शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

लद्दाखच्या विकासामुळे देशाच्या सीमा सुरक्षित : खासदार नामग्याल यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 1:07 AM

लद्दाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी दावा केला की, लेह लद्दाखच्या विकासामुळे देशाच्या सीमा सुरक्षित होईल. या परिसरात राष्ट्रवादाची भावना आहे. येथील लोक देशासाठी बलिदान देण्यास तयार आहे. ते म्हणाले सरकारने कलम ३७० काढल्यानंतर लद्दाखने विकासाची गती पकडली आहे.

ठळक मुद्देकलम ३७० काढल्याने बदलली दशा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लद्दाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी दावा केला की, लेह लद्दाखच्या विकासामुळे देशाच्या सीमा सुरक्षित होईल. या परिसरात राष्ट्रवादाची भावना आहे. येथील लोक देशासाठी बलिदान देण्यास तयार आहे. ते म्हणाले सरकारने कलम ३७० काढल्यानंतर लद्दाखने विकासाची गती पकडली आहे. शिक्षण, ऊर्जा व रेल्वे सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले जात आहे.जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या महर्षी व्यास सभागृहात आयोजित ‘लद्दाख काल आणि आज’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यात नामग्याल बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रीधरराव गाडगे उपस्थित होते. त्याचबरोबर आमदार कृष्णा खोपडे, अनिल सोले, मोहन मते, जम्मू कश्मीर अध्ययन केंद्राच्या मीरा खडक्कार, जिव्हाळा फाऊंडेशनचे आशिष वांदिले व मनीष मेश्राम उपस्थित होते. नामग्याल म्हणाले सरकारचा कलम ३७० हटविण्याचा निर्णय धाडसी होता. एकेकाळी लेह-लद्दाख येथील लोकांचे कुणीच कैवारी नव्हते. या भागाला पडिक जमिनीचे क्षेत्र म्हटले जात होते. जम्मू काश्मिरातील लोक लढून-झगडून आपल्या मागण्या पूर्ण करीत होते. परंतु लेह-लद्दाखमध्ये असे होत नव्हते. येथे डिग्री कॉलेज देखील नव्हते. नोकऱ्या मिळत नव्हत्या. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अन्य राज्यात जावे लागत होते. कलम ३७० काढल्यानंतर राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यामुळे विद्यापीठ सुरू होत आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट कॉलेज सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. जनता खूश आहे.दरम्यान श्रीधरराव गाडगे म्हणाले की, नागरिकता संशोधन कायद्यात नवीन काहीच नाही. केवळ हिंदू शब्दाला परिभाषित केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावर देशाचा विरोध केला जात आहे. यासाठी सजग राहण्याची गरज आहे.सौर ऊर्जेला भरपूर संधीनामग्याल म्हणाले लद्दाखमध्ये सौर ऊर्जेचे उत्पादन करण्यासाठी भरपूर संधी आहे. लद्दाख पूर्ण जगाला वीज पुरवठा करण्याची क्षमता ठेवतो. त्याचप्रकारे पर्यटन क्षेत्राचाही येथे विकास होऊ शकतो. आपल्या सांस्कृतीचे जतन करणारे हे राज्य सुख, शांती, प्रेम करुणेचा संदेश देणारे आहे.व्होटबँकेसाठी देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्ननागरिकता संशोधन कायदा (सीएए) ला होत असलेल्या विरोधाबद्दल नामग्याल म्हणाले व्होटबॅँकेसाठी देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. धर्माचे राजकारण करणारे पक्ष आज धर्मनिरपेक्षतेची शिकवण देत आहे. जे कधी भारतीय तिरंगा व संविधानावर बोलत नव्हते, ते आज संविधान धोक्यात असल्याचे सांगत, तिरंगा घेऊन फिरत आहे. वीर सावरकरांवर टीका केली जात आहे. हे सर्व ‘मोदी है तो मुमकिन है’ चे उदाहरण आहे.पाकिस्तान, चीनचा कब्जानामग्याल म्हणाले लद्दाखच्या काही भागावर चीन व पाकिस्तानचा कब्जा आहे. पाकिस्तानने लद्दाखचा ५ हजार वर्ग किलोमीटरचे क्षेत्र चीनला दिले आहे. अक्साई चीन हा भारताचा भाग होता, तोही चीनला दिला. लद्दाख- तिब्बत सीमा वाद मोठा करण्यात आला. मोदी सरकारच्या कार्यकाळात सध्या घुसखोरीला लगाम लागला आहे. आता लोक बॉर्डर पार करण्यास भित आहे. भारत आता सर्जिकल स्ट्राईक करून शत्रूचा सफाया करीत आहे.

टॅग्स :ladakhलडाखchinaचीन