शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

हेरिटेजच्या संचालकाविरुद्ध जमीन हडपण्याचा गुन्हा

By admin | Updated: October 28, 2015 03:13 IST

एका गरीब आणि वृद्ध निराधार महिलेची लाखो रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून प्रतापनगर पोलिसांनी हॉटेल हेरिटेजचे संचालक रणधीर जगतापसिंग

साडेतीन लाखांचे कर्ज दिले : ७५ लाखांची जमीन हडपण्याचा कट, वरिष्ठांच्या आदेशानंतर कारवाईनागपूर : एका गरीब आणि वृद्ध निराधार महिलेची लाखो रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून प्रतापनगर पोलिसांनी हॉटेल हेरिटेजचे संचालक रणधीर जगतापसिंग ऊर्फ सोनू खंडूजा आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.सीताबाई सुखराम मेंढे (वय ६५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. मुलगा सुनेसह त्या गोपालनगरात (प्रतापनगर) राहतात. गजानन नगरात सीताबाईच्या पतींनी १९७३ मध्ये १५०० चौरस फुटाचा भूखंड विकत घेतला होता. १९९७ मध्ये सुखराम मेंढे यांचे निधन झाल्यामुळे सीताबाई, त्यांच्या दोन मुली गीताबाई ब्राह्मणकर आणि लताबाई भूपेंद्र सिंग तसेच मुलगा रामू सुखराम मेंढे या भूखंडाचे वारसा हक्काने कायदेशीर मालक झाले. कालांतराने मुलगी गीताबाई आणि मुलगा रामू आपापल्या परिवारासह वेगळे राहू लागले. या भूखंडावरील घरात वृद्ध सीताबाई, त्यांची मुलगी लताबाई तिच्या परिवारासह राहात होती. लताबाईचा मुलगा कुलदीप सिंग याला दारूचे व्यसन असल्यामुळे तो उधारी घेऊन खर्च करीत होता. त्याच्यावर झालेल्या कर्जाची रक्कम चुकती करण्याची क्षमता नसल्यामुळे आणि कर्जदार घरावर येऊन भांडत असल्यामुळे कुलदीपच्या ओळखीच्या त्रिमूर्तीनगरातील गोल्डी गुप्ता याच्याकडून २०१३ मध्ये २ लाख, ५० हजार रुपये कर्ज घेतले. गुप्ताने कर्ज देताना सीताबार्इंच्या पतीच्या नावे असलेल्या भूखंडाची मूळ कागदपत्रे स्वत:कडे ठेवून घेतली. व्याजाची दरमहा रक्कम आवाक्याबाहेर असल्यामुळे कधीकधी ती थकीत होत होती. त्यामुळे गोल्डी वसुलीसाठी तगादा लावायचा. त्याने नंतर हे कर्ज एकरकमी परत करण्यासाठी वेठीस धरणे सुरू केले. याच दरम्यान, हेरिटेज हॉटेलचा संचालक रणधीर जगताप सिंग ऊर्फ सोनू खंडूजा (रा. सहोदय टॉवर, कडबी चौक), रितेश प्रमोद खांडेकर (रा. यादवनगर), राजा रमेश यादव (रा. कडबी चौक) हरपालसिंग नाहाटा (फे्रंडस् कॉलनी) यांच्याशी कुलदीपची ओळख झाली होती. त्यामुळे कुलदीपने गोल्डीच्या कर्जाच्या तगाद्याबद्दल त्यांना माहिती सांगितली. यावेळी राजा यादवने सीताबार्इंच्या घरी येऊन गोल्डीचे कर्ज परत करण्यास मदत करतो, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)फसवणुकीचा कटराजाने कर्ज परत करण्यासाठी ३ लाख , ५० हजार रुपये कर्ज मिळवून देण्याचे मान्य केले. मात्र त्यासाठी भूखंडाचे वारसदार असलेल्या चारही लोकांना रजिस्ट्री