शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मागील पाच वर्षात वन्यप्राण्यांनी घेतले २१७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 19:26 IST

गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले.

ठळक मुद्देदोन हजारांवर नागरिक जखमी कोट्यवधींच्या पिकाची नासधूस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले.  माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. मागील पाच वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला, किती जखमी झाले, पीडित किंवा त्यांच्या नातेवार्इंकांना किती नुकसानभरपाई देण्यात आली, पिकांचे किती प्रमाणात नुकसान झाले, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१३ सालापासून ते डिसेंबर २०१७ पर्यंत राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१७ नागरिकांचा बळी गेला तर २ हजार १७६ नागरिक जखमी झाले. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईपोटी १४ कोटी ८ लाख रुपयांची मदत करण्यात आली. तर जखमींना ८ कोटी २४ लाख ५५ हजार रुपये देण्यात आले. सरासरी एका मृताच्या कुटुंबीयांना ६ लाख ४८ हजार ८४७ रुपयांची तर प्रत्येक जखमीला ३७ हजार ८९२ रुपयांची मदत मिळाली.पिकांच्या नुकसानीची लाखांहून अधिक प्रकरणेवन्यप्राण्यांनी शेतांमध्ये शिरून पिकांचे नुकसान करण्याचे प्रकारदेखील होताना दिसून येतात. गेल्या पाच वर्षांत अशाप्रकारे नुकसान झालेली १ लाख १४ हजार ३६३ प्रकरणे नोंदविण्यात आली. नुकसानभरपाईपोटी संबंधित शेतकऱ्यांना ४३ कोटी १४ लाख ९२ हजार रुपयांची मदत देण्यात आली.३० हजार पाळीव प्राणी भक्ष्यस्थानीएप्रिल २०१३ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ३० हजार ६२५ पाळीव प्राणी वन्यप्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. मरण पावलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई म्हणून १६ कोटी २५ लाख १६ हजार रुपयांची मदत करण्यात आली. तर ८३६ पाळीव जनावरे जखमी झाली व त्यांच्या मालकांना ९ लाख ४ हजारांची मदत देण्यात आली.वर्षनिहाय नागरिकांचे मृत्यू व जखमीवर्ष             मृत्यू              जखमी२०१३          ४६              ३९७२०१४          ३८              ४७१२०१५          ३९              ४८७२०१६          ५२               ६७४२०१७          ४२               १४७

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव