शहरं
Join us  
Trending Stories
1
५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
2
चारवेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
3
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
4
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
5
Piyush Pandey: 'अब की बार, मोदी सरकार', 'हमारा बजाज'सारख्या टॅगलाइनचे जनक, मार्केटिंग गुरू पीयूष पांडे यांचं निधन; 'पद्मश्री'ने झाला होता गौरव
6
"हो, मी प्लास्टिक सर्जरी केली...", जान्हवी कपूरने जाहीररित्या स्वीकारलं; म्हणाली, "आईनेच मला..."
7
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
8
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
9
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
10
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
11
दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कोसळला; १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुबईत कार्डिएक अरेस्टने मृत्यू
12
Australia Squads vs India : ऑस्ट्रेलियन संघात फेरबदल! टीम इंडियाविरुद्ध मॅक्सवेलही उतरणार मैदानात
13
कार्तिक विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत पूजन, गणपती करेल कल्याण-मंगल; पाहा, महत्त्व-मान्यता
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
15
Stock Market Today: शेअर बाजार उघडताच रेड झोनमध्ये; सेन्सेक्स निफ्टीवर फ्लॅट ट्रेडिंग-डिफेन्स शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?
17
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
18
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
19
प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
20
KVP Investment Scheme: पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम

प्रकाशपर्व; एक दिवा मानवतेच्या अस्तित्त्वासाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 22:11 IST

५ एप्रिलला रात्री नऊ वाजता प्रत्येकाने घरातील विद्युत दिवे बंद करून दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याच आवाहनाचा मान राखत नागपुरात घरोघरी दीप उजळण्यात आले.

ठळक मुद्देनऊ मिनिटांच्या दीपप्रज्वलनाने उजळल्या दाही दिशासर्वत्र झगमगाट, दिवाळीच झाली साजरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ही काही दिवाळी नव्हती की कोणता आनंद सोहळा! संकटाच्या काळात मन बधिर होते, काही केल्या मार्ग सापडेनासा होतो. सर्वत्र अंधार पसरला असतो. अशा स्थितीत तिमीराकडून उजेडाकडे जाणारा मार्ग प्रशस्त करणारा केवळ एक निमिष हवा असतो. अशाच संकटाचे सावट देशावरच नव्हे तर संपूर्ण जगावर पसरले आहे. संपूर्ण यंत्रणा अशा परिस्थितीशी दोन हात करत आहेत. अशावेळी सामान्यांचे मनोधैर्य खचू नये, त्यांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा, अशी भावना जागृत करण्याचे कर्तव्य नेतृत्त्वाचे असते. तेच कौशल्य साधत देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण भारतवासीयांना मानवतेच्या शत्रुसंगे युद्ध पुकारण्यासाठी एकवटण्याचे आवाहन केले आणि त्याचा शंखनाद करण्यासाठी एक दिवा घरोघरी लावण्याचे आवाहन केले. या आवाहनाला नागपूरसह देशभरात उदंड प्रतिसाद प्राप्त झाला आणि मानवी अस्तित्त्वाच्या शत्रुसंगे युद्ध पुकारण्यासाठी ‘प्रकाशपर्व’ साजरा झाला.५ एप्रिलला रात्री नऊ वाजता प्रत्येकाने घरातील विद्युत दिवे बंद करून दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याच आवाहनाचा मान राखत नागपुरात घरोघरी दीप उजळण्यात आले. दीप उजळण्यासह कुणी मोबाईल टॉर्च, टॉर्च, कुणी मशाली प्रज्वलित करत ‘आम्ही सर्व सोबत’ आहोत, याचे भान जागृत केले. यापूर्वीही २२ मार्च रोजी पंतप्रधानांच्या आवाहनानुसार नागरिकांनी टाळी किंवा थाळी वाजवून कोरोना वॉरिअर्स अर्थात डॉक्टर, पोलीस, पत्रकार, स्वच्छता दूतांबाबत कृतज्ञता भाव व्यक्त केला होता. या घटनेकडे अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या असल्या तरी कृतज्ञतेचा हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ सगळ्यांनीच अनुभवला आणि आपोआपच निराशेच्या गर्तेत गेलेल्या प्रत्येकाचे हात उंचावले गेले होते. तशीच संमिश्र प्रतिक्रिया ‘प्रकाशपर्वा’बाबत निघत होत्या. मात्र, जेव्हा सगळा समाजमन एकवटतो तेव्हा सर्व नकार दूर पळून जातात आणि सुयोग्य प्रवाहासोबत आपणही चालावे, असा आत्मभानही जागृत होतो. तसे भान सर्वांनीच जपले. नऊ मिनिटांचा हा प्रकाशपर्व अनेकांच्या मनात दाटलेला अंधार दूर करणारा ठरला. घरोघरी दारावर दीप उजळले गेले. जणू दिवाळीच साजरी झाली. अनेकांनी घराच्या वरांड्यात, फ्लॅटमधील गॅलरीमध्ये, गच्चावर तर कुणी घरापुढे उभे राहून मोबाईलच्या टॉर्चने एकमेकांना प्रतिसाद दिला. काहींनी आपापल्या घरापुढे उभे राहून मशाली प्रज्वलित करत कोरोना संकटाशी सामना करण्यास सज्ज असल्याचा भाव जागृत केला. एकंदर हा प्रकाशपर्व मनामनात चेतना निर्माण करणारा ठरला.कोणी गायले भजन, कोणी सादर केले वादन: दीपप्रज्वलनाच्या वेळी कुणी भजन सादर केले तर कुणी तबला, गिटारचे वादन केले. काहींनी शंखनाद करत पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी २२ मार्च प्रमाणे जो घोळ निर्माण झाला होता तो टाळण्यात नागरिकांनी यश संपादन केले. आपापल्या घरूनच हा दिव्यांचा प्रकाशपर्व साजरा करण्यात आला. अनेक वस्त्यांमध्ये याची तयारी सकाळपासूनच करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्यांनी तशा सुचना दिल्या होत्या आणि लॉकडाऊन तुटणार नाही, याची काळजीही घेतली गेली होती.दीपप्रज्वलनाचे महत्त्व: भारतीय संस्कृती संध्याकाळच्या समयी देवघर, तुळशीवृंदावन व द्वारावर दिवे लावण्याची प्राचिन परंपरा आहे. त्यानुसार प्रत्येकच जण आपल्या धार्मिक परंपरेप्रमाणे दिवे उजळत असतोच. पणतीच्या प्रकाशाने मनातील मरगळ दूर होते आणि चेतना संचारते, असा विश्वास आहे. शिवाय, दिव्यांच्या उष्णतेने किटाणूंचा नाश होतो, असे शास्त्र सांगते. एका विशिष्ट वेळी सारा भारत एकच कृत्य करत असेल तर त्यात सलोखा, प्रेम आणि सजगतेचे भान प्रतिपातित होत असते. तेच भान जागविण्यासाठी एकसाथ संबंध भारताने साजरा केलेला हा प्रकाशपर्व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक इतिहास ठरला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस