शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

साधुसंतांचे जीवन परोपकारासाठीच असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : साधुसंत परोपकारासाठी जगतात, नद्या परोपकारासाठीच वाहतात, सूर्य परोपकारासाठीच प्रकाश देतो, चंद्र परोपकारासाठीच शीतलता प्रदान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : साधुसंत परोपकारासाठी जगतात, नद्या परोपकारासाठीच वाहतात, सूर्य परोपकारासाठीच प्रकाश देतो, चंद्र परोपकारासाठीच शीतलता प्रदान करतो आणि वृक्ष परोपकारासाठीच फळ देतात. अशा तऱ्हेने साधुसंत परोपकारासाठी आपले आयुष्य बहाल करत असल्याचे आचार्य वैराग्यनंदी गुरुदेव यांनी विश्वशांती अमृत ऋषभोत्सवात सांगितले. श्री धर्मराजश्री तपोभूमी दिगंबर जैन ट्रस्ट आणि धर्मतीर्थ विकास समितीद्वारे आयोजित ऑनलाइन धर्मसभेत ते मार्गदर्शन करत होते.

आचार्य गुप्तीनंदी यांनी धर्मकार्याला आपल्या उपस्थितीने उजळले आहे. सर्वांना या कार्यात जोडण्यासाठी पुरुषार्थ केला, करत आहेत आणि पुढेही करत राहणार असल्याचे वैराग्यंनदी यावेळी म्हणाले. सद्य:स्थितीत संपूर्ण जगात कोरोनाचा प्रकोप आहे. त्याअनुषंगाने विश्वशांतीकरिता आचार्य गुप्तीनंदी जाप करत आहेत, विधान करत आहेत. ही भावना तीर्थंकर प्रकृतीचे द्योतक आहे. संपूर्ण जग सुखी व्हावे, असे जो विचार करतो तो खऱ्या अर्थाने सुखी होतो. जगतात आपल्याला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागतात. वर्तमानात जगात सर्वात मोठी समस्या कोरोना महामारी आहे. जैन धर्मात लहान लहान जिवांची सुरक्षा प्रतिपादित केली आहे. यात सात वेदनीय कर्माचे बंधन सांगितले आहे. प्रथम तीर्थंकर आदिनाथ आणि अंतिम तीर्थंकर महावीर भगवंताने अनेकांतवाद, स्यादवाद सिद्धांत सांगितले आहे. आदिनाथांनी असी-मसी-कृषीचा संदेश दिला आहे. सोबतच अक्षरविद्या आणि अंकविद्येची व्यवस्था सांगितली आहे. त्यांनी एक ते दहा अंक आणि जिनवाणीचे ६४ रिद्धी यंत्र सांगितले. त्यांनी आपली पुत्री ब्राह्मी, सुंदरी यांना ज्ञान दिले. याच विद्येच्या आधारावर विश्वाचे संचलन होत आहे. नारळाचे वृक्ष थोडेसे पाणी पिते आणि आपण त्याच्याकडून शंभर वर्षापर्यंत उत्तम प्रतिचे पाणी घेतो. नारळाचे पाणी पिल्यावर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. भगवंताने आपणास सगळेच दिले आहे. काहीच दिले नाही, ही कल्पनाच खोटी आहे. भगवंताने ज्ञान दिले, तेच आता साधू देत आहेत. गुरु आपल्या भक्तांविषयी सतत चिंतन करत असतात. धार्मिक व्यवस्था निरंतर आहे. मृत्यूवर विजय संपादन करण्यासाठी आचार्य गुप्तीनंदी महामृत्युंजयाचे विधान करत आहेत. साधुसंतांचे आशीर्वाद असतील तर मृत्यूचे भय नसेल. भयाने रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शांतीधारेच्या कवचाने व्यक्तीला कशाचीच उणीव राहत नाही. मंत्रांच्या ध्वनीने नकारात्मकता कमी होते. कुटुंबीयांसह बसून पूजा विधान कराल तर कुटुंबात एकता, सौर्हाद, प्रेम वाढेल आणि एकमेकांसाठी वेळ असल्याची भावना दृढ होईल. साधूंची गर्जना कर्णपटलावर आली की समजा साधूने स्पर्श केला आहे. भक्तामर स्तोत्रातील २३व्या श्लोकात भगवंताने मृत्यूला जिंकल्याचे सांगितले आहे. आदिनाथाने मृत्यूवर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे, हा श्लोक अवश्य वाचा. ३०वे श्लोक वाचले तर ऑक्सिजन पातळी वाढेल. ३३वा श्लोक वाचल्यास भगवंताच्या समोशरण १८ हजार फुलांची वर्षा होते. या श्लोकाने ताप नष्ट होईल. सर्व प्रकारचे आजार ४५व्या श्लोकाने दूर होतात, असे वैराग्यनंदी यावेळी म्हणाले. याप्रसंगी आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांनीही मार्गदर्शन केले. चंद्रशेखर पाटनी नेरीवाले यांनी गुरुदेवांना अर्घ्य समर्पित केले. धर्मसभेचे संचालन स्वरकोकिळा गणिनी आर्यिका आस्थाश्री माता यांनी केले.

.......