शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

राज्य सहकारी बँकेद्वारे पीक कर्ज; जिल्हा बँकांना कमिशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 10:42 IST

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करण्यास प्राधान्य देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा बँकेऐवजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला कर्जवाटपाचे अधिकार बहाल केले आहेत.

ठळक मुद्देतीन जिल्हा बँकांचे विलिनीकरण नाही 

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करण्यास प्राधान्य देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा बँकेऐवजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला कर्जवाटपाचे अधिकार बहाल केले आहेत.शुक्रवारी मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त निर्णय घेतला आहे. बैठकीत राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर, नाबार्डचे अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.नागपूर, वर्धा आणि बुलढाणा जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे या बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी पुढे आला होता. पण जिल्हा बँकांचा एनपीए पाहता कमी वेळात या बँकांच्या विलिनीकरणाच्या नियमांची पूर्तता करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेण्यात आला.बीसी मॉडेलचा राज्य बँकेचा प्रस्तावबैठकीत अनास्कर यांनी कर्जवाटपासाठी बिझनेस करस्पॉन्डन्स (बीसी) मॉडेलचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेतर्फे मांडण्यात आला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या मॉडेलनुसार शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी नाबार्डकडून येणारा निधी आता राज्य सहकारी बँकेकडे येणार आहे. अर्थात बीसी मॉडेल म्हणून राज्य सहकारी बँक काम करणार आहे. कर्ज जिल्हा बँकच देईल, पण नियंत्रण राज्य बँकेचे राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्हा बँकेचा एनपीए ६७ टक्के आणि वर्धा बँकेचा एनपीए १०० टक्के तसेच बुलडाणा जिल्हा बँकेचा एनपीए जास्त आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार या तिन्ही बँकांना शेतकऱ्यांना थेट कर्जवाटपाचे अधिकार नाहीत. त्यामुळे राज्य बँक बीसी मॉडेल म्हणून काम करणार आहे.जिल्हा बँकांना कर्जवाटप व वसुलीसाठी कमिशनशेतकऱ्यांना कर्जवाटप त्रिस्तरीय यंत्रणेद्वारे सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातूनच होणार आहे. शेतकºयांचे अर्ज स्वीकारणे, शिफारस, छाननी, कर्ज वसुलीचे काम जिल्हा बँकांना करावे लागणार आहे. अर्थात जिल्हा बँक पुरवठादार म्हणून काम करणार आहे. या सर्व अर्जावर अंतिम प्रक्रिया राज्य बँकेचे अधिकारी करतील. प्रक्रियेनंतर जिल्हा बँक आणि नंतर सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून राज्य बँकेतर्फे शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येणार आहे. सर्व प्रक्रियेत कर्ज मंजुरीचे अधिकार राज्य बँकेकडे राहणार आहे. जिल्हा बँकांना कर्ज मंजूर रकमेच्या एक टक्का आणि कर्ज वसुलीसाठी अर्धा टक्का कमिशन मिळणार आहे.

एनपीए जास्त, जिल्हा बँकांचे विलिनीकरण नाहीनागपूर, वर्धा, बुलढाणा या तिन्ही जिल्हा बँकेचा एनपीए जास्त असल्यामुळे या बँकांचे कमी वेळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण सध्या शक्य नाही. पण शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य बँक शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव दोन दिवसात नाबार्डकडे पाठविण्यात येणार आहे. वर्धा जिल्हा बँकेचा एनपीए १०० टक्के असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार वर्धेत एक महिन्यात राज्य बँकेची शाखा सुरू करण्यात येणार आहे. नाबार्डच्या माध्यमातून वर्धेतील शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.- विद्याधर अनास्कर,मुख्य प्रशासक,महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई.

टॅग्स :Farmerशेतकरी