शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

नागपुरात चिमुकल्याचे अपहरण करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:50 IST

गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकल्याचा मृतदेह पोत्यात मिळाला. वंश ओमप्रकाश यादव (वय ८ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. तो प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला जुना वस्तीत राहत होता. क्षुल्लक कारणावरून वंशचे त्याच्या अल्पवयीन मावसभावानेच अपहरण करून हत्या केल्याचे उघड झाल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमृतदेह पोत्यात भरून तलावात फेकलाअल्पवयीन मावसभावानेच केला घातआरोपी पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकल्याचा मृतदेह पोत्यात मिळाला. वंश ओमप्रकाश यादव (वय ८ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. तो प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला जुना वस्तीत राहत होता. क्षुल्लक कारणावरून वंशचे त्याच्या अल्पवयीन मावसभावानेच अपहरण करून हत्या केल्याचे उघड झाल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे.ओमप्रकाश यादव हे पत्नी गौरी, मुलगी वंशिका आणि मुलगा वंशसह खामला जुनी वस्तीत राहतात. त्यांच्याकडे गाई, म्हशी असून ते दुधाचा व्यवसाय करतात. आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे ओमप्रकाश यांच्यासह पत्नी गौरीही दूध वाटपासाठी घरोघरी फिरतात. वंशिका ही सहाव्या तर वंश हा खामल्यातील सिंधी हिंदी हायस्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात शिकत होता. २७ मार्चला सकाळी १० वाजता वंशचे वडील ओमप्रकाश नेहमीप्रमाणे दूध विकण्यासाठी घरून निघून गेले तर आईसुद्धा ११ वाजता बाहेर पडली. त्यावेळी वंश हा घरासमोरील मनपाच्या मैदानावर खेळत होता. तो दुपारी १२ वाजता शाळेत जायचा. दुपारी १२.३० ला वंशिका शाळेतून घरी आली. तिला वंशचे दप्तर घरी दिसले मात्र तो दिसला नाही. दुपारी १ वाजता आईवडील घरी आले. दप्तर घरी होते. मात्र वंश घरी नसल्यामुळे त्यांनी शाळेत चौकशी केली. तो शाळेत गेलाच नसल्याचे स्पष्ट झाल्याने नातेवाईकांना फोन करून विचारपूस केली. कुठेच पत्ता लागत नसल्याने ओमप्रकाश आणि गौरी यांनी परिसरात शोधाशोध केली. नंतर प्रतापनगर ठाण्यात वंश बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.२७ मार्चला वंश अचानक बेपत्ता झाला होता. त्याचे अपहरण झाले असावे, असा संशय पालकांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीत व्यक्त केला होता. पोलिसांनी अपहरणाची नोंद केली, मात्र फारसा गांभीर्याने तपास केला नाही. मुलांचे आईवडील आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते चिमुकल्या वंशचा गेल्या १० दिवसांपासून शोध घेत होते. गुरुवारी सकाळी ७ वाजता सोेनेगाव तलावाच्या कोरड्या भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका पोत्यातून दुर्गंधी येत असल्याने आजूबाजूच्यांनी चौकशी केली. पोत्यात बालकाचा मृतदेह असल्याचे लक्षात येताच पोलिसांना कळविण्यात आले.ठाणेदार पांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. बालकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्याच्या शरीरावरचे कपडेही फाटले होते. पोलिसांनी लगेच श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांना बोलवून घेतले.माहिती कळताच गुन्हे शाखेचे पथकही पोहोचले. दरम्यान, शहरातील कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालकाच्या बेपत्ता होण्याची नोंद आहे, त्याची सोनेगाव पोलिसांनी माहिती घेतली. प्रतापनगर ठाण्यातून २७ मार्चला वंश बेपत्ता झाल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी वंशच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलवून घेतले. त्यानंतर या भागातील सामाजिक कार्यकर्ते वंशच्या नातेवाईकांना घेऊन तेथे पोहोचले. वंशचा मृतदेह पाहून त्याचे आईवडील बेशुद्धच पडले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांची एकच आक्रोश केला.अन् धागा मिळालावंशचा मृतदेह ज्या पोत्यात भरून होता, ते पोते शेण फेकण्यासाठी यादव परिवार वापरत होता. वंशची आई आणि बहीण तसेच बहिणीचा परिवार बाजूलाच राहत होता. पोलिसांनी माहिती देताच वंशच्या वडिलांसोबत त्यांचे साडभाऊ अनिल यादव (आरोपीचे वडील) देखिल तलावाच्या काठावर पोहचले. तेसुद्धा दूधविक्रीचा व्यवसाय करतात. वंशचा मृतदेह फेकण्यासाठी वापरण्यात आलेले पोते आणि तोंडावर बांधलेली दोरी घरचीच असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे गुन्हे शाखा पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता वंशचा मावसभाऊ (आरोपी) अ‍ॅक्टीव्हावर हे पोते २७ मार्चला दुपारी खामल्यातून सोनेगाव तलावाकडे नेताना आढळला. परिणामी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. काही मिनिटातच त्याने हत्येची कबुली दिली.क्रौर्य आणि निर्ढावलेपणावंश आणि आरोपीचे पालक रोज निघालेले शेण वृंदावन गार्डनच्या बाजूला नेऊन तेथे गोवºया थापतात. या गोवऱ्या नंतर ते विकतात. घटनेच्या दिवशी आरोपीने वंशला आपल्यासोबत गोवऱ्या आणायला अ‍ॅक्टीव्हावर बसवून नेले. सोबत प्लास्टिकचे पोते आणि दूध काढताना जनावराच्या पायाला बांधण्यासाठी वापरली जाणारी दोरी होती. गोवऱ्या पोत्यात भरतेवेळी वंशच्या हातून पोते सटकले. त्यामुळे आरोपीने त्याला शिवीगाळ केली. वंशनेही त्याला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने पोते बांधण्यासाठी नेलेल्या दोरीने वंशचा गळा आवळून त्याला ठार मारले. नंतर गोवऱ्याऐवजी वंशचा मृतदेह पोत्यात भरला आणि अ‍ॅक्टीव्हावर ठेवून सोनेगाव तलावात फेकून दिला. त्यानंतर तो घरी आला काही झालेच नाही, अशा अविर्भावात फिरू लागला.वंशचे आईवडील त्याचा शोध घेत असताना आरोपी त्यांच्यासोबतच फिरत होता. तब्बल १० दिवस तो वंशला शोधण्याचे नाटक करीत होता. विशेष म्हणजे, वंशचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीलाही तो सामोरे गेला. त्याचे हे कृत्य आणि निर्ढावलेपणा एखाद्या थंड डोक्याच्या सराईत गुन्हेगारालाही लाजविणारे ठरले. दुसरीकडे वंशची हत्या त्याने केल्याचे ऐकून वंशिका बेशुद्ध पडली. आपला मावसभाऊ असे करूच कसा शकतो, असा प्रश्न निरागस वंशिकाला पडला आहे. दरम्यान, आरोपी १७ वर्षांचा असल्याने पोलीस त्याला अटक करू शकत नाही. त्यामुळे चौकशीनंतर त्याची सुधारगृहात रवानगी केली जाणार आहे.

 

टॅग्स :KidnappingअपहरणMurderखून