शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात ‘टोळ’चा धुमाकूळ : काटोल, सावनेर, मौदा उपविभाग प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 02:12 IST

जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुक्यात सोमवारी तर कळमेश्वर, सावनेर, कामठी व नागपूर (ग्रामीण) तालुक्यात मंगळवारी वाळवंटीय टोळ (डेझर्ट लोकस्ट)चे थवे मोठ्या प्रमाणात आढळून आले.

ठळक मुद्दे नुकसान कमी असल्याचा कृषी विभागाचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुक्यात सोमवारी तर कळमेश्वर, सावनेर, कामठी व नागपूर (ग्रामीण) तालुक्यात मंगळवारी  वाळवंटीय टोळ (डेझर्ट लोकस्ट)चे थवे मोठ्या प्रमाणात आढळून आले. टोळच्या या धूमाकुळामुळे ग्रामीण भगाात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, नियंत्रणासाठी प्रशासन कामाला लागले आहे. सध्या शेतात खरीप किंवा रबी पिके नसल्याने पिकांच्या नुकसानीची शक्यता कमी असल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली. मात्र, संत्रा व मोसंबीच्या बागांसह भाजीपाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यावर नियंत्रण मिळविणे जिल्हा प्रशासन व कृषी विभागासाठी आव्हानात्मक असून, केवळ जुजबी उपाययोजना केल्या जात आहे.जिल्ह्यात नरखेड तालुक्यातील ताराउतारा, खलानगोन्द्री व खापा (घुडन) शिवारात सोमवारी सायंकाळी टोळ आढळून आली. ताराउतारा भागातील टोळचे थवे वरूड (जिल्हा अमरावती) तर खापा (घुडन) शिवारातील थवे काटोल मार्गे कळमेश्वर तालुक्याच्या दिशेने निघाले. मंगळवारी  ही टोळ कळमेश्वर तालुक्यातील उपरवाही, कोहळी, सावनेर तालुक्यातील खापरखेडा, दहेगाव (रंगारी), कामठी तालुक्यातील कोराडी, लोणखैरी, नांदा, नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील  घोगली, गुमथळा (गुमथी) तसेच फेटरी, खडगाव शिवारात आढळून आली.काही थव्यांच्या स्थलांतराची दिशा नागपूर शहराकडे तर काहींची कामठी व सावनेर शहराकडे होती, अशी माहिती शेतकºयांनी दिली. ती केळवद (ता. सावनेर) शिवारात तसेच मौदा तालुक्यातील काही रेवराल व पारडी शिवारात आढळून आल्याचे काहींनी सांगितले. या टोळने बहुतांश शिवारातील वांगी, भेंडी, टमाटर व इतर भाजीपाल्याच्या पिकांची तसेच संत्रा, मोसंबी, लिंबू, पपईच्या झाडांची पाने मोठ्या प्रमाणात फस्त केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात ४५ वर्षाच्या कालखंडात टोळ पहिल्यांदाच बघायला मिळाली, अशी माहिती कृषी अधिकाºयांनी दिली. यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. राहुल वडस्कर यांनी सांगितले की, तांबूस रंगाचा हा वाळवंटीय टोळ नाकतोडा गटातील आहे. तृणधान्य हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. फळपिकेही त्यांचे खाद्य ठरू शकते. ही टोळ हवेच्या दिशेने प्रवास करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. या टोळच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाकडून कोणत्याही प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.टोळ नियंत्रण ही सामूहिक जबाबदारी असून, उपाययोजना सोपी आहे. टोळच्या मार्गात ज्यांची शेती आहे, त्यांनी निरीक्षण करावे. त्या दिवसापुरते शेतात उभे राहून काही वाजविले किंवा धूर केल्यास टोळ थांबत नाही. रात्री ती पिकांवर किंवा बागेतील झाडांवर बसणार नाही, याची काळजी घ्यावी. याबाबत शेतकऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सध्या शेतात पीक नसल्याने नुकसान नाही. टोळ खरीप हंगामात आली असती तर नुकसानीचे प्रमाण अधिक असते.- मिलिंद शेंडे,अधीक्षक, कृषी अधिकारी, नागपूर.शेतकऱ्यांनी निरीक्षण करणे गरजेचे आहे. रात्री टोळ जिथे बसेल, तिथे टायर जाळून धूर केल्यास ती नियंत्रणात येऊ शकते. निंबोळी अर्क व काही कीटकनाशकांची फवारणी केल्यास टोळ थांबत नाही. सध्या शेतात पीक नसल्याने आवाज किंवा धूर करून टोळला पळवून लावता येऊ शकते.- डॉ. राहुल वडस्कर, सहा. प्राध्यापक,कीटकशास्त्र विभाग, पी.के.व्ही. नागपूर.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी