शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा शुभारंभ : स्वच्छतेची घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 20:34 IST

स्वच्छता ही लोकचळवळ निर्माण होण्यासाठी स्वत:पासून सुरूवात करणे गरजेचे आहे, असे मत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ करताना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जि.प. अधिकाऱ्यांनी काढला केर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छता ही लोकचळवळ निर्माण होण्यासाठी स्वत:पासून सुरूवात करणे गरजेचे आहे, असे मत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ करताना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना व उपस्थित कर्मचाऱ्यांना जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन केले.स्वच्छता ही सेवा- २०१९ या उपक्रमाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ संजय यादव यानंी श्रमदानाच्या माध्यमातून केला. यावेळी उपस्थित अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी प्रिया तेलकुंटे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे, जिल्हा आरोग्य अघिकारी डॉ. दीपक सेलोकर, समाजकल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता बी. व्ही. सयाम, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव हेमके तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ केला.पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी सन २०१७ पासून स्वच्छता ही सेवा उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असून या माध्यमातून शौचालयाचा नियमित वापर, स्वच्छतेसाठी बदल घडविणारे उपक्रम आणि सार्वजनीक ठिकाणी श्रमदान केले जात आहे. स्वच्छता ही सेवा- २०१९ मध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. या अभियानाची जिल्ह्यात २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अंमलबजावणी होणार आहे. या उपक्रमाची जिल्हाभर व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायतींना महाश्रमदानाचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहे. ग्रामस्थांनी ‘स्वच्छ व सुंदर गाव’ ही वैयक्तिक जबाबदारी समजून यात सहभागी व्हावे.अनिल किटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता), जि.प.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान