शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांना परवाना आवश्यक : अन्यथा पाच लाखांचा दंड अन् कारावास !

By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 31, 2024 20:13 IST

परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदीचे आवाहन

नागपूर: अन्न पदार्थांचे उत्पादन, हाताळणी, साठवणूक, वितरण, विक्री आणि आयातीसाठी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा-२००६ देशभरात लागू करण्यात आला. या कायद्यात फुड परवाना नसेल तर पाच लाखांचा दंड अन् कारावासाची तरतूद आहे. आता घरी तयार होऊन विकल्या जाणाऱ्या केक, चॉकलेट्स या खाद्यपदार्थांसाठीही परवाना घेणे बंधनकारक आहे. परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदीचे आवाहन विभागाने केले आहे. उत्पादनावर गुणवत्तादर्शक टॅग नसेल तर ५ लाखांपर्यंत दंड आणि कारावास होऊ शकतो.

या कायद्याचे अनेक फायदे आहेत. लोकांना गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळतात. आधी नुकसान भरपाईची अनेक प्रकरण कोर्टात प्रलंबित राहायची. त्याऐवजी आता नव्या कायद्यानुसार फक्त गंभीर प्रकरणेच कोर्टात जातात. उर्वरित प्रकरणे विभागीय स्तरावर ५ ते ६ महिन्यांत निकाली काढण्याची तरतूद आहे. हा कायदा अधिक सक्षम बनविण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.

अन्न परवान्याच्या नोंदणीसाठी करा ऑनलाईन अर्जनागपूर जिल्ह्यात वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा कमी असलेले जवळपास ५५ हजार (परवाना शुल्क १०० रुपये) आणि १२ लाखांपेक्षा जास्त उलाढाल असलेले परवानाधारक ११ हजारांहून (२ हजार रुपये परवाना शुल्क) जास्त आहेत. वार्षिक उलाढाल २० कोटींपेक्षा अधिक असलेल्यांना ७५०० रुपयांत वार्षिक परवाना मिळतो. अन्न परवाना नूतनीकरण प्रक्रिया अतिशय सोपी आहे. कायदेशीर कागदपत्रे पोर्टलमध्ये लॉगिन करून वापरकर्त्याला आयडी आणि पासवर्ड भरावा लागतो. किमान दस्तऐवज आणि सहजपणे एफएसएसएआय नूतनीकरण अर्ज प्रक्रिया पूर्ण होते. मूलभूत नोंदणी सात दिवसांच्या आत आणि राज्य व व केंद्रीय परवान्याचे ३० दिवसात नूतनीकरण केले जाऊ शकते. 

परवान्याचे प्रमाणपत्र दुकानाच्या दर्शनी भागात लावण्याची अन्न व औषध प्रशासन विभागाची अट आहे. त्यामुळे ग्राहकांना त्या दुकानातून खाद्यपदार्थ विश्वासाने खरेदी करता येईल. याशिवाय निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ ग्राहकांना मिळाल्यास त्या दुकानदाराची तक्रार येईल.

ग्राहकांनीही घ्यावी काळजीग्राहकांनी परवानाधारक हॉटेल किंवा व्यावसायिकांकडून खाद्यपदार्थ खरेदी करावे. त्यामुळे ग्राहकांचे हक्क अबाधित राहतात. ग्राहकांना निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करता येते. त्यानुसार त्यांना न्याय मिळू शकतो.

परवाना घेऊनच व्यवसाय करावाहॉटेल, रेस्टॉरंट आणि किरकोळ व घाऊक खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेऊनच व्यवसाय करावा. विभागातर्फे खाद्यपदार्थ विक्रेते प्रतिष्ठानांची नेहमीच तपासणी करून त्रूटीच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. परवाना घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. त्याकरिता विभागाने पुढाकार घेतला आहे. अभय देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग.

टॅग्स :nagpurनागपूर