शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

पुन्हा लॉकडाऊन, आर्थिक नुकसान कसे सोसायचे? व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 20:30 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने १५ दिवसांसाठी १ मेपासून पुन्हा कडक निर्बंध लादलेले आहे. ३० एप्रिलनंतर निर्बंध शिथिल होतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना होती. पण पुन्हा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे व्यावसायिक निराश झाले आहेत.

ठळक मुद्दे आर्थिक संकटातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने १५ दिवसांसाठी १ मेपासून पुन्हा कडक निर्बंध लादलेले आहे. ३० एप्रिलनंतर निर्बंध शिथिल होतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना होती. पण पुन्हा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे व्यावसायिक निराश झाले आहेत. १ मेपासून व्यवसाय सावरण्याची अपेक्षा असतानाच लॉकडाऊन घोषित केल्याने सर्वच व्यापाऱ्यांचा कोट्यवधींचा व्यवसाय आणखी ठप्प होणार आहेत. झालेले आणि पुढे होणारे आर्थिक नुकसान कसे सोसायचे, असा सवाल लहान व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला.

राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या एक वर्षापासून आहे. गतवर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांना तसेच लहान-मोठे व्यापारी, शेतकरी यांना फार मोठे आर्थिक, मानसिक नुकसान सोसावे लागले आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही लॉकडाऊनमुळे सण आणि उत्सवातील व्यवसाय बुडाले आहे. उत्पन्न काहीही नसताना खर्चांचा बोझा वाढतच असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गेल्यावर्षी लॉकडाऊननंतर दसरा दिवाळीत कशीबशी दुकाने आणि शोरूम सुरू झाली. पण दिवाळीनंतर व्यवसाय पुन्हा ठप्प झाला. यावर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस कोरोनाची चाहूल लागल्यानंतर व्यवसाय पूर्णत: मंदीत गेला. आता तर लग्नसमारंभ केवळ २५ जणांच्या उपस्थितीत होत असल्याने त्यावर अवलंबून असणारे मंडप-डेकोरेशन, कॅटरिंग, कापड व्यापारी, भांड व सराफा, बॅण्डबाजा आणि अन्य व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. याशिवाय हेअर सलून, टपरीधारक, चहा कँटिन, पानटपरी, खेळणी दुकान, हॉटेल-रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लर आदी व्यावसायिकांवर आर्थिक नुकसानीमुळे संकट आले आहे. सर्व व्यावसायिक व्यापाऱ्यांचा या लॉकडाऊनला विरोध आहे.

सध्या सर्वच दुकानांचे अर्थकारण बिघडले असताना व्यावसायिकांनी घेतलेले कर्ज व त्यांचे हप्ते थकीत असताना मार्चमध्ये लाईट बिल, मनपा कर यासाठी तगादा लावल्यामुळे हे बिल लवकर भरण्यासाठी नवीन कर्ज काढावे लागणार आहे. कर्जाच्या डोंगराबरोबरच दुकानातील कर्मचाऱ्यांचे पगार, दुकानाचा खर्च, घरप्रपंच, दैनंदिन रोजीरोटीचा मासिक खर्चसुद्धा भागविणे अशक्य होत आहे. हा खर्च भागवण्यासाठीसुद्धा कर्जच काढावे लागणार आहे. त्यामुळे सर्व व्यापारी तिहेरी कर्जात अडकले असताना हा नवीन लॉकडाऊन व्यापाऱ्यांसाठी अस्मानी संकट ठरणार आहे.

 

नुकसान भरपाई कशी होणार

किराणा दुकाने सकाळी ११ पर्यंत सुरू असल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. याशिवाय किराणा वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ठोकमध्येच अनेक वस्तूंचे दर वाढले आहेत. लॉकडाऊनमुळे नुकसान भरपाई कशी होणार, हा गंभीर प्रश्न आहे.

प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा संघ.

 

सराफांना कोट्यवधींचे नुकसान

गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सण व उत्सवातील व्यवसाय बुडाला आहे. बँकांचे कर्ज, कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्चाचा भार सहन करावा लागत आहे. व्यवसायाअभावी सराफांना कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दुकाने सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

राजेश रोकडे, सचिव, सोना-चांदी ओळ कमिटी.

 

कापडाचा व्यवसाय ठप्प

लॉकडाऊनमुळे कापड व्यावसायिकांना लग्नसराईच्या सिझनला मुकावे लागले. त्यामुळे विक्रीसाठी मागविलेला माल पडून आहे. ठोक आणि वितरकांना कापडाची रक्कम द्यावी लागत आहे. बँकांचे वाढते कर्ज व हप्त्यांमुळे संकट वाढले आहे.

अजय मदान, माजी अध्यक्ष, गांधीबाग कापड व्यापारी असोसिएशन.

 

वस्तूंची विक्री कशी करणार

लॉकडाऊनमुळे दुकानदारांकडे किराणा वस्तूंची साठा पडून आहे. दुकाने सकाळी ११ पर्यंत सुरू राहत असल्याने विक्री कशी करायची, हा प्रश्न आहे. बाहेरून माल येणे बंद असल्याने अनेक वस्तूंचा तुटवडा जाणवत असून आर्थिक नुकसान वाढले आहे.

शिवप्रताप सिंह, वरिष्ठ उपाध्यक्ष, इतवारी किराणा व्यापारी असोसिएशन.

 

संकटातील व्यापाऱ्यांना मदत करा

वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यापारी संकटात आले आहेत. पुढे दुकाने सुरू झाल्यानंतरही सुरळीत होण्यास वेळ लागेल. अनेक महिन्यांपर्यंत आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. त्यामुळे संकटात असलेल्या व्यापाऱ्यांना राज्य शासनाने पॅकेजरूपी मदत करावी.

अश्विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार