शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

माहिती न देताच बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेंटेनन्ससाठी किंवा कुठल्याही तांत्रिक कारणामुळे वीज बंद होत असेल तर त्याची लगेच ग्राहकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मेंटेनन्ससाठी किंवा कुठल्याही तांत्रिक कारणामुळे वीज बंद होत असेल तर त्याची लगेच ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती दिली जात असल्याचे महावितरणतर्फे सांगितले जाते. परंतु, वस्तुस्थिती वेगळीच आहे. वीज बंद होत आहे, मात्र त्याची कुठलीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे महावितरणची एसएमएस सेवा ही केवळ कागदावरच शिल्लक असल्याचे दिसून येते.

महावितरणतर्फे बुधवारी मेंटेनन्ससाठी वीज पुरवठा बंद केला जातो. याबाबतची माहिती ग्राहकांना आधीच एसएमएसच्या माध्यमातून दिली जात असल्याचा दावा महावितरणचे अधिकारी करतात. परंतु, लोक या दाव्याशी सहमत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, वीज जाणार असल्याची माहिती अगोदर मिळतच नाही. केवळ विजेचे बिलसंदर्भातच एसएमएस येतात. मेंटेनन्समुळे वीज बंद केली जात असल्याची माहिती कधीच मिळत नाही. बुधवारी वीज जाईल हे नागरिक गृहीत धरूनच असतात. ही शहरातील परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती तर याहून भयावह आहे. तेथील नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांना विजेसंदर्भात कुठलीच माहिती एसएमएसद्वारे मिळत नाही.

बॉक्स

- नोंदणीकृत मोबाईल नंबरवरच पाठविले जाते एसएमएस

महावितरणचे म्हणणे आहे की, प्रत्येक ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती पाठवली जाते. यासाठी त्या ग्राहकाचा नंबर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कित्येक ग्राहकांनी चुकीचा नंबर देऊन ठेवला आहे, तर काहींचे नंबर बदलले पण ते त्यांनी अपडेट केले नाही. कंपनीकडे उपलब्ध असलेल्या नंबरवर एसएमएस बरोबर पाठविला जात आहे.