शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

राज्यात मागील पाच वर्षात वन्यप्राण्यांनी घेतले २१७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 19:26 IST

गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले.

ठळक मुद्देदोन हजारांवर नागरिक जखमी कोट्यवधींच्या पिकाची नासधूस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले.  माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. मागील पाच वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला, किती जखमी झाले, पीडित किंवा त्यांच्या नातेवार्इंकांना किती नुकसानभरपाई देण्यात आली, पिकांचे किती प्रमाणात नुकसान झाले, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१३ सालापासून ते डिसेंबर २०१७ पर्यंत राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१७ नागरिकांचा बळी गेला तर २ हजार १७६ नागरिक जखमी झाले. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईपोटी १४ कोटी ८ लाख रुपयांची मदत करण्यात आली. तर जखमींना ८ कोटी २४ लाख ५५ हजार रुपये देण्यात आले. सरासरी एका मृताच्या कुटुंबीयांना ६ लाख ४८ हजार ८४७ रुपयांची तर प्रत्येक जखमीला ३७ हजार ८९२ रुपयांची मदत मिळाली.पिकांच्या नुकसानीची लाखांहून अधिक प्रकरणेवन्यप्राण्यांनी शेतांमध्ये शिरून पिकांचे नुकसान करण्याचे प्रकारदेखील होताना दिसून येतात. गेल्या पाच वर्षांत अशाप्रकारे नुकसान झालेली १ लाख १४ हजार ३६३ प्रकरणे नोंदविण्यात आली. नुकसानभरपाईपोटी संबंधित शेतकऱ्यांना ४३ कोटी १४ लाख ९२ हजार रुपयांची मदत देण्यात आली.३० हजार पाळीव प्राणी भक्ष्यस्थानीएप्रिल २०१३ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ३० हजार ६२५ पाळीव प्राणी वन्यप्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. मरण पावलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई म्हणून १६ कोटी २५ लाख १६ हजार रुपयांची मदत करण्यात आली. तर ८३६ पाळीव जनावरे जखमी झाली व त्यांच्या मालकांना ९ लाख ४ हजारांची मदत देण्यात आली.वर्षनिहाय नागरिकांचे मृत्यू व जखमीवर्ष             मृत्यू              जखमी२०१३          ४६              ३९७२०१४          ३८              ४७१२०१५          ३९              ४८७२०१६          ५२               ६७४२०१७          ४२               १४७

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव