शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

राज्य सहकारी बँकेद्वारे पीक कर्ज; जिल्हा बँकांना कमिशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 10:42 IST

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करण्यास प्राधान्य देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा बँकेऐवजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला कर्जवाटपाचे अधिकार बहाल केले आहेत.

ठळक मुद्देतीन जिल्हा बँकांचे विलिनीकरण नाही 

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करण्यास प्राधान्य देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा बँकेऐवजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला कर्जवाटपाचे अधिकार बहाल केले आहेत.शुक्रवारी मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त निर्णय घेतला आहे. बैठकीत राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर, नाबार्डचे अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.नागपूर, वर्धा आणि बुलढाणा जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे या बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी पुढे आला होता. पण जिल्हा बँकांचा एनपीए पाहता कमी वेळात या बँकांच्या विलिनीकरणाच्या नियमांची पूर्तता करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेण्यात आला.बीसी मॉडेलचा राज्य बँकेचा प्रस्तावबैठकीत अनास्कर यांनी कर्जवाटपासाठी बिझनेस करस्पॉन्डन्स (बीसी) मॉडेलचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेतर्फे मांडण्यात आला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या मॉडेलनुसार शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी नाबार्डकडून येणारा निधी आता राज्य सहकारी बँकेकडे येणार आहे. अर्थात बीसी मॉडेल म्हणून राज्य सहकारी बँक काम करणार आहे. कर्ज जिल्हा बँकच देईल, पण नियंत्रण राज्य बँकेचे राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्हा बँकेचा एनपीए ६७ टक्के आणि वर्धा बँकेचा एनपीए १०० टक्के तसेच बुलडाणा जिल्हा बँकेचा एनपीए जास्त आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार या तिन्ही बँकांना शेतकऱ्यांना थेट कर्जवाटपाचे अधिकार नाहीत. त्यामुळे राज्य बँक बीसी मॉडेल म्हणून काम करणार आहे.जिल्हा बँकांना कर्जवाटप व वसुलीसाठी कमिशनशेतकऱ्यांना कर्जवाटप त्रिस्तरीय यंत्रणेद्वारे सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातूनच होणार आहे. शेतकºयांचे अर्ज स्वीकारणे, शिफारस, छाननी, कर्ज वसुलीचे काम जिल्हा बँकांना करावे लागणार आहे. अर्थात जिल्हा बँक पुरवठादार म्हणून काम करणार आहे. या सर्व अर्जावर अंतिम प्रक्रिया राज्य बँकेचे अधिकारी करतील. प्रक्रियेनंतर जिल्हा बँक आणि नंतर सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून राज्य बँकेतर्फे शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येणार आहे. सर्व प्रक्रियेत कर्ज मंजुरीचे अधिकार राज्य बँकेकडे राहणार आहे. जिल्हा बँकांना कर्ज मंजूर रकमेच्या एक टक्का आणि कर्ज वसुलीसाठी अर्धा टक्का कमिशन मिळणार आहे.

एनपीए जास्त, जिल्हा बँकांचे विलिनीकरण नाहीनागपूर, वर्धा, बुलढाणा या तिन्ही जिल्हा बँकेचा एनपीए जास्त असल्यामुळे या बँकांचे कमी वेळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण सध्या शक्य नाही. पण शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य बँक शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव दोन दिवसात नाबार्डकडे पाठविण्यात येणार आहे. वर्धा जिल्हा बँकेचा एनपीए १०० टक्के असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार वर्धेत एक महिन्यात राज्य बँकेची शाखा सुरू करण्यात येणार आहे. नाबार्डच्या माध्यमातून वर्धेतील शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.- विद्याधर अनास्कर,मुख्य प्रशासक,महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई.

टॅग्स :Farmerशेतकरी