शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपुरातील कालिदास महोत्सवाच्या जाहिरातीत भाषेचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 10:02 IST

कालिदासाच्या नावाने नागपुरात दरवर्षी भव्य महोत्सव आयोजित करणाऱ्या आयोजन समितीने मात्र महोत्सवाच्या जाहिरातीत भाषेचा पार बट्ट्याबोळ केला आहे.

ठळक मुद्देना धड हिंदी, ना धड मराठी आयोजन समितीचे भाषाअज्ञान चव्हाट्यावरवाचा या भन्नाट चुका शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर सायंकाळी ५ बजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत एवं सितार जुगलबंदी शास्त्रीय एवं उपशास्त्रीय गायन महेश एलकुंचवार प्रख्यात साहित्यकार

शफी पठाण।आॅनलाईन लोकमतनागपूर : विरहाच्या वेदनेतून मेघदूत रचणारे कालिदास हे प्राचीन भारतातील प्रख्यात संस्कृत कवी होते. केवळ मेघदूतच नव्हे तर आपल्या विलक्षण शब्दसामर्थ्याने त्यांनी रघुवंशम्, कुमारसंभवम्, ऋतुसंहार आदी संस्कृत महाकाव्यांनाही जन्मास घातले. हे लिखाण करताना शुद्ध भाषेवर त्यांचा विशेष भर होता. कारण, पत्नीने लक्षात आणून दिलेल्या भाषाअज्ञानानेच त्यांना लिखाणाची प्रेरणा दिली होती. परंतु याच कालिदासाच्या नावाने नागपुरात दरवर्षी भव्य महोत्सव आयोजित करणाऱ्या आयोजन समितीने मात्र महोत्सवाच्या जाहिरातीत भाषेचा पार बट्ट्याबोळ केला आहे.शुक्रवारी सर्व प्रमुख दैनिकात प्रसिद्ध झालेल्या व सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीतील कार्यक्रम विवरणाच्या रकान्यात प्रमुख शब्द मराठीत अनुवाद करून कंसातील माहिती हिंदीत जशीच्या तशी ठेवण्यात आली आहे. ही जाहिरात बघितली तर लक्षात येते की ही अनवधानाने झालेली चूक अजिबात नाही.ज्यांच्याकडे या जाहिरातीच्या अनुवादाचे काम सोपविण्यात आले त्याला एक तर भाषेचे ज्ञान नाही वा त्याने पाट्या टाकण्याच्या सरकारी प्रवृत्तीतून या घोडचुका केल्या आहेत. बरं...या केवळ व्याकरणाच्या चुका असत्या तर दुर्लक्ष करताही आले असते. परंतु जाहिरातीचा मूळ अनुवादच चुकला आहे. एकाच ओळीतील दिवस व तारीख मराठीत तर वेळ हिंदीत लिहिली आहे. पालकमंत्र्यांचे आडनाव मराठीतही ‘बावनकुले’च आहे. स्थळच्या ठिकाणी ‘स्थल’ कायम ठेवण्यात आले आहे. प्रवेश नि:शुल्क असे जिथे लिहिले आहे त्याच्याच बाजूला मोठ्या अक्षरात ‘प्रवेशिकाची आवश्यकता नाही’असेही लिहिले आहे. कार्यक्रम विवरणाच्या रकान्यात तर आयोजन समितीतील विद्वानांच्या विद्वत्तेचे पार धिंडवडेच निघाले आहेत.

जबाबदारी नेमकी कुणाची?या महोत्सवाचे आयोजन कालिदास समारोह आयोजन समिती, महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळ व नागपूर महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. अशा स्थितीत या घोडचुकांची जबाबदारी नेमकी कुणाची हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्याला कुणाला या जाहिरातीच्या अनुवादाचे काम सोपवले त्याला किमान भाषाज्ञान आहे का हे बघितले गेले की नाही, जर ते बघूनच हे काम सोपवले तर मग इतक्या गंभीर चुका कशा झाल्या की आयोजन समिती अशा कलात्मक कार्यक्रमाकडे केवळ सरकारी सोपस्कार म्हणून पाहते, याचे उत्तर आयोजकांनी महोत्सव संपण्यापूर्वी द्यायला हवे, अशी अपेक्षा नागपूरकर रसिक व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :literatureसाहित्य