शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

माहिती न देताच बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेंटेनन्ससाठी किंवा कुठल्याही तांत्रिक कारणामुळे वीज बंद होत असेल तर त्याची लगेच ग्राहकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मेंटेनन्ससाठी किंवा कुठल्याही तांत्रिक कारणामुळे वीज बंद होत असेल तर त्याची लगेच ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती दिली जात असल्याचे महावितरणतर्फे सांगितले जाते. परंतु, वस्तुस्थिती वेगळीच आहे. वीज बंद होत आहे, मात्र त्याची कुठलीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे महावितरणची एसएमएस सेवा ही केवळ कागदावरच शिल्लक असल्याचे दिसून येते.

महावितरणतर्फे बुधवारी मेंटेनन्ससाठी वीज पुरवठा बंद केला जातो. याबाबतची माहिती ग्राहकांना आधीच एसएमएसच्या माध्यमातून दिली जात असल्याचा दावा महावितरणचे अधिकारी करतात. परंतु, लोक या दाव्याशी सहमत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, वीज जाणार असल्याची माहिती अगोदर मिळतच नाही. केवळ विजेचे बिलसंदर्भातच एसएमएस येतात. मेंटेनन्समुळे वीज बंद केली जात असल्याची माहिती कधीच मिळत नाही. बुधवारी वीज जाईल हे नागरिक गृहीत धरूनच असतात. ही शहरातील परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती तर याहून भयावह आहे. तेथील नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांना विजेसंदर्भात कुठलीच माहिती एसएमएसद्वारे मिळत नाही.

बॉक्स

- नोंदणीकृत मोबाईल नंबरवरच पाठविले जाते एसएमएस

महावितरणचे म्हणणे आहे की, प्रत्येक ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती पाठवली जाते. यासाठी त्या ग्राहकाचा नंबर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कित्येक ग्राहकांनी चुकीचा नंबर देऊन ठेवला आहे, तर काहींचे नंबर बदलले पण ते त्यांनी अपडेट केले नाही. कंपनीकडे उपलब्ध असलेल्या नंबरवर एसएमएस बरोबर पाठविला जात आहे.