शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

नागपुरातील कोविड हेल्थ सेंटरला डॉक्टर मिळेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:29 AM

प्रशासनाने भरतीची प्रक्रिया सुरू केली मात्र डॉक्टर व परिचारिका मिळत नसल्याने मनपा प्रशासन हतबल झाले आहे. डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी न मिळाल्यास नागपुरातील सेंटर कसे सुरू करणार, अशी गंभीर समस्या उभी ठाकली आहे.

ठळक मुद्दे मनपा प्रशासन हतबल पाच सज्ज रुग्णालयात प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढणार असल्याचे गृहीत धरून महापालिका प्रशासनाने पाच रुग्णालये अत्याधुनिक केली. ४५० खाटांसह आयसीयू सुविधा उपलब्ध आहे. यातील इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन येथे एकूण २७२ खाटांचे डेडिकेटेड हेल्थ सेंटर सज्ज केले. यासाठी डॉक्टरांसह ५०० परिचारिका व प्रशिक्षक कर्मचाऱ्यांची गरज आहे. प्रशासनाने भरतीची प्रक्रिया सुरू केली मात्र डॉक्टर व परिचारिका मिळत नसल्याने मनपा प्रशासन हतबल झाले आहे. डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी न मिळाल्यास सेंटर कसे सुरू करणार, अशी गंभीर समस्या उभी ठाकली आहे.१०.५० कोटींचा खर्चपाच रुग्णालयांच्या अपग्रेडेशनवर सुमारे १०.५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यावर ७ कोटी खर्च करण्यात आले आहेत. गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय व पाचपावली सूतिकागृह येथे प्रत्येकी १३० बेडसह अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटरसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालय, काटोल रोड येथील के.टी.नगर रुग्णालय व सदर येथील आयुष रुग्णालय सज्ज केली आहेत.मेयो, मेडिकलचा भार कमी कसा होणार?कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोविड-१९ साथीचा उद्रेक बघता केंद्राच्या आदेशाप्रमाणे, गरज भासल्यास कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनपाची रुग्णालये सज्ज करण्यात आली. परंतु डॉक्टर व परिचारिका नसल्याने उपचार करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत मेयो, मेडिकलवरील रुग्णांचा भार कमी कसा करणार, असा प्रश्­न कायम आहे.हॉटेलमध्ये अडीच हजार शुल्कशहरातील आठ हॉटेल कोविड केअर सेंटरमध्ये परिवर्तित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हॉटेलमध्ये कोरोनाची लक्षणे नसलेले पॉझिटिव्ह रुग्ण राहू शकतील; मात्र यासाठी रुग्णांना दररोज अडीच हजार रुपये शुल्क द्यावे लागेल.मनपा कर्मचाऱ्यांचीच उपचारासाठी भटकंतीमहापालिकेच्या अग्निशमन विभागातील १४ कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना उपचारासाठी भटकंती करावी लागली. मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची अशी अवस्था असेल तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उभा ठाकला आहे. होम क्वारंटाईन असलेल्यांनाही उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस