शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

पतंगबाजी : नागपुरात १०० हून अधिक पक्षी नायलॉन मांजाचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:31 PM

एकीकडे नायलॉन मांजामुळे २० च्यावर माणसे गंभीर जखमी झाली असताना पक्ष्यांवरही संक्रांत बरसली आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार मकरसंक्रांतीच्या एकाच दिवसात १०० पेक्षा अधिक पक्ष्यांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देउपचार केंद्रात ३० कबुतर, बगळे, घुबड, कोकीळ घारीवर उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बंदी असूनही सर्रासपणे झालेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीमुळे अपेक्षेप्रमाणे व्हायचे ते दुष्परिणाम झालेच. एकीकडे नायलॉन मांजामुळे २० च्यावर माणसे गंभीर जखमी झाली असताना पक्ष्यांवरही संक्रांत बरसली आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार मकरसंक्रांतीच्या एकाच दिवसात १०० पेक्षा अधिक पक्ष्यांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापेक्षा अधिक जायबंदी झाले आहेत. दरम्यान वनविभागाने सुरू केलेल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दिवसभरात ५० च्यावर जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यात आले.वनविभागाच्या ट्रान्झिट सेंटरचे पक्षितज्ज्ञ डॉ. मयूर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार विभागाच्या आपात्कालीन संपर्क क्रमांकावर ६० च्यावर जागेहून पक्ष्यांच्या अपघाताबाबत माहिती आली. या पक्ष्यांना पक्षिमित्र कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले. त्यातील ५० च्यावर पक्ष्यांवर सध्या केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. यात कबुतर, घुबड व घारींची संख्या अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ट्रान्झिट केंद्रात ३० कबुतर, १० ते १२ बगळे, ४ घारींवर उपचार करण्यात आले. याशिवाय घुबड, कोकीळ, पोपट, शिक्रा आदी पक्ष्यांवरही उपचार करण्यात आल्याची माहिती डॉ. काटे यांनी दिली. नायलॉन मांजा झाडावर अडकला असल्याने रात्री भ्रमंती करणारे घुबड आणखी जखमी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. यामधील किरकोळ जखमी झालेल्या काही पक्ष्यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. मात्र गंभीर जखमी असलेल्या पक्ष्यांना सेंटरमध्येच ठेवण्यात आले आहे. गंभीर असलेल्या काही पक्ष्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. साधारणत: महिनाभर त्यांच्यावर औषधोपचार करून ते सक्षम झाल्यावर त्यांना सोडून देण्यात येणार असल्याचेही डॉ. काटे यांनी स्पष्ट केले.दरम्यान एवढ्या पक्ष्यांवर उपचार सुरू असले तरी अनेक पक्षी जायबंदी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत पक्ष्यांचा आकडा आज मिळू शकला नसला तरी १०० हून अधिक पक्ष्यांचा बळी गेला असण्याची आणि यापेक्षा दुपटीने जायबंदी झाले असण्याची भीती डॉ. काटे यांनी व्यक्त केली. मकरसंक्रांतीनंतर गुरुवारी याबाबत माहिती मिळेल, अशी शक्यता त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :kiteपतंगnagpurनागपूर