शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आदिवासी विभागाच्या दिरंगाईचा मुलांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:29 IST

आदिवासी विकास विभागाद्वारे आदिवासी मुलांना नामांकित शाळेत प्रवेशासाठी विशेष योजना राबविली जाते. मात्र ही योजना सध्या आदिवासी पालकांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. विभागाद्वारे योजनेची प्रक्रिया राबविण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे मुलांच्या शाळा प्रवेशाचा खोळंबा निर्माण झाला आहे. यामुळे विभागाच्या योजनेतून नामांकित शाळेत प्रवेशाची वाट पाहत असणाऱ्या पालकांना मुलांचे वर्ष वाया जाईल की काय, ही भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपहिल्या वर्गाच्या प्रवेशाचा खोळंबा : पालकांची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आदिवासी विकास विभागाद्वारे आदिवासी मुलांना नामांकित शाळेत प्रवेशासाठी विशेष योजना राबविली जाते. मात्र ही योजना सध्या आदिवासी पालकांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. विभागाद्वारे योजनेची प्रक्रिया राबविण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे मुलांच्या शाळा प्रवेशाचा खोळंबा निर्माण झाला आहे. यामुळे विभागाच्या योजनेतून नामांकित शाळेत प्रवेशाची वाट पाहत असणाऱ्या पालकांना मुलांचे वर्ष वाया जाईल की काय, ही भीती निर्माण झाली आहे.झिंगाबाई टाकळी, बोखारा येथे राहणाºया जय गेडाम यांच्यासह इतर अनेक पालकांनी याबाबत व्यथा मांडली आहे. आदिवासी विभागाद्वारे गरीब मुलांना पहिल्या वर्गात प्रवेशासाठी नामांकित शाळा प्रवेश योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत यावर्षी ६५० च्यावर पालकांनी अर्ज केला होता. विभागाने अर्जातील त्रुटींमुळे काही अर्ज रद्द करून प्रवेशासाठी ५२२ मुलांचे अर्ज पात्र ठरले असून, ही यादी आदिवासी भवनात लावण्यात आली आहे. योजनेच्या निर्धारित संख्येनुसार विभागाद्वारे लकी ड्रॉ काढून ५२२ पैकी केवळ १०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यातच खरा घोळ निर्माण झाला असून यामुळे पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. खासगी वाहनचालक असलेल्या जय गेडाम यांचा व त्यांच्या भावाच्या मुलांसाठी अर्ज केला होता व त्यांची नावेही निवड यादीत आहेत. मात्र एकीकडे बहुतेक शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत संपत आहे तर दुसरीकडे विभागाची प्रक्रिया खोळंबली आहे. अशापरिस्थितीत विभागाच्या लकी ड्रॉमध्ये त्यांची मुले अपात्र ठरली तर मुलांचा प्रवेश कुठे घ्यायचा, हा प्रश्न त्यांच्या व इतर पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. शाळांमध्ये प्रवेशच मिळाला नाही तर त्यांच्या मुलांचे वर्ष वाया जाणार की काय, अशी भीती त्यांच्यात निर्माण झाली आहे. विभागाचे अधिकारी याबाबत समाधानकारक उत्तर देत नसल्याचे गेडाम यांनी सांगितले. ही प्रक्रिया पुणे व नाशिकमधून होत असल्याने आमच्या हाती काही नाही, असे उत्तर मिळत असल्याचे गेडाम म्हणाले. ५२२ पैकी कोणत्याही १०० मुलांची निवड तर होईल. मात्र विभागाच्या या दप्तरदिरंगाईमुळे निवड न झालेल्या ४२२ मुलांच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी