शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

वादळाचा तडाख्याने बत्ती गुल, शेकडाे झाडे काेसळली;  १५० झाडे पडली, विजेचे पाेलही पडले

By निशांत वानखेडे | Updated: June 7, 2023 21:01 IST

अनेक भागात विद्युत पुरवठा बाधित

नागपूर : बुधवारी झालेल्या जाेरदार वादळवाऱ्याने शहरात अस्ताव्यस्त स्थिती निर्माण झाली. शहरात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा विस्कळीत झाला. पूर्व नागपूरचा परिसर सर्वाधिक प्रभावित झाला. १५० पेक्षा अधिक ठिकाणी झाडे किंवा त्यांच्या फांद्या विद्युत तारांवर उन्मळून पडले. त्यामुळे ७९ विद्युत पाेलची माेडताेड झाली. यातील ७० पाेल पूर्व नागपूरचे तर सर्वरित ९ पाेल बुटीबाेरी परिसरातील आहेत. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला व अनेक भागात बत्ती गुल झाली.

दुपारी ३ वाजताच्या दरम्यान झालेल्या हलक्या पावसासह आलेल्या वादळामुळे गांधीबाग डिव्हीजनअंतर्गत वर्धमाननगर आणि आसपासच्या परिसरातील विद्युत पुरवठा विस्कळीत झाला हाेता. पारडी व सुभाननगर उपविभागाअंतर्गत सीए राेड, कावळापेठ, मुदलियार लेआउट, एचबी टाउन, सतरंजीपुरा, शांतिनगर परिसर सर्वाधिक प्रभावित झाले. जवळपास २० फिडरशी संबंधित परिसरात पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या दाव्यानुसार कर्मचाऱ्यांनी युद्धस्तरावर दुरुस्ती काम करीत सायंकाळी ६ वाजतापर्यंत १८ फिडरचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला. ७.३० पर्यंत इतर दाेन फिडरचा पुरवठा सुरू करण्यात आला. महापालिका व अग्निशमन विभागाच्या मदतीने पडलेली झाले हटवून दुरुस्ती काम करण्यात आले. यादरम्यान अनेक भागातील वीज पुरवठा बंद असल्याच्या तक्रारी रात्रीपर्यंत येत हाेत्या.

बुट्टीबाेरी भागात अनेक तास अंधार

वादळाचा तडाखा बुट्टीबाेरी परिसरालाही बसला. धानाेली गावात ३, वडगावात ४, शिरूर व कान्हाेली गावात प्रत्येक एक विद्युत पाेल नुकसानग्रस्त झाले. दुरुस्ती कार्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही समस्यांचा सामना करावा लागला.

पश्चिम नागपुरातही पुरवठा खंडित

पश्चिम नागपूरच्या बाेरगावस्थित गाेकुल हाऊसिंग साेसायटी, गाेरेवाडा, गिट्टीखदान, प्रशांत काॅलनी, जाफरनगर आदी परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचा त्रास वाढला हाेता. दरम्यान या परिसरात वीज खंडित हाेण्याची समस्या राेजचीच असल्याचे नागरिकांनी सांगितले. मंगळवारी रात्रीही अनेक वस्त्यांमध्ये अंधार पसरला हाेता. महावितरणच्या अधिकाऱ्यानुसार ट्रकमुळे वीजेचा ताराला नुकसान झाल्याने ही समस्या येत आहे.

मान्सूनपूर्व व्यवस्थापनावर प्रश्न

महावितरणद्वारे काेट्यवधी रुपये खर्च करून एप्रिलपासून मान्सूनपूर्व व्यवस्थापनाचे कार्य केले जाते. यामध्ये वीजेच्या तारांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे मुख्य काम असते. उन्हाळ्यात अनेकदा वीज पुरवठा खंडित करून दुरुस्ती काम केले जात असल्याचा दावा केला जाताे. मात्र बुधवारी ज्याप्रमाणे झाडांच्या फांद्या वीजेच्या तारांवर पडल्या व नुकसानग्रस्त झाल्या, त्यावरून दुरुस्तीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर