शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

महाबोधी विहारासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:41 IST

जेव्हापासून बुद्ध आणि बाबासाहेब समजले तेव्हापासून बुद्ध धम्मासाठीच आयुष्य समर्पित केले. हे कार्य पुढेही असेच सुरू राहणार आहे. आज वयाची ८४ वर्षे पूर्ण केली तरी बरेच कार्य पुढे न्यायचे आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्ती लढ्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार,असा निर्धार दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केला.

ठळक मुद्देभदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा निर्धार

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जेव्हापासून बुद्ध आणि बाबासाहेब समजले तेव्हापासून बुद्ध धम्मासाठीच आयुष्य समर्पित केले. हे कार्य पुढेही असेच सुरू राहणार आहे. आज वयाची ८४ वर्षे पूर्ण केली तरी बरेच कार्य पुढे न्यायचे आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्ती लढ्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार,असा निर्धार दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केला.इंदोरा बुद्ध विहार सार्वजनिक संस्थेच्या वतीने गुरुवारी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा ८४ वा वाढदिवस व ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री नितीन राऊत, मनपा कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका स्नेहा निकोसे, ममता सहारे, अ‍ॅड. भास्कर धमगाये, अमित गडपायले, अशोक कोल्हटकर, अ‍ॅड. अजय निकोसे उपस्थित होते.भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांना शाल, स्मृतिचिन्ह, चिवरदान, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त सुधीर फुलझेले, विलास गजघाटे व प्राचार्य डॉ. पी.सी. पवार यांनीही भदंत ससाई यांचा सत्कार केला. यावेळी इतिहासकार प्रा. एम.एम. देशमुख, सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मध्य प्रदेशातील सागर विद्यापीठाचे माजी उपकुलपती प्रा. एन.एस. गजभिये, विदर्भ विकास महामंडळाचे सदस्य देवाजी तोफा यांचा भदंत ससाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.भंते नागघोष यांनी बुद्धवंदना घेतली. प्रास्ताविक अरुण नागदिवे यांनी केले. संचालन अशोक जांभुळकर यांनी केले. स्वागत संस्थेचे सचिव अमित गडपायले व उपाध्यक्ष अ‍ॅड. भास्कर धमगाये यांनी केले.इंदोरा बुद्ध विहार येथे भदंत ससाई यांना मान्यवर व नागरिकंकडून शुभेच्छा देण्याचे सत्र दिवसभर सुरू होते.कुणाचाही द्वेष करू नकातत्पूर्वी ‘आज जगाला शांतता, प्रेम, करुणा आणि मैत्रीची खऱ्या अर्थाने गरज आहे, तेव्हा कुणाचाही द्वेष करू नका’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये जीवन जगण्याचे सामर्थ्य आहे. आपले जीवन सुकर घडवायचे असेल तर त्यांचे विचार आत्मसात करा, असा धम्मसंदेश भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिला.

टॅग्स :nagpurनागपूर