शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध पौर्णिमेला दारूविक्री सुरू राहणार : हायकोर्टाची बंदीवर स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:46 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी बंदीच्या आदेशावर स्थगिती दिल्यामुळे उद्या, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी (शनिवारी) जिल्ह्यामध्ये दारूविक्री सुरू राहणार आहे. कायदेशीररीत्या आदेश जारी न केल्याने सरकारला ही चपराक बसली आहे.

ठळक मुद्देपरमिट रुम असोसिएशनने दिले आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी बंदीच्या आदेशावर स्थगिती दिल्यामुळे उद्या, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी (शनिवारी) जिल्ह्यामध्ये दारूविक्री सुरू राहणार आहे. कायदेशीररीत्या आदेश जारी न केल्याने सरकारला ही चपराक बसली आहे.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या ६ मे रोजी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम १४२ (१) अंतर्गत आदेश जारी करून बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारच्या दारूविक्रीस बंदी केली होती. त्याविरुद्ध नागपूर जिल्हा परमिट रुम संघटनेच्यावतीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. हा मोघम स्वरूपाचा आदेश आहे. त्यामुळे हा आदेश अवैध ठरवून रद्द करण्यात यावा असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणावर अवकाशकालीन न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष १५ मे रोजी पहिली सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणातील प्राथमिक तथ्थे लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून यावर १७ मेपर्यंत ठोस उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, हे प्रकरण शुक्रवारी सुनावणीस आले असता जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ पोलीस उपायुक्तांचे २९ एप्रिलचे पत्र न्यायालयात सादर केले. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काही व्यक्ती दारू पिऊन कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकतात असे त्या पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. त्यामुळे हा आदेश जारी करण्यात आला असे न्यायालयाला सांगण्यात आले. या स्पष्टीकरणाने न्यायालयाने समाधान झाले नाही. परिणामी, न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता वादग्रस्त आदेशावर अंतरिम स्थगिती दिली व पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी प्रकरणावर १२ जून रोजी सुनावणी निश्चित केली. याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. सुमित बोडलकर तर, जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने अ‍ॅड. मयुरी देशमुख यांनी कामकाज पाहिले.रामनवमीला केलेली दारूबंदीही अवैध ठरली होतीगेल्या १२ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने रामनवमीच्या दिवशी दारूविक्री बंद ठेवण्याचा आदेशही अवैध ठरवून रद्द केला होता. तो निर्णय देताना ‘महाराष्ट्र वाईन मर्चंन्टस् असोसिएशन’ प्रकरणावरील निर्णयाचा आधार घेण्यात आला होता. या निर्णयानुसार, एखाद्या दिवशी दारूविक्री बंद ठेवणे गरजेचे वाटत असल्यास त्यासंदर्भात विस्तृत कारणे व ठोस पुराव्यांसह आदेश जारी करणे आवश्यक आहे. सदर प्रकरणामध्ये या निर्णयांकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आणि ते व हे प्रकरण समान असल्याचा दावा करण्यात आला.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयliquor banदारूबंदी