शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मारेकऱ्यांचा शोध घेतला जात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 11:06 IST

लेखकांना लिहू नका, बोलू नका, असे सांगितले जात आहे़ एवढेच नव्हे तर काय खावे, काय घालावे अशी बंधने घातली जात असल्याची आगपाखड सातव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा सबाने यांनी रविवारी येथे केली़

ठळक मुद्देवर्तमान परिस्थितीवर अरूणा सबाने यांची आगपाखड सातव्या लेखिका साहित्य संमेलनाचे उद्घाटन

प्रवीण खापरे।लोकमत न्यूज नेटवर्कक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्यासपीठ (थडीपवनी) : कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्यासारख्या अभिव्यक्तीच्या पुरस्कर्त्यांचा खून होतो़ मात्र, त्यांच्या मारेकऱ्यांना हुडकून काढण्यास जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे़ याउलट, लेखकांना लिहू नका, बोलू नका, असे सांगितले जात आहे़ एवढेच नव्हे तर काय खावे, काय घालावे अशी बंधने घातली जात असल्याची आगपाखड सातव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा सबाने यांनी रविवारी येथे केली़थडीपवनी येथे कृषी विकास प्रतिष्ठान आणि विदर्भ साहित्य संघाच्यावतीने नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व़ तुळशीराम काजे परिसरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्यासपीठावरून सातव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी सबाने बोलत होत्या़ व्यासपीठावर उद्घाटक प्रख्यात चित्रपट अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, रेशीम उद्योग महामंडळाच्या संचालक भाग्यश्री बानाईत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, स्वागताध्यक्ष खा़ कृपाल तुमाने, सहस्वागताध्यक्ष प्रकाश तागडे, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग, थडीपवनीच्या सरपंच नीलिमा उमरकर, संध्या मातकर, संमेलन समितीच्या आमंत्रक शुभदा फडणवीस, प्रतिष्ठानचे श्रीराम काळे, राजेश गांधी, बंडोपंत उमरकर, नरेश अडसड उपस्थित होते़एकीकडे विकासाचा झंझावात सुरू असल्याचे राज्यकर्ते नाकाने सांगत आहेत़ मात्र, त्यांच्याच काळात देशामध्ये दररोज एक कोटी लोक उपाशी झोपत असल्याचा अहवाल सर्वेक्षणातून उघडकीस आला आहे़ अशा स्थितीत विकास कशाला म्हणायचा, असा परखड सवाल सबाने यांनी यावेळी उपस्थित केला़ याच काळात राजकीय व्यक्तींकडून शेतकºयांना थेट व्यासपीठावरून अपशब्द उच्चारले जात आहेत़ विशिष्ट समाजाच्या गाण्याची रिंगटोन ठेवली म्हणून मारले जात आहे़ विशिष्ट प्राण्यांचे मांस भक्षण केल्याचा आरोप करून, त्यास बदडले जात आहे़ ते आम्ही कसे सहन करायचे? आम्ही सहन करतो म्हणून, काहीही सांगितले जात आहे आणि आम्ही काहीही मान्य करायला लागलो आहोत़ अशा तºहेने किती दिवस घाबरून राहायचे़ लेखिकांनी हे विषय उचलून धरणे गरजेचे आहे़ परिवर्तन महिलाच घडवू शकतात़मात्र, लेखिका आजही पाने, फुले यांच्याच कविता करतात, प्रेमस्वप्नांच्या कथा लिहितात़ मात्र, आम्ही किती जणांवर प्रेम करतो, हे लिहिण्याचे धाडस दाखवत नाहीत़ तेथे मात्र, सती सावित्री असल्याचे ढोंग केले जाते़ अशा तºहेने राज्यघटनेने दिलेले लोकशाहीचे मूल्य आपणच तुडवत असल्याचा प्रहार सबाने यांनी केला़ ज्याच्या लेखणीला धार आहे, त्याने गप्प बसायला नको़ लेखिकांनी आपली धारदार लेखणी अशांवर प्रहार करण्यासाठी वापरायला हवी़ आमचे प्रश्न आम्हीच मांडले पाहिजे़ आता सुरक्षिक अंतर ठेवून लिहिण्याचे, स्वत:ची सुविधा बघण्याचे आणि कुणाला हवे म्हणून लिहिण्याचे तंत्र सोडा़ परंपरागत विषयाला दूर सारून, त्या पलिकडचे जग लेखनातून मांडा़ मुंबई-पुण्याकडील परिस्थिती विदर्भात लवकरच येणार आहे़ त्या स्थितीतील ‘लिव्ह इन रिलेशन’ हा विषय कधी हाताळाल? असे विषय हाताळण्यास सुरुवात करा़, असे आवाहन अरुणा सबाने यांनी अध्यक्षीय व्यासपीठावरून केले़ प्रास्ताविक डाँ़ गिरीश गांधी यांनी केले़ संचालन अर्चना घुळघुळे यांनी केले तर आभार डाँ़ मोना चिमोटे यांनी मानले़

टॅग्स :literatureसाहित्य