शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

थर्ड, फोर्थ लाईनअभावी सुरक्षा धोक्यात  : कधी होणार प्रकल्प पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 21:11 IST

Lack of Third, fourth line railway security in denger दहा वर्षांपूर्वी नागपूर-सेवाग्राम थर्डलाईनला मंजुरी मिळाली. त्यानंतर चौथी लाईनही मंजूर करण्यात आली. परंतु अद्यापही थर्डलाईन, चौथी लाईन पूर्ण करण्यात आली नाही.

ठळक मुद्देक्षमतेपेक्षा धावतात अधिक रेल्वेगाड्या

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : दहा वर्षांपूर्वी नागपूर-सेवाग्राम थर्डलाईनला मंजुरी मिळाली. त्यानंतर चौथी लाईनही मंजूर करण्यात आली. परंतु अद्यापही थर्डलाईन, चौथी लाईन पूर्ण करण्यात आली नाही. नागपूर-सेवाग्राम मार्गाची क्षमता १०० रेल्वेगाड्या धावण्याची आहे. परंतु पूर्ण क्षमतेने रेल्वेगाड्या सुरू असल्यास या मार्गावरून १५० रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होते. त्यासाठी लवकर थर्ड आणि फोर्थ लाईनचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

नागपूर-सेवाग्राम या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या अधिक आहे. या मार्गाची क्षमता दिवसाकाठी १०० रेल्वेगाड्या चालविण्याची आहे. परंतु नियमित रेल्वेगाड्या सुरू असताना या मार्गावर १५० रेल्वेगाड्या धावतात. हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही. सतत रेल्वेगाड्या धावत असल्यामुळे रेल्वे रुळाच्या देखभालीसाठी वेळ मिळत नाही. या मार्गावरील रेल्वेगाड्यांची संख्या पाहून रेल्वे मंत्रालयाने दहा वर्षांपूर्वी थर्ड लाईनची घोषणा केली. त्यानंतर फोर्थ लाईनचीही घोषणा करण्यात आली. थर्ड आणि फोर्थ लाईनचे कामही सुरू करण्यात आले. परंतु हे काम कासवगतीने सुरू आहे. कोरोनानंतर नियमित रेल्वेगाड्या सुरू झाल्यास या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे रेल्वे रुळाच्या देखभालीसाठी वेळ मिळणार नाही. लॉकडाऊनमध्ये रेल्वे प्रशासनाकडे थर्ड आणि फोर्थ लाईनचे काम करण्यासाठी बराच वेळ होता. तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाने हे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी थर्ड लाईन आणि फोर्थ लाईनचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने थर्ड, फोर्थ लाईन आवश्यक

नागपूर-सेवाग्राम मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या अधिक आहे. त्यासाठीच रेल्वेने थर्ड, फोर्थ लाईनची घोषणा केली. या मार्गावर पूर्ण रेल्वेगाड्या सुरू झाल्यास रेल्वे रुळावर भार पडणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाने थर्ड, फोर्थ लाईनचे काम करणे गरजेचे आहे.`

प्रवीण डबली, माजी झेडआरयूसीसी सदस्य, दपूम रेल्वे

प्रवाशांसाठी महत्त्वाचा प्रकल्प

`थर्ड, फोर्थ लाईन हा प्रवाशांसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. नागपूर-सेवाग्राम मार्गावर रेल्वेगाड्या क्षमतेपेक्षा अधिक धावतात. त्यामुळे या मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन गरजेची आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने लवकर हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्याची गरज आहे.`

-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर