शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

कळमन्यात घाणीचे साम्राज्य, प्रशासकाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:07 IST

- रोगराई वाढण्याची शक्यता : सर्वच रस्त्यावर कचऱ्याचे ढीग नागपूर : कळमन्यातील सातही बाजारपेठांमध्ये दररोज कचरा उचलला जात नसल्याने ...

- रोगराई वाढण्याची शक्यता : सर्वच रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

नागपूर : कळमन्यातील सातही बाजारपेठांमध्ये दररोज कचरा उचलला जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सर्वच रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. याकडे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक राजेश भुसारी यांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने बाजारात सर्वत्र घाण पसरली असल्याचा आरोप बाजारातील सर्व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा आहे.

सदर प्रतिनिधीने कळमना बाजारपेठांची पाहणी केली असता भाजी, फळ, मिरची आणि धान्यबाजारात सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसून आले. कचरा दररोज उचलला जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे मत आहे. याकरिता कंत्राट दिल्याची माहिती आहे. त्यानंतरही कचऱ्याचा ढीग साचून राहणे म्हणजे प्रशासकाचा ढिसाळपणा आहे. बाजार समितीचे अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने बाजारात कोरोना वाढीसह रोगराईची समस्या वाढली आहे. बाजार समिती खरेदीदारांकडून १.०५ रुपये सेस वसूल करते. वर्षभरात जवळपास ३० कोटींचा सेस गोळा होतो. यातून बाजाराची साफसफाई करणे आवश्यक आहे. पण साफसफाई करणारी आणि त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच सुस्त असल्याने कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती रोगराईचे मुख्य केंद्र झाल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात भुसारी यांच्याशी मोबाईलवर वारंवार संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

तेवढीच जबाबदारी अडतिया व व्यापाऱ्यांची

बाजारात कचरा साचू नये, याची जबाबदारी बाजार समितीची असली तरीही त्यापेक्षा जास्त जबाबदारी सर्वच बाजारातील अडतिया आणि व्यापाऱ्यांची आहे. सर्वांनी आपापल्या दुकानासमोरील घाण आणि कचरा एका ठिकाणी गोळा करावा. कचरा उचलून नेणारी यंत्रणा बाजार समितीकडे आहे. पण अडतिया आणि व्यापारी आपली जबाबदारी विसरतात. याकडेही कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असल्याचे काही अडतिये आणि व्यापाऱ्यांनी सांगितले.

मुख्य गेट सुरू करा, चिखली गेट बंद करा

कळमना चौकातून कळमना बाजाराकडे येणारा अर्ध्या किमीचा सिमेंट रस्ता बनविताना तब्बल तीन ते चार वर्ष कळमन्याचे मुख्य गेट बंद होते. तेव्हा चिखली गेटवरून वाहतूक सुरू होती. या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर गेट सुरू झाले. आता एक महिन्यापासून मुख्य गेट प्रशासकाने पुन्हा बंद केले. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांना अर्धा किमी फिरून एकेरी मार्गावरून वाहतूक करावी लागते. गेट का बंद केले, हे एक कोडेच आहे. पोलिसांसोबतच्या आर्थिक व्यवहारामुळे मुख्य गेट बंद केल्याचा काही व्यापाऱ्यांचा आरोप आहे. गेट सुरू केल्यास वाहतूक सुरळीत होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

चोरांचा सुळसुळाट, पोलिसांचे दुर्लक्ष

उन्हाळ्यात फळांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. रात्रंदिवस फळ चोरण्यासाठी चोरटे या भागात फिरत असतात. दररोज माल चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होते. तक्रारीनंतरही प्रशासक गंभीर नाहीत आणि पोलिसांना सूचनाही केल्या नाहीत. कळमना पोलीस ठाणे बाजारात असल्यानंतरही चोरट्यांवर नियंत्रण आणण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. आर्थिक व्यवहारामुळे हा प्रकार घडत असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे.