शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

मानद वन्यजीव रक्षकासाठी लॉबिंग!

By admin | Updated: July 15, 2016 03:05 IST

सध्या वन विभागात मानद वन्यजीव रक्षक पदासाठी चांगलीच स्पर्धा रंगली आहे. यात कुणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची शिफारस हातात घेऊन मैदानात उतरले आहे,

आजी-माजी मैदानात : वर्षभरापूर्वीच संपला कार्यकाळ जीवन रामावत नागपूर सध्या वन विभागात मानद वन्यजीव रक्षक पदासाठी चांगलीच स्पर्धा रंगली आहे. यात कुणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची शिफारस हातात घेऊन मैदानात उतरले आहे, तर कुणी थेट मुंबई मंत्रालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे वन विभागातील या मानाच्या पदासाठी जोरदार ‘लॉबिंग’ सुरू झाले असून, यात अनेक आजी-माजी मानद वन्यजीव रक्षकांचा समावेश असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षभरापासून राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच नवीन नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्य शासनाने मागील २१ मार्च २०१२ रोजी तीन वर्षांसाठी राज्यातील २७ जिल्ह्यांसाठी २८ मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केली होती. शिवाय पुन्हा ९ आॅक्टोबर २०१२ रोजी उर्वरित १२ जिल्ह्यातील १२ मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, या सर्व मानद वन्यजीव रक्षकांचा कार्यकाळ हा २१ मार्च २०१५ आणि ९ आॅक्टोबर २०१५ रोजी संपला आहे. मात्र असे असताना मागील वर्षभरापासून राज्यात नवीन मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. माहिती सूत्रानुसार गत सहा महिन्यांपूर्वी नवीन मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्यांसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. यात राज्य शासनाने सध्याच्या वन्यजीव रक्षकांकडून त्यांनी मागील तीन वर्षांत केलेल्या कार्याचा अहवाल मागितला होता. तसेच नागपूरशेजारच्या पेंच व्याघ्र प्रकल्प येथे राज्यभरातील सर्व मानद वन्यजीव रक्षकांची एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सर्व मानद वन्यजीव रक्षकांनी भाग घेतला होता. तसेच त्यांनी वन विभागासमक्ष आपल्या कामाचे सादरीकरण केले होते. यानंतर त्या सादरीकरणाच्या आधारे प्रत्येकाला गुण देण्यात आले. यात चांगले गुण मिळणाऱ्यांची पुनर्नियुक्ती करून, इतरांना डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यानुसार राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून मंत्रालयाकडे अहवालही गेला असल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्याला डच्चू मिळूनये म्हणून वन विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न चालविले आहे. नागपूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते आणि रोहित कारू यांच्या पैकी कुंदन हाते यांची पुनर्नियुक्ती पक्की मानली जात आहे. मात्र त्याचवेळी कारू यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, कारू यांचा कार्यकाळ हा अनेक घटनांनी विवादित राहिला आहे. त्यांनी मागील तीन वर्षांत वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या कामांपेक्षा वन अधिकाऱ्यांना खूश ठेवण्यासाठीच अधिक परिश्रम घेतले असल्याचे बोलले जात आहे. कोण असतो, मानद वन्यजीव रक्षक मानद वन्यजीव रक्षक वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्याप्रमाणेच एक महत्त्वाचा घटक असतो. मात्र तो वन अधिकरी किंवा वन कर्मचारी नसतो. त्याची राज्य शासनातर्फे तीन वर्षांसाठी नियुक्ती केली जाते. त्यामुळे ‘मानद वन्यजीव रक्षक’ हे वन विभागातील मानाचे पद मानले जाते. मात्र अनेकजण स्वत: वन अधिकारी असल्याच्या तोऱ्यात वावरून या पदाचा दुरुपयोग करीत असल्याची उदाहरणे पुढे आली आहेत. या पदाला कुठे तरी गालबोट लागण्याची भीती निर्माण झाली आहे. हा धोका लक्षात घेता, यावेळी राज्य शासनाला मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच वन विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बोट धरून या स्पर्धेत उभे असलेल्या लोकांपासून विशेष सावध राहावे लागणार आहे.