शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कष्टकरी महिलांनी पेन्शनसाठी रस्त्यावर उतरावे

By admin | Updated: February 10, 2015 00:49 IST

पेन्शन ही आमच्या न्याय्य हक्काची मागणी आहे परंतु लढल्याशिवाय ही मागणी मान्य होणार नाही. जोपर्यंत शासनाला आपली एकजुटता दिसणार नाही, तोपर्यंत शासन या मागण्यांचा विचारही करणार नाही,

पेन्शन परिषद : बाबा आढाव यांचे प्रतिपादन नागपूर : पेन्शन ही आमच्या न्याय्य हक्काची मागणी आहे परंतु लढल्याशिवाय ही मागणी मान्य होणार नाही. जोपर्यंत शासनाला आपली एकजुटता दिसणार नाही, तोपर्यंत शासन या मागण्यांचा विचारही करणार नाही, रस्त्यावरची लढाई लढावी लागले. तेव्हा पेन्शनसाठी कष्टकरी कामगार महिलांनी रस्त्यावर उतरण्यास तयार राहावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी आणि असुरक्षित कष्टकरी संघर्ष समितीचे प्रमुख डॉ. बाबा आढाव यांनी येथे केले. विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे सोमवारी सर्वोदय आश्रम विनोबा विचार केंद्र धरमपेठ येथे ‘घरेलु कामगारांची पेन्शन परिषद’ आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रूपा कुळकर्णी होत्या. तर सामाजिक कृतज्ञता निधी पुणेचे कार्यवाह प्रा. सुभाष वारे, शैलजा आरडकर, प्रा. धम्मसंगिणी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. बाबा आढाव म्हणाले, आमदार आणि खासदार एकदा निवडून आले की, त्यांना जीवनभरासाठी पेन्शन दिली जाते. तेव्हा कष्टकरी महिलांना का नाही. त्यांनाही म्हातारपणात पेन्शन मिळावी, ही मागणी काही केवळ नागपूर किंवा विदर्भातील मोलकरणींचीच नाही, तर समस्त कष्टकरी महिलांची आहे. त्यामुळे कष्टकरी महिलांना पेन्शन मिळण्यासाठी देशव्यापी लढा लढण्याची गरज आहे, या पार्श्वभूमीवर पंढरपूरला पेन्शन परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहतील. तिथे लढाईची रूपरेषा सुद्धा ठरविली जाईल. या मागणीसाठी आपण दिल्लीला धरणे दिले तेव्हा सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्याला भेटायला आले होते. तुमच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. आमचे सरकार सत्तेवर येताच कष्टकऱ्यांना पेन्शन लागू केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. तेव्हा आता त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. त्यांना निवेदने द्या आणि केव्हापर्यंत पेन्शन लागू करता, याचा जाब विचारा. पेन्शन लागू झाली नाही, तर रस्त्यावर उतरण्यास तयार राहा, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. सुभाष वारे म्हणाले, मोलकरणींसह ऊस तोड कामगार महिला आणि कोकणात मासेमारीमध्ये सहभागी असलेल्या कष्टकरी महिलांनासुद्धा पेन्शन मिळण्याची गरज आहे. ही लढाई लढत असतानाच विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शैलजा आरडकर, प्रा. धम्मसंगिणी यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी मोलकरणींच्या जीवनावर प्रकाश टाकणारे एकपात्री नाट्य सादर करणाऱ्या भाग्यश्री ढगे, श्वेता मोटघरे आणि वंदना माटे या महिला कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला. विदर्भ मोलकरीण संघटनेचे सचिव विलास भोंगाडे यांनी प्रास्ताविक केले. सुजाता भोंगाडे यांनी संचालन केले. भाग्यश्री ढगे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर घेणार अधिवेशनमोलकरणींना पेन्शन मिळावी या मागणीसाठी आता लढा सुरू झाला आहे. यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोरील मोकळ्या मैदानावर मोलकरणींचे अधिवेशन घेण्यात येईल. पोलिसांनी परवानगी न दिल्यास ‘जेल भरो’ आंदोलन केले जाईल, असा इशारा विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रूपा कुळकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणाद्वारे दिला.