शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

होळीसाठी झाडे तोडाल तर कायदेशीर कारवाई : मनपाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:34 IST

महापालिकेची परवानगी न घेताच होळीसाठी झाडे तोडाल, तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. कायद्यानुसार बेकायदा वृक्षतोडीबद्दल एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, तसेच एक हजार ते पाच हजार रुपये एवढा दंडही होऊ शकतो. बेकायदा वृक्षतोड आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूर महापालिकेने दिला आहे.

ठळक मुद्दे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षतोड न करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेची परवानगी न घेताच होळीसाठी झाडे तोडाल, तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. कायद्यानुसार बेकायदा वृक्षतोडीबद्दल एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, तसेच एक हजार ते पाच हजार रुपये एवढा दंडही होऊ शकतो. बेकायदा वृक्षतोड आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूर महापालिकेने दिला आहे.होळीसाठी सार्वजनिक रस्त्याच्या आजूबाजूची तसेच खासगी गृहनिर्माण संस्थांच्या आवारातील झाडे जाळण्यासाठी तोडली जाण्याची शक्यता असते. यामुळे झाडांची संख्या कमी होऊन पर्यावरणालाही हानी पोहचते. या बाबींना प्रतिबंध करण्यासाठी पालिकेच्या उद्यान खात्यातील संबंधित अधिकारी व कर्मचायांना सतर्क राहण्याचे तसेच अवैध वृक्षतोडीवर नजर ठेवण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५च्या कलम २१ मधील तरतुदींनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे किंवा तोडण्यासाठी कारणीभूत होणे हा अपराध असून या अपराधाकरिता कायद्यात शिक्षेची तरतूद आहे.होळीच्या दिवसात वृक्षतोड होऊ नये, यासाठी उद्यान विभागाचे उपउद्यान अधीक्षक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, उद्यान विद्या सहायक यांना ठिकठिकाणी लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी दिली आहे.नागपूर शहरात मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरू आहेत. यात मेट्रो रेल्वे, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास यासह अनेक सरकारी प्रकल्पांसाठी शेकडो झाडांचा बळी घेतला जातो. झाडांची संख्या कमी होत असताना दरवर्षी होळीसाठी झाडांची अवैध कत्तल होण्याची शक्यता असते. याचा पर्यावरणावर परिणाम होतो. त्यामुळे होळीसाठी झाडे तोडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. पर्यावरण संदर्भात मागील काही वर्षात जागृती आलेली आहे. परंतु अजूनही काही लोकांची अवैधरीत्या झाडे तोडण्याची मानसिकता आहे. अशा लोकांना कायद्याचा धाक आवश्यक असतो.टायरमुळे प्रदूषणनागपूर शहरात आता दिवसेंदिवस होळीची संख्या वाढत आहे. गेल्यावर्षी ही संख्या ९२० इतकी होती. वाईट प्रवृत्तीचे दहन म्हणून होळी पेटवली जाते. यात लाकडे तर पेटवली जातात परंतु काही लोक वाहनांचे टायर, कचरा व प्लास्टिक होळीत जाळतात यामुळे प्रदूषण होते. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. असे प्रकार टाळण्याची गरज आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाHoliहोळी