शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आदिवासी विभागाच्या दिरंगाईचा मुलांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:29 IST

आदिवासी विकास विभागाद्वारे आदिवासी मुलांना नामांकित शाळेत प्रवेशासाठी विशेष योजना राबविली जाते. मात्र ही योजना सध्या आदिवासी पालकांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. विभागाद्वारे योजनेची प्रक्रिया राबविण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे मुलांच्या शाळा प्रवेशाचा खोळंबा निर्माण झाला आहे. यामुळे विभागाच्या योजनेतून नामांकित शाळेत प्रवेशाची वाट पाहत असणाऱ्या पालकांना मुलांचे वर्ष वाया जाईल की काय, ही भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपहिल्या वर्गाच्या प्रवेशाचा खोळंबा : पालकांची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आदिवासी विकास विभागाद्वारे आदिवासी मुलांना नामांकित शाळेत प्रवेशासाठी विशेष योजना राबविली जाते. मात्र ही योजना सध्या आदिवासी पालकांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. विभागाद्वारे योजनेची प्रक्रिया राबविण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे मुलांच्या शाळा प्रवेशाचा खोळंबा निर्माण झाला आहे. यामुळे विभागाच्या योजनेतून नामांकित शाळेत प्रवेशाची वाट पाहत असणाऱ्या पालकांना मुलांचे वर्ष वाया जाईल की काय, ही भीती निर्माण झाली आहे.झिंगाबाई टाकळी, बोखारा येथे राहणाºया जय गेडाम यांच्यासह इतर अनेक पालकांनी याबाबत व्यथा मांडली आहे. आदिवासी विभागाद्वारे गरीब मुलांना पहिल्या वर्गात प्रवेशासाठी नामांकित शाळा प्रवेश योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत यावर्षी ६५० च्यावर पालकांनी अर्ज केला होता. विभागाने अर्जातील त्रुटींमुळे काही अर्ज रद्द करून प्रवेशासाठी ५२२ मुलांचे अर्ज पात्र ठरले असून, ही यादी आदिवासी भवनात लावण्यात आली आहे. योजनेच्या निर्धारित संख्येनुसार विभागाद्वारे लकी ड्रॉ काढून ५२२ पैकी केवळ १०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यातच खरा घोळ निर्माण झाला असून यामुळे पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. खासगी वाहनचालक असलेल्या जय गेडाम यांचा व त्यांच्या भावाच्या मुलांसाठी अर्ज केला होता व त्यांची नावेही निवड यादीत आहेत. मात्र एकीकडे बहुतेक शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत संपत आहे तर दुसरीकडे विभागाची प्रक्रिया खोळंबली आहे. अशापरिस्थितीत विभागाच्या लकी ड्रॉमध्ये त्यांची मुले अपात्र ठरली तर मुलांचा प्रवेश कुठे घ्यायचा, हा प्रश्न त्यांच्या व इतर पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. शाळांमध्ये प्रवेशच मिळाला नाही तर त्यांच्या मुलांचे वर्ष वाया जाणार की काय, अशी भीती त्यांच्यात निर्माण झाली आहे. विभागाचे अधिकारी याबाबत समाधानकारक उत्तर देत नसल्याचे गेडाम यांनी सांगितले. ही प्रक्रिया पुणे व नाशिकमधून होत असल्याने आमच्या हाती काही नाही, असे उत्तर मिळत असल्याचे गेडाम म्हणाले. ५२२ पैकी कोणत्याही १०० मुलांची निवड तर होईल. मात्र विभागाच्या या दप्तरदिरंगाईमुळे निवड न झालेल्या ४२२ मुलांच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी