शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नवनवीन शब्दांनी भाषा व साहित्य समृद्ध होते : अरुण गुजराथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 23:05 IST

नवनवीन शब्द प्रत्येक भाषेत नित्य समाविष्ट होत असतात आणि होणेही आवश्यक आहे. कारण या शब्दांनीच भाषा आणि त्या भाषेचे साहित्य समृद्ध होत असते, असे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी केले.

ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे उर्दू साहित्यिकांचा सत्कार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : साहित्यात शब्द हे सर्वात महत्त्वाचे असतात. नवनवीन शब्द प्रत्येक भाषेत नित्य समाविष्ट होत असतात आणि होणेही आवश्यक आहे. कारण या शब्दांनीच भाषा आणि त्या भाषेचे साहित्य समृद्ध होत असते, असे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नागपूरच्यावतीने उर्दू साहित्यिकांच्या सत्कार समारोहात ते बोलत होते.बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे नुकताच आयोजित या सत्कार सोहळ्याच्या वेळी प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष गिरीश गांधी, कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, कराडचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रसिद्ध उर्दू साहित्यिक शरफुद्दीन साहिल प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात नागपूर व कामठीच्या १२ उर्दू साहित्यिकांना उर्दू साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये कवी लोकनाथ यशवंत यांच्यासह डॉ. अजहर हयात, डॉ. नाहीद अफरोज सुरी, अजहर असरार, जियाउल्ला खान लोधी, डॉ. शगुस्था आरीफ, इफ्तरवार नबावर, रियाझ अहमद अमरोधी, डॉ. नसीम अख्तर, डॉ. उबैद खारीन व मोहम्मद इकबाल सिद्दीकी यांचा समावेश आहे.अरुण गुजराथी यांनी हा सत्कार केवळ उर्दू साहित्यिकांचा नसून सर्वच भाषा साहित्यिकांचा गौरव असल्याचे मनोगत मांडले. उर्दू ही १५ भारतीय भाषांमधील सर्वात महत्त्वाची भाषा असल्याचे ते म्हणाले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, उर्दू ही सहज भाषा असून कुणीही नकळत तिच्या प्रेमात पडतो. हा उर्दू साहित्यिकांच्या सृजनशीलतेचा व प्रतिभेचा गौरव असल्याचे ते म्हणाले. डॉ. शरफुद्दीन साहिल यांनी, शायर साहिर लुधियानवी यांचे साहित्य रद्दीच्या दुकानात सापडल्याची खंत व्यक्त करीत साहित्याच्या संवर्धनाचे गरज व्यक्त केली. गिरीश गांधी यांनीही मनोगत मांडले. तसेच सत्कारमूर्ती साहित्यिकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.डॉ. मोहम्मद असदुल्ला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गायक मोहम्मद सलीम शेख यांनी आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर