शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ठरला अखेरचा शनिवार गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 21:49 IST

शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २९ फेब्रुवारीपासून आठवड्यात पाचच दिवस काम करायचे आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर निर्णय घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. या निर्णयानुसार १५ फेब्रुवारीचा शनिवार शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अखेरचा शनिवार ठरला.

ठळक मुद्देपाच दिवसाच्या कामकाजामुळे कर्मचारी खूश : शासनाच्या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २९ फेब्रुवारीपासून आठवड्यात पाचच दिवस काम करायचे आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर निर्णय घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. या निर्णयानुसार १५ फेब्रुवारीचा शनिवार शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अखेरचा शनिवार ठरला. शासकीय कर्मचाऱ्यांनीही अखेरच्या शनिवारी आनंदात काम केले आणि सायंकाळी कामकाज संपल्यानंतर शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.२९ फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू होत असला तरी, १५ फेब्रुवारीचा शनिवार हा या महिन्यातील तिसरा शनिवार होता. या निर्णयापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुटी असल्याने कामकाजाचा हा अखेरचा शनिवार ठरला. यापुढे कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात शनिवार हा दिवस कधीही कामकाजाचा दिवस म्हणून येणार नाही. पण यातून ज्या सरकारी कार्यालयांना कारखाना कायदा किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक आहे त्यांना या शासन निर्णयाचा लाभ मिळणार नाही.नागपूर जिल्ह्यात राज्य शासनाची २८८ कार्यालये आहे. शहरात बहुतांश कार्यालये सिव्हील लाईन्स परिसरात आहे. एरवी सहा दिवस येथे वर्दळ असायची, पण आता आठवड्यात दोन दिवस या परिसरात शुकशुकाट राहणार आहे. राज्य शासनाचे ३० ते ३५ टक्के कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. २५ ते ३० टक्के कर्मचारी ४० ते ५० वयोगटात आहे. शासनाने २०१२ नंतर मोठ्या प्रमाणात भरतीला ब्रेक लावल्याने, शासकीय कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे. अतिरिक्त कामांचा भार कर्मचाऱ्यांवर वाढला आहे. त्यामुळे शासनाने दिलेली दोन दिवसाची सुटी योग्य असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. यापूर्वीही झाला होता ५ दिवसाचा आठवडाविशेष म्हणजे महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे ६ दिवस ठरविण्यात आले होते. तेव्हा १०.३० ते ५.३० अशी कामाची वेळ होती. परंतु सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना ५ दिवसाचा आठवडा करण्यात आला होता. जवळपास ६ महिने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवसाच्या सुट्याही मिळाल्या होत्या. परंतु हा निर्णय मागे घेऊन दुसरा आणि चौथा शनिवार सुटी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यत वाढविण्यात आली होती. आता परत २९ फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहणार आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारी