शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

आदिवासी विभागाच्या दिरंगाईचा मुलांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:29 IST

आदिवासी विकास विभागाद्वारे आदिवासी मुलांना नामांकित शाळेत प्रवेशासाठी विशेष योजना राबविली जाते. मात्र ही योजना सध्या आदिवासी पालकांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. विभागाद्वारे योजनेची प्रक्रिया राबविण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे मुलांच्या शाळा प्रवेशाचा खोळंबा निर्माण झाला आहे. यामुळे विभागाच्या योजनेतून नामांकित शाळेत प्रवेशाची वाट पाहत असणाऱ्या पालकांना मुलांचे वर्ष वाया जाईल की काय, ही भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपहिल्या वर्गाच्या प्रवेशाचा खोळंबा : पालकांची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आदिवासी विकास विभागाद्वारे आदिवासी मुलांना नामांकित शाळेत प्रवेशासाठी विशेष योजना राबविली जाते. मात्र ही योजना सध्या आदिवासी पालकांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. विभागाद्वारे योजनेची प्रक्रिया राबविण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे मुलांच्या शाळा प्रवेशाचा खोळंबा निर्माण झाला आहे. यामुळे विभागाच्या योजनेतून नामांकित शाळेत प्रवेशाची वाट पाहत असणाऱ्या पालकांना मुलांचे वर्ष वाया जाईल की काय, ही भीती निर्माण झाली आहे.झिंगाबाई टाकळी, बोखारा येथे राहणाºया जय गेडाम यांच्यासह इतर अनेक पालकांनी याबाबत व्यथा मांडली आहे. आदिवासी विभागाद्वारे गरीब मुलांना पहिल्या वर्गात प्रवेशासाठी नामांकित शाळा प्रवेश योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत यावर्षी ६५० च्यावर पालकांनी अर्ज केला होता. विभागाने अर्जातील त्रुटींमुळे काही अर्ज रद्द करून प्रवेशासाठी ५२२ मुलांचे अर्ज पात्र ठरले असून, ही यादी आदिवासी भवनात लावण्यात आली आहे. योजनेच्या निर्धारित संख्येनुसार विभागाद्वारे लकी ड्रॉ काढून ५२२ पैकी केवळ १०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यातच खरा घोळ निर्माण झाला असून यामुळे पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. खासगी वाहनचालक असलेल्या जय गेडाम यांचा व त्यांच्या भावाच्या मुलांसाठी अर्ज केला होता व त्यांची नावेही निवड यादीत आहेत. मात्र एकीकडे बहुतेक शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत संपत आहे तर दुसरीकडे विभागाची प्रक्रिया खोळंबली आहे. अशापरिस्थितीत विभागाच्या लकी ड्रॉमध्ये त्यांची मुले अपात्र ठरली तर मुलांचा प्रवेश कुठे घ्यायचा, हा प्रश्न त्यांच्या व इतर पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. शाळांमध्ये प्रवेशच मिळाला नाही तर त्यांच्या मुलांचे वर्ष वाया जाणार की काय, अशी भीती त्यांच्यात निर्माण झाली आहे. विभागाचे अधिकारी याबाबत समाधानकारक उत्तर देत नसल्याचे गेडाम यांनी सांगितले. ही प्रक्रिया पुणे व नाशिकमधून होत असल्याने आमच्या हाती काही नाही, असे उत्तर मिळत असल्याचे गेडाम म्हणाले. ५२२ पैकी कोणत्याही १०० मुलांची निवड तर होईल. मात्र विभागाच्या या दप्तरदिरंगाईमुळे निवड न झालेल्या ४२२ मुलांच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी