शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

राज्यात मागील पाच वर्षात वन्यप्राण्यांनी घेतले २१७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 19:26 IST

गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले.

ठळक मुद्देदोन हजारांवर नागरिक जखमी कोट्यवधींच्या पिकाची नासधूस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले.  माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. मागील पाच वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला, किती जखमी झाले, पीडित किंवा त्यांच्या नातेवार्इंकांना किती नुकसानभरपाई देण्यात आली, पिकांचे किती प्रमाणात नुकसान झाले, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१३ सालापासून ते डिसेंबर २०१७ पर्यंत राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१७ नागरिकांचा बळी गेला तर २ हजार १७६ नागरिक जखमी झाले. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईपोटी १४ कोटी ८ लाख रुपयांची मदत करण्यात आली. तर जखमींना ८ कोटी २४ लाख ५५ हजार रुपये देण्यात आले. सरासरी एका मृताच्या कुटुंबीयांना ६ लाख ४८ हजार ८४७ रुपयांची तर प्रत्येक जखमीला ३७ हजार ८९२ रुपयांची मदत मिळाली.पिकांच्या नुकसानीची लाखांहून अधिक प्रकरणेवन्यप्राण्यांनी शेतांमध्ये शिरून पिकांचे नुकसान करण्याचे प्रकारदेखील होताना दिसून येतात. गेल्या पाच वर्षांत अशाप्रकारे नुकसान झालेली १ लाख १४ हजार ३६३ प्रकरणे नोंदविण्यात आली. नुकसानभरपाईपोटी संबंधित शेतकऱ्यांना ४३ कोटी १४ लाख ९२ हजार रुपयांची मदत देण्यात आली.३० हजार पाळीव प्राणी भक्ष्यस्थानीएप्रिल २०१३ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ३० हजार ६२५ पाळीव प्राणी वन्यप्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. मरण पावलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई म्हणून १६ कोटी २५ लाख १६ हजार रुपयांची मदत करण्यात आली. तर ८३६ पाळीव जनावरे जखमी झाली व त्यांच्या मालकांना ९ लाख ४ हजारांची मदत देण्यात आली.वर्षनिहाय नागरिकांचे मृत्यू व जखमीवर्ष             मृत्यू              जखमी२०१३          ४६              ३९७२०१४          ३८              ४७१२०१५          ३९              ४८७२०१६          ५२               ६७४२०१७          ४२               १४७

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव