शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

नागपुरात लेटलतिफीला विभागप्रमुख जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:52 IST

महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची मनमानी व लेटलतिफीची आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी गंभीर दखल घेतली आहे. कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्यास यासाठी विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल. यासाठी विभागप्रमुखांना आपल्या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी वर्तनात सुधारणा न केल्यास विभागप्रमुखांनी याची माहिती द्यावी. अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्याचा इशारा आयुक्तांनी बुधवारी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिला.

ठळक मुद्देमनपा आयुक्तांची तंबी : हलचल रजिस्टर ठेवण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची मनमानी व लेटलतिफीची आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी गंभीर दखल घेतली आहे. कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्यास यासाठी विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल. यासाठी विभागप्रमुखांना आपल्या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी वर्तनात सुधारणा न केल्यास विभागप्रमुखांनी याची माहिती द्यावी. अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्याचा इशारा आयुक्तांनी बुधवारी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिला.उपस्थित अधिकाऱ्यांना कर्र्मचारी उशिरा येत असल्याबाबत धारेवर धरले. बायोमेट्रिक मशीन लावल्यानंतरही अनेक कर्मचारी पंचिंग केल्यानंतर दुपारी कार्यालयात उपस्थित नसतात. त्यानंतर सायंकाळी पंचिंग करून घरी जातात. कर्मचारी उपस्थित राहत नसल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कार्यालयात येण्याची वेळ सकाळी १० वाजताची असताना, अनेक कर्मचारी १०.१५ ते १०.३० पर्यंत कार्यालयात येतात. सायंकाळी ५.४५ ला पंचिंग करून घरी जातात. कार्यालयीन वेळेत कर्मचारी कार्यालयात उपस्थित असणे आवश्यक आहे.जे कर्मचारी वा अधिकारी कार्यालयीन कामानिमित्ताने बाहेर फिल्डवर आहेत, त्यांनी हलचल रजिस्टरमध्ये नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी रजिस्टर ठेवून त्यांनी नोंदी ठेवा; अन्यथा संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.नाव, पद व जबाबदारीच्या पाट्या लागल्याकार्यालयातील कर्मचाऱ्यांचे नाव, पद व जबाबदारी याची माहिती असलेल्या पाट्या कर्मचाऱ्यांच्या टेबलवर लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली.फाईल तातडीने निकाली काढाकर्मचारी व अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईल प्रलंबित नसावी. फाईल मंजुरीसाठी आल्यानंतर ती ठरलेल्या कालावधीत निकाली काढली पाहिजे. कुणाच्याही टेबलवर फाईल पडून राहिल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही आयुक्तांनी दिला.भटकंतीला लागणार चापमहापालिका मुख्यालयात कर्मचारी व अधिकारी टेबलवर मिळत नाही.त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्यांना चकरा माराव्या लागतात.शहराच्या लांब भागातील येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना यामुळे हकनाक त्रास होतो. आयुक्तांच्या निर्देशामुळे कर्मचाऱ्यांच्या भटकंतीला चाप लागणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर