शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘लाईव्ह’ शस्त्रक्रिया रुग्ण मृत्यूप्रकरण : त्या मृतदेहाचे शवविच्छेदन का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 21:17 IST

लठ्ठपणा कमी करण्यासाठी मेयोमध्ये आयोजित ‘बेरियाट्रिक सर्जरी’ कार्यशाळेत एका महिलेवर १५० डॉक्टरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध शल्यचिकित्सकांच्या हस्ते शस्त्रक्रिया झाली, परंतु चार दिवसांतच तिचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाच्या कारभाराकडे शंकेने पाहिले जात आहे. दुसरीकडे, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला असताना शवविच्छेदन का झाले नाही, असा प्रश्न या विषयातील तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाबाबत अधिष्ठात्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे.

ठळक मुद्देमेयोमध्ये चौकशी समिती स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लठ्ठपणा कमी करण्यासाठी मेयोमध्ये आयोजित ‘बेरियाट्रिक सर्जरी’ कार्यशाळेत एका महिलेवर १५० डॉक्टरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध शल्यचिकित्सकांच्या हस्ते शस्त्रक्रिया झाली, परंतु चार दिवसांतच तिचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाच्या कारभाराकडे शंकेने पाहिले जात आहे. दुसरीकडे, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला असताना शवविच्छेदन का झाले नाही, असा प्रश्न या विषयातील तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाबाबत अधिष्ठात्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) लठ्ठपणावरील शस्त्रक्रिया ‘बेरियाट्रिक सर्जरी’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन रविवार ३० आॅगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळेला मुख्य वक्ता म्हणून जालंधर येथून डॉ. जी.एस. जम्मू आले होते. कार्यशाळेत रश्मी सोनी (४०) या महिलेवर ‘बेरियाट्रिक सर्जरी’ करण्यात आली. त्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह) सभागृहात उपस्थित असलेल्या १५० डॉक्टरांना दाखवून मार्गदर्शन केले. शस्त्रक्रियेनंतर महिलेला वॉर्डात भरती केले. तिच्यावर शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. आतिश बन्सोड उपचार करीत होते. परंतु अचानक महिलेची प्रकृती खालावली आणि ४ आॅक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी महिलेवर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु महिलेच्या पतीने डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप लावल्याने हे प्रकरण समोर आले.सूत्रानुसार, कुटुंबीयांच्या आरोपाला घेऊन दुपारी ४ वाजताच्या सुमारास मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला. परंतु या विभागात मृतदेह ठेवताना वरिष्ठांची परवानगी घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे, मृतदेहाचे शवविच्छेदन न करताच मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. नातेवाईकांचा आवाज दाबण्यासाठी हा एक प्रयत्न होता, असे बोलले जात आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, मृत्यूचे कारण ‘सेप्सीस’ शरीरात पस निर्माण झाल्याचे दिले आहे. शिवविच्छेदन न करता असे कारण देणे योग्य आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला आहे. ‘सेप्सीस’ होण्याला कोण कारणीभूत आहे, हाही एक प्रश्न असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या प्रकरणाला घेऊन अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी चार सदस्यांची चौकशी समिती तयार केली आहे. त्याच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या समितीत रुग्णालयाबाहेरील तज्ज्ञ घेतले असते तर पारदर्शकता आली असती, असाही सूर उमटला आहे.

 

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Deathमृत्यू