शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवा!

By admin | Updated: May 15, 2016 02:40 IST

आम्ही पाणी या समस्येचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. त्यामुळे आजचे संकट ओढवले आहे.

लोकमत जलमित्र अभियान : जलतज्ज्ञ के. के. मराठे यांचा सल्लानागपूर : आम्ही पाणी या समस्येचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. त्यामुळे आजचे संकट ओढवले आहे. मागील ५० वर्षांतील पावसाची आकडेवारी पाहता, पाऊस हा कधीच कमी पडलेला नाही. केवळ त्याचे चक्र बदलले आहे. वेळापत्रकात गडबड झाली आहे. पाऊस हा लहरी झाला आहे. त्यामुळे तो कधी एकाच दिवशी धो-धो पडतो आणि पुढील संपूर्ण महिना कोरडा जातो. यावर जल व्यवस्थापन हाच एकमेव पर्याय असून, त्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याची गरज आहे. असे मत जलतज्ज्ञ के. के. मराठे यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ ने राज्यभरात सुरू केलेल्या ‘जलमित्र’ अभियानातर्गंत मराठे यांची खास मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान मराठे यांनी ‘लोकमत’ च्या अभियानाचे कौतुक सुद्धा केले. ते पुढे म्हणाले, धो-धो कोसळणारा पाऊस जमिनीत मुरत नाही. पावसाचे सर्व पाणी नदी-नाल्यांमधून वाहून जाते. त्या पाण्यासोबत माती सुद्धा वाहून जाते. त्यामुळे ते सर्व पाणी अडवून त्याला जमिनीत जिरविणे, आज काळाची गरज ठरली आहे. त्यासाठी ‘माथा ते पायथा’ ही सर्वोत्तम शास्त्रोक्त पद्घत आहे. याच पद्घतीचा उपयोग करून सेंटर फॉर रुरल वेलफेअर, या संस्थेने मागील १९९७-९८ मध्ये राज्यभरात इंडो-जर्मन पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबविला होता. त्यात विदर्भातील सुमारे २५ पेक्षा अधिक गावांचा समावेश होता. आज त्या सर्व गावात मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. परंतु दुर्दैवाने तो कार्यक्रमच ठप्प पडला आहे. या कार्यक्रमात पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या मार्गात खंदकासारखे मोठमोठे खड्डे तयार करून, पाणी अडविल्या जाते. शिवाय शिवारातील दगडांचा उपयोग करून बांध तयार केला जातो. यानंतर नदीनाल्यांचे खोलीकरण केल्या जाते. यातून पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरत असल्याचा विश्वास यावेळी मराठे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)