शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

१५०० डॉक्टरांच्या भरवशावर ३ कोटी पशूंचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 12:09 IST

Nagpur News व्हेटर्नरी काऊंसिल ऑफ इंडियाच्या निकषानुसार राज्यात पाच हजार पशुंच्या मागे एका पशुधन विकास अधिकाऱ्याची गरज आहे.

ठळक मुद्देलंम्पी कसातरी सांभाळला, आता बर्ड फ्लूचे सावट ४३५ पदांच्या भरतीची १३ महिन्यांपासून प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : व्हेटर्नरी काऊंसिल ऑफ इंडियाच्या निकषानुसार पाच हजार पशुंच्या मागे एका पशुधन विकास अधिकाऱ्याची गरज आहे. राज्यात २०१८मध्ये झालेल्या पशुगणनेनुसार ३ कोटींवर पशुधन आहे तर पशुधन विकास अधिकाऱ्यांची २,१९२ पदे मंजूर आहेत. सध्या यातील केवळ १,५००च्या जवळपास पशुधन अधिकारी कार्यरत आहेत. अशातच राज्यावर ‘बर्ड फ्लू’चे संकट आलेले आहे. यात पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या अपुऱ्या मनुष्यबळावरच राज्य बर्ड फ्ल्यूची लढाई लढत आहे.

विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे भरलेली नाहीत. २२ ऑगस्ट २०१९ रोजी ‘एमपीएससी’ने ४३५ पशुधन विकास अधिकारी पदांसाठी परीक्षा घेतली. त्या परीक्षेचा निकाल १३ महिन्यांपासून लागलेला नाही. ही प्रक्रिया कुठे थांबली, निकाल का लागत नाही? यासंदर्भात कुठूनही स्पष्ट केले जात नाही. २०१८च्या आकडेवारीनुसार राज्यात १,७६२ पशुवैद्यक होते. त्यानंतर कुठेही भरती झालेली नाही. दरम्यान, २ वर्षात १५० ते २०० अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे मनुष्यबळाचा मोठा बॅकलॉग विभागात आहे. नुकताच राज्यातील जनावरांवर लंम्पी आजाराने विळखा घातला होता. हजारो जनावरे याला बळी पडली होती. या आजारातून कसेबसे पशुधन सावरले तर बर्ड फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यातील अनेक भागात दररोज पक्षी मरत आहेत. पोल्ट्री व्यवसाय यामुळे अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. एका डॉक्टरवर ५ गावांचा भार आहे. पशुपालकांकडे जनावरांची काळजी घेण्यासाठी यंत्रणा नाही. दुसरीकडे हजारो पशुवैद्यक बेरोजगार आहेत. अल्प मनुष्यबळात बर्ड फ्लूचे संकट हाताळणे राज्यासाठी आव्हानात्मक झाले आहे.

- साडेपाच वर्षांचे व्हेटर्नरीचे प्रशिक्षण घेऊन हजारो व्हेटर्नरी डॉक्टर सध्या बेरोजगार आहेत. ४३५ पदांसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल १३ महिन्यांपासून रखडला आहे. व्हेटर्नरी काऊंसिल ऑफ इंडियाच्या निकषानुसार राज्यात ६,६०० पशुधन विकास अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. सरकारने राज्यात पदांची संख्या वाढवावी, एमपीएसीने घेतलेल्या परीक्षेचा निकाल तत्काळ लावून पदभरती करावी.

डॉ. संदीप इंगळे, उपाध्यक्ष, इंडियन व्हेटर्नरी असोसिएशन

टॅग्स :cowगाय