शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
2
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
3
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
4
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
5
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
6
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
7
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
8
GSTच्या नव्या बदलांमुळे IPL 2026ची तिकीटे महागणार; पाहा किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?
9
कोकणात भाजप-शिंदेसेनेत फोडाफोडी? कुडाळमध्ये नगराध्यक्षासह ६ नगरसेवकांचं भाजपामधून निलंबन 
10
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
11
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
12
GST On Cars: दिवाळीत कार खरेदी करणाऱ्यांना गिफ्ट; GST कपातीमुळे कोणती कार घेणं ठरणार फायदेशीर?
13
GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण! तुमच्या शहरतील आजचे ताजे भाव काय?
14
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
15
Ajit Pawar: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका
16
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त
17
३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल!
18
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
19
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
20
‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी

अ‍ॅसिडमुळे जनजीवन धोक्यात

By admin | Updated: November 17, 2014 00:58 IST

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील टाकावू अ‍ॅसिडयुक्त रसायनांमुळे माणसे, जनावरे, शेती व पाण्याचे स्त्रोत धोक्यात असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

हायकोर्टात याचिका : बुटीबोरी औद्योगिक वसाहतीसंदर्भात केंद्र व राज्य शासनाला नोटीसनागपूर : बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील टाकावू अ‍ॅसिडयुक्त रसायनांमुळे माणसे, जनावरे, शेती व पाण्याचे स्त्रोत धोक्यात असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. गणेश बोडखे असे याचिकाकर्त्याचे नाव असून बुटीबोरी येथे त्यांची शेती आहे. बुटीबोरी एमआयडीसी येथे अनेक रासायनिक उद्योग असून या उद्योगांतील अ‍ॅसिडयुक्त पाणी नजीकच्या वाठोडा नाल्यात सोडले जाते. रासायनिक घनकचरा मोकळ्या जागेवर फेकला जातो. वाठोडा नाला वेणा नदीला मिळतो. यामुळे वेणा नदीचे पाणी दूषित झाले आहे. विहिरी व पाण्याचे अन्य स्त्रोतही प्रदूषित झाले आहेत. विषारी पाणी पिल्यामुळे माणसांना विविध गंभीर आजारांनी ग्रासले आहे. जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. रासायनिक घनकचरा फेकला जातो ती जनावरे चारण्याची जमीन आहे. शेतीची उत्पादन क्षमता घटली आहे. अ‍ॅसिडमुळे पिके जळून जात आहेत. यासंदर्भात राज्य शासन व उद्योगांना अनेकदा पत्रे लिहिली, पण अद्याप काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण विभागाचे सचिव, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पोलीस अधीक्षक व बुटीबोरी पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून १० डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मनोज कारिया यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)