शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

माहिती न देताच बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेंटेनन्ससाठी किंवा कुठल्याही तांत्रिक कारणामुळे वीज बंद होत असेल तर त्याची लगेच ग्राहकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मेंटेनन्ससाठी किंवा कुठल्याही तांत्रिक कारणामुळे वीज बंद होत असेल तर त्याची लगेच ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती दिली जात असल्याचे महावितरणतर्फे सांगितले जाते. परंतु, वस्तुस्थिती वेगळीच आहे. वीज बंद होत आहे, मात्र त्याची कुठलीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे महावितरणची एसएमएस सेवा ही केवळ कागदावरच शिल्लक असल्याचे दिसून येते.

महावितरणतर्फे बुधवारी मेंटेनन्ससाठी वीज पुरवठा बंद केला जातो. याबाबतची माहिती ग्राहकांना आधीच एसएमएसच्या माध्यमातून दिली जात असल्याचा दावा महावितरणचे अधिकारी करतात. परंतु, लोक या दाव्याशी सहमत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, वीज जाणार असल्याची माहिती अगोदर मिळतच नाही. केवळ विजेचे बिलसंदर्भातच एसएमएस येतात. मेंटेनन्समुळे वीज बंद केली जात असल्याची माहिती कधीच मिळत नाही. बुधवारी वीज जाईल हे नागरिक गृहीत धरूनच असतात. ही शहरातील परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती तर याहून भयावह आहे. तेथील नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांना विजेसंदर्भात कुठलीच माहिती एसएमएसद्वारे मिळत नाही.

बॉक्स

- नोंदणीकृत मोबाईल नंबरवरच पाठविले जाते एसएमएस

महावितरणचे म्हणणे आहे की, प्रत्येक ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती पाठवली जाते. यासाठी त्या ग्राहकाचा नंबर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कित्येक ग्राहकांनी चुकीचा नंबर देऊन ठेवला आहे, तर काहींचे नंबर बदलले पण ते त्यांनी अपडेट केले नाही. कंपनीकडे उपलब्ध असलेल्या नंबरवर एसएमएस बरोबर पाठविला जात आहे.