कार्यालयात गहाणखत करून देण्यासाठी यावे लागेल, अशी अट घातली. पैशाची नितांत गरज असल्यामुळे सीताबार्इंसह तिच्या वारसदारांनी राजा यादवने सांगितल्याप्रमाणे सर्व केले. २ डिसेंबर २०१३ ला गहाणपत्राची कागदपत्रे असल्याचे सांगून ते वाचून न दाखवताच सीताबार्इंच्या अंगठ्याचा ठसा आणि इतरांच्या त्यावर सह्या घेतल्या. त्यानंतर यादवने सीताबार्इंना २ लाख ८० हजारांचा चेक दिला. ११ जानेवारी २०१४ ला सीताबार्इंची मुलगी लताबाई हिने बँकेतून रक्कम काढताच त्यातील ५० हजार यादवने मागून घेतले. उर्वरित २ लाख ३० हजारांपैकी २ लाख रुपये गोल्डी गुप्ताला देण्यास सांगितले. साडेतीन लाखांच्या नावाखाली केवळ ३० हजार रुपये हातात पडल्यामुळे सीताबार्इंनी आक्षेप घेतल्यानंतर त्याने पुन्हा तिला दोन वेळा प्रत्येकी ५० हजार रुपये दिले. या एकूण रकमेच्या बदल्यात महिन्याला १० हजार ५०० रुपये तो व्याज मागत होता. हे व्याज परवडणारे नसल्यामुळे सीताबाई आणि त्यांच्या वारसदारांनी कर्जाची रक्कम परत करण्याचे ठरवले. तसे त्यांनी यादवला सांगून रकमेची व्यवस्था आम्ही करतो, तू आमची कागदपत्रे आणून दे, असे सांगितले. यावेळी यादवने ही कागदपत्रे हेरिटेजच्या मालकाकडे ठेवली आहे, त्यानेच तुम्हाला ती रक्कम व्याजाने दिल्याचे सांगितले. त्यामुळे सीताबाई परिवारासह एप्रिल २०१५ मध्ये हेरिटेज हॉटेलमध्ये जाऊन खंडूजा यांना भेटली. यावेळी त्याने तुमचा भूखंड आणि त्यावरील घर ३० लाखात खरेदी केल्याचे सांगितले. तुम्हाला रक्कमही दिल्याचे तो म्हणाला. यावेळी धाकदपट करून त्याने परत पाठविले. त्यानंतर सीताबाई आणि तिच्या वारसांनी घेतलेले साडेतीन लाख रुपये एकरकमी परत करतो, तुम्ही आमची कागदपत्रे परत करण्याची विनवणी केली. मात्र, खंडूजा आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला दाद दिली नाही. एवढेच नव्हे तर पुढे ११ जुलै २०१५ ला आलेल्या गुंडांनी सीताबार्इंना त्यांच्या मालकीच्या घरातून परिवारासह हुसकावून लावले. अशीही बनवाबनवी सुमारे ७५ लाख रुपये किमतीचा भूखंड अवघ्या साडेतीन लाखात हडपल्यामुळे बेघर झालेल्या सीताबाई आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आपला भूखंड परत मिळवण्यासाठी अनेकांचे हातपाय जोडले. दरम्यान, सीताबाई आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना अंधारात ठेवून खंडूजा आणि साथीदारांनी या भूखंडाची श्रीराम आणि अनिल संपत देशमुख (रा. बेलतरोडी) या भावांच्या नावे विक्रीपत्र करून घेतल्याचे उघड झाले. या अन्याय आणि फसवणुकीची पोलिसांकडे तक्रार करूनही फायदा झाला नाही. शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण गेले. वरिष्ठांकडून कानउघाडणी झाल्यानंतर ८ आॅक्टोबरला प्रतापनगर पोलिसांनी रणधीर खंडूजा, रितेश खांडेकर, राजा यादव आणि हरपालसिंग नाहटा या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.