शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

काेलामार्काचे संरक्षित क्षेत्र हाेणार रानम्हशींचे अभयारण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 14:33 IST

राज्यात रानम्हशी धाेकाग्रस्त प्राणी म्हणून गणला जाताे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी आणखी उपाय करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने एक समिती स्थापन करून या राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देता येईल का, याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देसमितीच्या प्रस्तावावर राज्य शासन सकारात्मक बंगालनंतर केवळ गडचिराेलीत अस्तित्व

निशांत वानखेडे

नागपूर : गडचिराेली जिल्ह्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर आणि इंद्रावती नदीच्या काठावर निसर्गसाैंदर्याने नटलेले ‘काेलामार्का’ हे वनक्षेत्र आहे. राज्यात केवळ याच भागात असलेल्या रानम्हशी (वाईल्ड बफेलाे) च्या अस्तित्वामुळे त्याला संर्वधित राखीव क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. या राखीव क्षेत्राला आता अभयारण्याचा दर्जा मिळणार आहे. या प्रस्तावाबाबत राज्य शासन सकारात्मक असून यामुळे रानम्हशींसह इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी माेठी मदत मिळेल.

आसामचे काझीरंगा अभयारण्य व बंगालच्या भागात रानम्हशींची संख्या माेठी आहे. त्यानंतर महाराष्ट्रात केवळ गडचिराेलीच्या काेलामार्का वनक्षेत्रात त्यांचे अस्तित्व बघायला मिळते. काही वर्षांपूर्वी या भागात चार-पाचच रानम्हशी अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येते. पाच वर्षांपूर्वी या क्षेत्राला संवर्धित राखीव क्षेत्राचा दर्जा देण्यात आला. आता संख्या २५ च्यावर पाेहोचली आहे. राज्यात रानम्हशी धाेकाग्रस्त प्राणी म्हणून गणला जाताे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी आणखी उपाय करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने वन्यजीव मंडळाचे सदस्य असलेली एक समिती स्थापन करून या राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देता येईल का, याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नागपूरचे सीसीएफ पी. कल्याणकुमार यांच्या अध्यक्षतेत स्थापन केलेल्या समितीत वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते, बंडू धाेत्रे, किशाेर रिठे, पूनम धनवटे तसेच सिराेंचा वनविभागाचे उपवनसंरक्षकांचा समावेश आहे. समितीने सर्व बाबींचा अभ्यास करून अभयारण्याचा दर्जा देण्यास काही हरकत नाही, असा प्रस्ताव शासनाला दिला.

सिराेंचा विभागाचे कार्य काैतुकास्पद

वन्यजीव मंडळ व अभ्यास समितीचे सदस्य कुंदन हाते यांनी नुकताच काेलामार्का राखीव क्षेत्राचा दाैरा केला. त्यांनी सिराेंचा वनविभागाच्या काैतुकास्पद प्रयत्नांमुळे या भागात रानम्हशींची संख्या वाढल्याची माहिती दिली. यादरम्यान स्थानिक गावकऱ्यांशीही चर्चा केली असता, त्यांचेही रानम्हशींच्या संवर्धनासाठी या प्रस्तावाला समर्थन असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक आदिवासींच्या अधिकाराला धक्का न लागू देता अभयारण्याचे नियाेजन करण्याचा विश्वास त्यांनी दिला.

‘मुनिया’ला करावी लागणार प्रतीक्षा

बुटीबाेरी व उमरेडच्या मधात असलेल्या मुनिया वनक्षेत्राला वर्षभरापूर्वी संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा मिळाला. या राखी क्षेत्रालाही अभयारण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याची सूचना शासनाने दिली हाेती. त्यानुसार समितीने अभ्यास केला. मुनिया वर्षभरापूर्वीच ‘राखीव क्षेत्र’ घाेषित झाल्याने किमान चार वर्षे वन्यजीव संवर्धनाचे नियाेजन करावे व त्यानंतरच पुन्हा अभ्यास करून अभयारण्याबाबत विचार करावा, अशी सूचना समितीने दिल्याची माहिती कुंदन हाते यांनी दिली.

टॅग्स :environmentपर्यावरणwildlifeवन्यजीवforestजंगल