शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘लाईव्ह’ शस्त्रक्रिया रुग्ण मृत्यूप्रकरण : त्या मृतदेहाचे शवविच्छेदन का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 21:17 IST

लठ्ठपणा कमी करण्यासाठी मेयोमध्ये आयोजित ‘बेरियाट्रिक सर्जरी’ कार्यशाळेत एका महिलेवर १५० डॉक्टरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध शल्यचिकित्सकांच्या हस्ते शस्त्रक्रिया झाली, परंतु चार दिवसांतच तिचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाच्या कारभाराकडे शंकेने पाहिले जात आहे. दुसरीकडे, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला असताना शवविच्छेदन का झाले नाही, असा प्रश्न या विषयातील तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाबाबत अधिष्ठात्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे.

ठळक मुद्देमेयोमध्ये चौकशी समिती स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लठ्ठपणा कमी करण्यासाठी मेयोमध्ये आयोजित ‘बेरियाट्रिक सर्जरी’ कार्यशाळेत एका महिलेवर १५० डॉक्टरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध शल्यचिकित्सकांच्या हस्ते शस्त्रक्रिया झाली, परंतु चार दिवसांतच तिचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाच्या कारभाराकडे शंकेने पाहिले जात आहे. दुसरीकडे, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला असताना शवविच्छेदन का झाले नाही, असा प्रश्न या विषयातील तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाबाबत अधिष्ठात्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) लठ्ठपणावरील शस्त्रक्रिया ‘बेरियाट्रिक सर्जरी’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन रविवार ३० आॅगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळेला मुख्य वक्ता म्हणून जालंधर येथून डॉ. जी.एस. जम्मू आले होते. कार्यशाळेत रश्मी सोनी (४०) या महिलेवर ‘बेरियाट्रिक सर्जरी’ करण्यात आली. त्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह) सभागृहात उपस्थित असलेल्या १५० डॉक्टरांना दाखवून मार्गदर्शन केले. शस्त्रक्रियेनंतर महिलेला वॉर्डात भरती केले. तिच्यावर शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. आतिश बन्सोड उपचार करीत होते. परंतु अचानक महिलेची प्रकृती खालावली आणि ४ आॅक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी महिलेवर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु महिलेच्या पतीने डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप लावल्याने हे प्रकरण समोर आले.सूत्रानुसार, कुटुंबीयांच्या आरोपाला घेऊन दुपारी ४ वाजताच्या सुमारास मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला. परंतु या विभागात मृतदेह ठेवताना वरिष्ठांची परवानगी घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे, मृतदेहाचे शवविच्छेदन न करताच मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. नातेवाईकांचा आवाज दाबण्यासाठी हा एक प्रयत्न होता, असे बोलले जात आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, मृत्यूचे कारण ‘सेप्सीस’ शरीरात पस निर्माण झाल्याचे दिले आहे. शिवविच्छेदन न करता असे कारण देणे योग्य आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला आहे. ‘सेप्सीस’ होण्याला कोण कारणीभूत आहे, हाही एक प्रश्न असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या प्रकरणाला घेऊन अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी चार सदस्यांची चौकशी समिती तयार केली आहे. त्याच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या समितीत रुग्णालयाबाहेरील तज्ज्ञ घेतले असते तर पारदर्शकता आली असती, असाही सूर उमटला आहे.

 

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Deathमृत्यू