019 : नागपुरात घट, रामटेकमध्ये जोश कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 8:12 PM

लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही नागपूरसारख्या मेट्रोपॉलिटीन मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत घट झाली. तर विस्ताराने अफाट व दुर्गम भागाचा समावेश असणाऱ्या रामटेक मतदारसंघात मात्र मतदारांनी आपला जोश हायच ठेवला. नागपुरात ५४.७४ टक्के म्हणजेच २०१४ च्या तुलनेत २.३८ टक्के कमी मतदान झाले. तर रामटेकमध्ये ६२.१२ टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्यावेळी येथे ६२.६४ टक्के मतदान झाले होते.

ठळक मुद्देहायप्रोफाईल लढतीनंतरही मतदारांना खेचण्यात अपयशमतदार यादीतील घोळाचा फटका कमी निकालाचा कुणाला ‘दे धक्का’ ?नागपूर - ५४.७४ टक्केरामटेक- ६२.१२टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही नागपूरसारख्या मेट्रोपॉलिटीन मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत घट झाली. तर विस्ताराने अफाट व दुर्गम भागाचा समावेश असणाऱ्या रामटेक मतदारसंघात मात्र मतदारांनी आपला जोश हायच ठेवला. नागपुरात ५४.७४ टक्के म्हणजेच २०१४ च्या तुलनेत २.३८ टक्के कमी मतदान झाले. तर रामटेकमध्ये ६२.१२ टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्यावेळी येथे ६२.६४ टक्के मतदान झाले होते.नागपुरात भाजपा नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसकडून माजी खासदार नाना पटोले यांच्यात ‘हायप्रोफाईल’ लढत होती. या लढतीकडे देशाचे लक्ष होते. त्यामुळे येथे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी भाजपा व काँग्रेस हे दोन्ही पक्ष ‘बूथ मॅनेजमेंट’ वरून शत प्रतिशत मतदान होण्यासाठी जोरात कामाला लागले होते. निवडणूक विभागही अधिक सतर्क होता. विशेष म्हणजे या वेळी मतदानाची वेळ तासभराने वाढविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही नागपुरातील मतांची टक्केवारी घटली. २०१४ मध्ये १९ लाख ७८४ मतदारांपैकी १० लाख ८५ हजार ७६५ मतदारांनी (५७.१२टक्के ) मतदान केले होेते. यावेळी २१ लाख ६० हजार २१७ मतदारांपैकी ११ लाख ८२ हजार ५०७ मतदारांनी (५४.७४ टक्के ) हक्क बजावला. यावरून २.३८ टक्के मतदान कमी झाले असले तरी झालेल्या मतदार संख्येचा विचार करता ९६ हजार ७४२ मतदानाची प्रत्यक्ष भर पडली आहे. नागपुरात मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ होता. अनेकांची नावेच गहाळ होती. काहींच्या नावात त्रुटी होत्या. तर एकाच कुटुंबातील व्यक्तींचे मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर देण्यात आले होते. या सर्व बाबींचा मतदानावर परिणाम झाला. यात ४४ अंशांवर गेलेल्या उन्हानेही घाम फोडला.रामटेकमध्ये मात्र उमेदवारांची फारशी चर्चा नसताना, प्रचाराचा तेवढा जोर नसताना मतदारांचा जोश कायम राहिला. २०१४ मध्ये १६ लाख ७७ हजार २६६ मतदारांपैकी १० लाख ५० हजार ६४० मतदारांनी (६२.६४ टक्के ) हक्क बजावला होता. या वेळी १९ लाख २१ हजार ७४ मतदारांपैकी ११ लाख ९३ हजार ३०७ मतदारांनी (६२.१२ टक्के) हक्क बजावला. यावरून मतदानात ०.५२ टक्क्यांची किंचिंतशी घट झाली असली तरी प्रत्यक्ष मतदानात १ लाख ४२ हजार ७२० मतांची भर पडली आहे. यावरून ग्रामीण भागातील मतदार हा मतदानाबाबत शहरी मतदारांपेक्षा अधिक जागरूक असल्याचे दिसून आले आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019