शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

होळीसाठी झाडे तोडाल तर कायदेशीर कारवाई : मनपाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:34 IST

महापालिकेची परवानगी न घेताच होळीसाठी झाडे तोडाल, तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. कायद्यानुसार बेकायदा वृक्षतोडीबद्दल एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, तसेच एक हजार ते पाच हजार रुपये एवढा दंडही होऊ शकतो. बेकायदा वृक्षतोड आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूर महापालिकेने दिला आहे.

ठळक मुद्दे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षतोड न करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेची परवानगी न घेताच होळीसाठी झाडे तोडाल, तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. कायद्यानुसार बेकायदा वृक्षतोडीबद्दल एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, तसेच एक हजार ते पाच हजार रुपये एवढा दंडही होऊ शकतो. बेकायदा वृक्षतोड आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूर महापालिकेने दिला आहे.होळीसाठी सार्वजनिक रस्त्याच्या आजूबाजूची तसेच खासगी गृहनिर्माण संस्थांच्या आवारातील झाडे जाळण्यासाठी तोडली जाण्याची शक्यता असते. यामुळे झाडांची संख्या कमी होऊन पर्यावरणालाही हानी पोहचते. या बाबींना प्रतिबंध करण्यासाठी पालिकेच्या उद्यान खात्यातील संबंधित अधिकारी व कर्मचायांना सतर्क राहण्याचे तसेच अवैध वृक्षतोडीवर नजर ठेवण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५च्या कलम २१ मधील तरतुदींनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे किंवा तोडण्यासाठी कारणीभूत होणे हा अपराध असून या अपराधाकरिता कायद्यात शिक्षेची तरतूद आहे.होळीच्या दिवसात वृक्षतोड होऊ नये, यासाठी उद्यान विभागाचे उपउद्यान अधीक्षक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, उद्यान विद्या सहायक यांना ठिकठिकाणी लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी दिली आहे.नागपूर शहरात मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरू आहेत. यात मेट्रो रेल्वे, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास यासह अनेक सरकारी प्रकल्पांसाठी शेकडो झाडांचा बळी घेतला जातो. झाडांची संख्या कमी होत असताना दरवर्षी होळीसाठी झाडांची अवैध कत्तल होण्याची शक्यता असते. याचा पर्यावरणावर परिणाम होतो. त्यामुळे होळीसाठी झाडे तोडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. पर्यावरण संदर्भात मागील काही वर्षात जागृती आलेली आहे. परंतु अजूनही काही लोकांची अवैधरीत्या झाडे तोडण्याची मानसिकता आहे. अशा लोकांना कायद्याचा धाक आवश्यक असतो.टायरमुळे प्रदूषणनागपूर शहरात आता दिवसेंदिवस होळीची संख्या वाढत आहे. गेल्यावर्षी ही संख्या ९२० इतकी होती. वाईट प्रवृत्तीचे दहन म्हणून होळी पेटवली जाते. यात लाकडे तर पेटवली जातात परंतु काही लोक वाहनांचे टायर, कचरा व प्लास्टिक होळीत जाळतात यामुळे प्रदूषण होते. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. असे प्रकार टाळण्याची गरज आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाHoliहोळी