शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संजय राऊतांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, कृष्णा खोपडे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 13:59 IST

थोडी नैतिकता शिल्लक राहिली असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, असेदेखील खोपडे म्हणाले.

नागपूर : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाजप नेत्यांना मौन बाळगण्याचे निर्देश असताना पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना नेते खा. संजय राऊत उलटसुलट वक्तव्य देऊन राज्यातील शांतता भंग करण्याचे व राज्यात दंगली भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून तत्काळ त्यांना अटक करावी, अशी मागणी खोपडे यांनी केली.

राणा दाम्पत्याने मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केली, तर त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालविण्यात आला. आता उघडपणे धमक्या दिल्या जात असताना राऊतांवर देखील अशीच कारवाई करायला हवी. शिवसेनेचे कार्यकर्ते ज्या प्रमाणे रस्त्यावर येऊन गुंडागर्दी करीत आहेत, त्यावरून उद्धव ठाकरे यांचे सरकार कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यातील नागरिकांच्या हितापेक्षा उद्धव ठाकरे यांना स्वत:ची खुर्ची वाचविण्यात जास्त रस आहे, असा आरोप खोपडे यांनी लावला. जर थोडी नैतिकता शिल्लक राहिली असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, असेदेखील खोपडे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतKrushna Khopdeकृष्णा खोपडेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