शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

१५०० डॉक्टरांच्या भरवश्यावर ३ कोटी पशुंचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : व्हेटर्नरी काऊंसिल ऑफ इंडियाच्या निकषानुसार पाच हजार पशुंच्या मागे एका पशुधन विकास अधिकाऱ्याची गरज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : व्हेटर्नरी काऊंसिल ऑफ इंडियाच्या निकषानुसार पाच हजार पशुंच्या मागे एका पशुधन विकास अधिकाऱ्याची गरज आहे. राज्यात २०१८मध्ये झालेल्या पशुगणनेनुसार ३ कोटींवर पशुधन आहे तर पशुधन विकास अधिकाऱ्यांची २,१९२ पदे मंजूर आहेत. सध्या यातील केवळ १,५००च्या जवळपास पशुधन अधिकारी कार्यरत आहेत. अशातच राज्यावर ‘बर्ड फ्लू’चे संकट आलेले आहे. यात पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या अपुऱ्या मनुष्यबळावरच राज्य बर्ड फ्ल्यूची लढाई लढत आहे.

विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे भरलेली नाहीत. २२ ऑगस्ट २०१९ रोजी ‘एमपीएससी’ने ४३५ पशुधन विकास अधिकारी पदांसाठी परीक्षा घेतली. त्या परीक्षेचा निकाल १३ महिन्यांपासून लागलेला नाही. ही प्रक्रिया कुठे थांबली, निकाल का लागत नाही? यासंदर्भात कुठूनही स्पष्ट केले जात नाही. २०१८च्या आकडेवारीनुसार राज्यात १,७६२ पशुवैद्यक होते. त्यानंतर कुठेही भरती झालेली नाही. दरम्यान, २ वर्षात १५० ते २०० अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे मनुष्यबळाचा मोठा बॅकलॉग विभागात आहे. नुकताच राज्यातील जनावरांवर लंम्पी आजाराने विळखा घातला होता. हजारो जनावरे याला बळी पडली होती. या आजारातून कसेबसे पशुधन सावरले तर बर्ड फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यातील अनेक भागात दररोज पक्षी मरत आहेत. पोल्ट्री व्यवसाय यामुळे अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. एका डॉक्टरवर ५ गावांचा भार आहे. पशुपालकांकडे जनावरांची काळजी घेण्यासाठी यंत्रणा नाही. दुसरीकडे हजारो पशुवैद्यक बेरोजगार आहेत. अल्प मनुष्यबळात बर्ड फ्लूचे संकट हाताळणे राज्यासाठी आव्हानात्मक झाले आहे.

- साडेपाच वर्षांचे व्हेटर्नरीचे प्रशिक्षण घेऊन हजारो व्हेटर्नरी डॉक्टर सध्या बेरोजगार आहेत. ४३५ पदांसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल १३ महिन्यांपासून रखडला आहे. व्हेटर्नरी काऊंसिल ऑफ इंडियाच्या निकषानुसार राज्यात ६,६०० पशुधन विकास अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. सरकारने राज्यात पदांची संख्या वाढवावी, एमपीएसीने घेतलेल्या परीक्षेचा निकाल तत्काळ लावून पदभरती करावी.

डॉ. संदीप इंगळे, उपाध्यक्ष, इंडियन व्हेटर्नरी असोसिएशन