शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

साधुसंतांचे जीवन परोपकारासाठीच असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : साधुसंत परोपकारासाठी जगतात, नद्या परोपकारासाठीच वाहतात, सूर्य परोपकारासाठीच प्रकाश देतो, चंद्र परोपकारासाठीच शीतलता प्रदान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : साधुसंत परोपकारासाठी जगतात, नद्या परोपकारासाठीच वाहतात, सूर्य परोपकारासाठीच प्रकाश देतो, चंद्र परोपकारासाठीच शीतलता प्रदान करतो आणि वृक्ष परोपकारासाठीच फळ देतात. अशा तऱ्हेने साधुसंत परोपकारासाठी आपले आयुष्य बहाल करत असल्याचे आचार्य वैराग्यनंदी गुरुदेव यांनी विश्वशांती अमृत ऋषभोत्सवात सांगितले. श्री धर्मराजश्री तपोभूमी दिगंबर जैन ट्रस्ट आणि धर्मतीर्थ विकास समितीद्वारे आयोजित ऑनलाइन धर्मसभेत ते मार्गदर्शन करत होते.

आचार्य गुप्तीनंदी यांनी धर्मकार्याला आपल्या उपस्थितीने उजळले आहे. सर्वांना या कार्यात जोडण्यासाठी पुरुषार्थ केला, करत आहेत आणि पुढेही करत राहणार असल्याचे वैराग्यंनदी यावेळी म्हणाले. सद्य:स्थितीत संपूर्ण जगात कोरोनाचा प्रकोप आहे. त्याअनुषंगाने विश्वशांतीकरिता आचार्य गुप्तीनंदी जाप करत आहेत, विधान करत आहेत. ही भावना तीर्थंकर प्रकृतीचे द्योतक आहे. संपूर्ण जग सुखी व्हावे, असे जो विचार करतो तो खऱ्या अर्थाने सुखी होतो. जगतात आपल्याला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागतात. वर्तमानात जगात सर्वात मोठी समस्या कोरोना महामारी आहे. जैन धर्मात लहान लहान जिवांची सुरक्षा प्रतिपादित केली आहे. यात सात वेदनीय कर्माचे बंधन सांगितले आहे. प्रथम तीर्थंकर आदिनाथ आणि अंतिम तीर्थंकर महावीर भगवंताने अनेकांतवाद, स्यादवाद सिद्धांत सांगितले आहे. आदिनाथांनी असी-मसी-कृषीचा संदेश दिला आहे. सोबतच अक्षरविद्या आणि अंकविद्येची व्यवस्था सांगितली आहे. त्यांनी एक ते दहा अंक आणि जिनवाणीचे ६४ रिद्धी यंत्र सांगितले. त्यांनी आपली पुत्री ब्राह्मी, सुंदरी यांना ज्ञान दिले. याच विद्येच्या आधारावर विश्वाचे संचलन होत आहे. नारळाचे वृक्ष थोडेसे पाणी पिते आणि आपण त्याच्याकडून शंभर वर्षापर्यंत उत्तम प्रतिचे पाणी घेतो. नारळाचे पाणी पिल्यावर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. भगवंताने आपणास सगळेच दिले आहे. काहीच दिले नाही, ही कल्पनाच खोटी आहे. भगवंताने ज्ञान दिले, तेच आता साधू देत आहेत. गुरु आपल्या भक्तांविषयी सतत चिंतन करत असतात. धार्मिक व्यवस्था निरंतर आहे. मृत्यूवर विजय संपादन करण्यासाठी आचार्य गुप्तीनंदी महामृत्युंजयाचे विधान करत आहेत. साधुसंतांचे आशीर्वाद असतील तर मृत्यूचे भय नसेल. भयाने रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शांतीधारेच्या कवचाने व्यक्तीला कशाचीच उणीव राहत नाही. मंत्रांच्या ध्वनीने नकारात्मकता कमी होते. कुटुंबीयांसह बसून पूजा विधान कराल तर कुटुंबात एकता, सौर्हाद, प्रेम वाढेल आणि एकमेकांसाठी वेळ असल्याची भावना दृढ होईल. साधूंची गर्जना कर्णपटलावर आली की समजा साधूने स्पर्श केला आहे. भक्तामर स्तोत्रातील २३व्या श्लोकात भगवंताने मृत्यूला जिंकल्याचे सांगितले आहे. आदिनाथाने मृत्यूवर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे, हा श्लोक अवश्य वाचा. ३०वे श्लोक वाचले तर ऑक्सिजन पातळी वाढेल. ३३वा श्लोक वाचल्यास भगवंताच्या समोशरण १८ हजार फुलांची वर्षा होते. या श्लोकाने ताप नष्ट होईल. सर्व प्रकारचे आजार ४५व्या श्लोकाने दूर होतात, असे वैराग्यनंदी यावेळी म्हणाले. याप्रसंगी आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांनीही मार्गदर्शन केले. चंद्रशेखर पाटनी नेरीवाले यांनी गुरुदेवांना अर्घ्य समर्पित केले. धर्मसभेचे संचालन स्वरकोकिळा गणिनी आर्यिका आस्थाश्री माता यांनी केले.

.......