शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील शेतकऱ्यांविरुद्धचा कोलकातामधील खटला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST

नागपूर : कर्ज थकवल्यामुळे एल ॲण्ड टी फायनान्स कंपनीने गडचिरोली जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांविरुद्ध कोलकाता येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल ...

नागपूर : कर्ज थकवल्यामुळे एल ॲण्ड टी फायनान्स कंपनीने गडचिरोली जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांविरुद्ध कोलकाता येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी शेतकऱ्यांना सदर दिलासा दिला.

भजन मलकाम व पतीराम हिचामी अशी शेतकऱ्यांची नावे असून ते आरमोरी येथील रहिवासी आहेत. एल ॲण्ड टी फायनान्स कंपनीने त्यांना ६ लाख १२ हजार रुपयांचे कर्ज दिले होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी या कंपनीकडे एक वाहन गहाण ठेवले होते. शेतकऱ्यांनी कर्जाचे काही हप्ते दिल्यानंतर उर्वरित रक्कम थकवली. त्यामुळे कंपनीने ७ फेब्रुवारी २०१८ रोजी या शेतकऱ्यांविरुद्ध कोलकाता येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये त्या न्यायालयाने २६ मार्च २०१८ रोजी दोन्ही शेतकऱ्यांना समन्स बजावला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा खटला रद्द करण्याची विनंती केली. ती विनंती मान्य करण्यात आली.

कंपनीने वादग्रस्त खटला दाखल करण्यापूर्वी कर्जाचे प्रकरण लवादासमक्ष ठेवले होते. २३ जानेवारी २०१७ रोजी लवादाने कंपनीच्या बाजूने ६ लाख ६२ हजार ६६४ रुपयांचा अवॉर्ड जारी केला. तसेच, गहाण वाहन ताब्यात घेऊन त्याची विक्री करण्याची कंपनीला परवानगी दिली. असे असताना कंपनीने महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली व त्या न्यायालयापासून लवादाचा अवॉर्ड लपवून ठेवला. त्यावरून कंपनी शुद्ध हेतूने वागली नाही हे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. कंपनीने लवादाच्या अवॉर्डची माहिती लपवून ठेवली नसती तर, महानगर दंडाधिकारी न्यायालयाने कंपनीची तक्रार खारीज केली असली असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. याशिवाय उच्च न्यायालयाच्या कंपनीच्या तक्रारीत काहीच गुणवत्ता आढळून आली नाही. परिणामी, वादग्रस्त खटला रद्द करण्यात आला.

--------------

अधिकारक्षेत्राचा आक्षेप खोडून काढला

शेतकऱ्यांनी कोलकाता येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयातील तक्रारीविरुद्ध याचिका दाखल केली असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ ही याचिका ऐकू शकत नाही, असा आक्षेप एल ॲण्ड टी फायनान्स कंपनीने घेतला होता. उच्च न्यायालयाने तो आक्षेप खोडून काढला. शेतकरी गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांना गडचिरोली येथे कर्ज वितरित करण्यात आले. तसेच, शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेल्या वाहनाची गडचिरोली येथे नोंदणी झाली आहे. त्यामुळे या उच्च न्यायालयाला ही याचिका ऐकण्याचा अधिकार आहे, असे कंपनीला सांगण्यात आले.