शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

दीक्षाभूमीवर खोदलेला खड्डा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या महिनाभरापूर्वी समतल करा

By आनंद डेकाटे | Updated: July 11, 2024 19:08 IST

समता सैनिक दलासह विविध संघटनांची मागणी : आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीक्षाभूमीवर भूमिगत पार्किंगसाठी खोदलेला खड्डा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या महिनाभरापूर्वीपर्यंत समतल करण्यात यावा, तसेच आंदोलकांवरिल गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे, अशी मागणी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, दलित पँथर, रिपब्लिकन मुव्हमेंटसह विविध संघटनांनी केली. या सर्व संघटनांच्या एका प्रतिनिधीमंडळाने यासंदर्भात गुरूवारी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले.

दीक्षाभूमीवर विकास आकामांतर्गत भूमिगत पार्किंग केली जात होती. त्याला आंबेडकरी अनुयायांनी आक्षेप घेतला. ते काम बंद पाडण्यासाठी गेल्या १ जुलै रोजी दीक्षाभूमीवर मोठे आंदोलन झाले. कामाच्या ठिकाणी असलेल्या साहित्याची तोडफोड झाली. अनुयायांची भावना लक्षात घेऊन सरकारने भूमिगत पार्कींगचे काम रद्द केले. सध्या येथील काम बंद आहे. परंतु भूमिगत पार्किंगसाठी येथे मोठे खोदकाम झाल्याने मोठा खड्डा पडला आहे. सध्या पावसाचे दिवस आहे. या खड्ड्यात पाणी जमा होऊन ते स्मारकाच्या सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हा खड्डा तातडीने बुजविणे आवश्यक आहे. यासोबतच येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी होणारी गर्दी पाहता हा खड्डा कार्यक्रमाच्या किमान महिनाभरापूर्वी बुजविणे आवश्यक असल्याची बाब शिष्टमंडळाने निवेदनातून लक्षात आणून दिली. तसेच दीक्षाभूमीवरील आंदोलन हे उत्स्फुर्त होते. लोकभावनेचा आदर करीत आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावे, अशी मागणीही यात करण्यात आली.

शिष्टमंडळात समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक सुनील सारीपुत्त, प्रकाश दार्शनिक, अशोक बोंदाडे, एन.व्ही. ढोके, रितेश गायमुखे, भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बन्सोड, रिपब्लिकन मुव्हमेंटचे नरेश वाहाने, भारतीय बौद्ध महासभेचे अविनाश कठाणे, प्रमोद मून, धर्मपाल आवळे, बानाईचे जयंत इंगळे आदींचा सहभाग होता.

स्मारक समिती बरखास्त करादीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे समाजाची दिशाभूल केली जाते. शासनातर्फे मिळालेल्या पैशाची उधळपट्टी केली जाते. त्यामुळे शासनातर्फे मिळालेल्या निधीचे लेखापरिक्षण करण्यात यावे, तसेच स्मारक समिती बरखास्त करण्यात यावी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेकडे स्मारकाचे काम सोपवण्यात यावे, अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा शांतिनगर शाखेतर्फे करण्यात आली. शिष्टमंडळातर्फे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. शिष्टमंडळात गौतम रंगारी, दिलीप महाजन, नागसेन मेश्राम, संजय उके, प्रदीप भिवगडे, अविनाश नारनवरे, बीना नगरारे आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर