शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

दारूची वाहतूक करणारा ट्रक पुलाखाली कोसळला : आगीत चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 22:56 IST

Accident औरंगाबादवरून नागपूर येथे विदेशी दारूची वाहतूक करीत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळला. पुलानजीक असलेल्या विद्युत खांबाच्या तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला.

ठळक मुद्देविद्युत तारेच्या स्पर्शाने आग लाखोंचा माल भस्मसात, वर्धा वाय पॉइंट उड्डाणपुलावरील घटना

 लोकमत न्यूज नेटवर्क

बुटीबोरी (नागपूर) : औरंगाबादवरून नागपूर येथे विदेशी दारूची वाहतूक करीत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळला. पुलानजीक असलेल्या विद्युत खांबाच्या तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल भस्मसात झाला. बुटीबोरी पोलीस स्टेशनअंतर्गत वर्धा वाय पॉइंटवरील उड्डाणपुलावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. हेमराज ऊर्फ पिंट्या देवीदास पिंपळे (२५, रा.मासळ, ता.लाखांदूर. जि. भंडारा) असे मृत चालकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक हेमराज हा नागपूर येथील भारतीय रोड कॅरिअर ट्रान्सपोर्टमध्ये दीड वर्षांपासून चालक म्हणून काम करीत होता. बुधवारी (दि.१२) तो नेहमीप्रमाणे औरंगाबादवरून अशोक लेल्यांड ट्रक (क्र. एमएच ४० वाय ८१२६) विदेशी दारू ओसीब्लू १८० एम एल.निपा असलेल्या ३०० पेट्या, तर बी सेवनचे ७५० एमएलच्या बॉटल असलेल्या ७०० पेट्या असा हजार पेट्या माल घेऊन नागपूरकडे निघाला. गुरुवारी मध्यरात्री जवळपास १२.१५ वाजताच्या सुमारास वर्धा वाय पॉइंटवरील उड्डाणपुलानजीक ट्रक पोहोचला असता, रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने, तो चुकीच्या मार्गाने उड्डाणपुलावरून चंद्रपूरच्या दिशेने निघाला. त्याच वेळी त्याचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलाखाली कोसळला. दरम्यान, पुलानजीक असलेल्या विद्युत खांबाच्या जिवंत तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने आग लागली.या घटनेत हेमराजला स्वत:ला वाचविण्यास संधी मिळाली नसल्याने, त्याचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, बुटीबोरीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक संजय भारती, आशिष मोरखडे, अनिल व्यवहारे, बाबुलाल वडमे, सतेंद्र रंगारी, नारायण भोयर, विनायक सातव, राकेश तालेवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. ट्रकमध्ये दारू असल्याने आगीचे रौद्र रूप होते. अग्निशमन दलाच्या दोन वाहनांच्या मदतीने पहाटे ५ वाजेच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविता आले.चार तासांचे रेस्क्यू ऑपरेशनदारूच्या ट्रकला लागलेली आग विझविण्यात पोलीस आणि अग्निशनम दलाला चार तासांचे रेस्क्यू ऑपरेशन करावे लागले. यात चालकांचे प्राण वाचविण्यात अपयश आल्याचे खंत ठाणेदार कोकाटे यांनी व्यक्त केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. सदर घटनेत दारू आणि ट्रक असा एकूण ८० लाख ६७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जळून भस्मसात झाल्याची नोंद घेण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संजय भारती या घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातfireआग