शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

‘लाईव्ह’ शस्त्रक्रिया रुग्ण मृत्यूप्रकरण : त्या मृतदेहाचे शवविच्छेदन का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 21:17 IST

लठ्ठपणा कमी करण्यासाठी मेयोमध्ये आयोजित ‘बेरियाट्रिक सर्जरी’ कार्यशाळेत एका महिलेवर १५० डॉक्टरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध शल्यचिकित्सकांच्या हस्ते शस्त्रक्रिया झाली, परंतु चार दिवसांतच तिचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाच्या कारभाराकडे शंकेने पाहिले जात आहे. दुसरीकडे, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला असताना शवविच्छेदन का झाले नाही, असा प्रश्न या विषयातील तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाबाबत अधिष्ठात्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे.

ठळक मुद्देमेयोमध्ये चौकशी समिती स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लठ्ठपणा कमी करण्यासाठी मेयोमध्ये आयोजित ‘बेरियाट्रिक सर्जरी’ कार्यशाळेत एका महिलेवर १५० डॉक्टरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध शल्यचिकित्सकांच्या हस्ते शस्त्रक्रिया झाली, परंतु चार दिवसांतच तिचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाच्या कारभाराकडे शंकेने पाहिले जात आहे. दुसरीकडे, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला असताना शवविच्छेदन का झाले नाही, असा प्रश्न या विषयातील तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाबाबत अधिष्ठात्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) लठ्ठपणावरील शस्त्रक्रिया ‘बेरियाट्रिक सर्जरी’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन रविवार ३० आॅगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळेला मुख्य वक्ता म्हणून जालंधर येथून डॉ. जी.एस. जम्मू आले होते. कार्यशाळेत रश्मी सोनी (४०) या महिलेवर ‘बेरियाट्रिक सर्जरी’ करण्यात आली. त्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह) सभागृहात उपस्थित असलेल्या १५० डॉक्टरांना दाखवून मार्गदर्शन केले. शस्त्रक्रियेनंतर महिलेला वॉर्डात भरती केले. तिच्यावर शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. आतिश बन्सोड उपचार करीत होते. परंतु अचानक महिलेची प्रकृती खालावली आणि ४ आॅक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी महिलेवर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु महिलेच्या पतीने डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप लावल्याने हे प्रकरण समोर आले.सूत्रानुसार, कुटुंबीयांच्या आरोपाला घेऊन दुपारी ४ वाजताच्या सुमारास मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला. परंतु या विभागात मृतदेह ठेवताना वरिष्ठांची परवानगी घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे, मृतदेहाचे शवविच्छेदन न करताच मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. नातेवाईकांचा आवाज दाबण्यासाठी हा एक प्रयत्न होता, असे बोलले जात आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, मृत्यूचे कारण ‘सेप्सीस’ शरीरात पस निर्माण झाल्याचे दिले आहे. शिवविच्छेदन न करता असे कारण देणे योग्य आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला आहे. ‘सेप्सीस’ होण्याला कोण कारणीभूत आहे, हाही एक प्रश्न असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या प्रकरणाला घेऊन अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी चार सदस्यांची चौकशी समिती तयार केली आहे. त्याच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या समितीत रुग्णालयाबाहेरील तज्ज्ञ घेतले असते तर पारदर्शकता आली असती, असाही सूर उमटला आहे.

 

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Deathमृत्यू